ऑस्ट्रेलियाचा सप्टेंबरमध्ये भारत दौरा

  64

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यंदा होणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या तयारीसाठी भारतीय संघ सप्टेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ भारतीय दौऱ्यावर येणार आहे. टी-२० विश्वचषक स्पर्धा १६ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर या कालावधीत ऑस्ट्रेलियात होणार आहे.


वृत्तसंस्थेने दिलेल्या माहीतीनुसार, आरोन फिंचच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियाचा संघ ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये झीम्बाम्बे आणि न्यूझीलंड या संघांविरुद्ध पांढऱ्या चेंडूवर मालिका खेळणार आहे. त्यानंतर सप्टेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी भारत दौऱ्यावर येईल. त्यानंतर वेस्ट इंडीज आणि इंग्लंडचे संघ ऑस्ट्रेलिया दौरा करतील. त्यांच्यात ३-३ सामन्यांची मालिका होणार आहे.


ऑस्ट्रेलियाने २०१८-१९ मध्ये भारत दौरा केला होता. त्यावेळी २ टी-२० सामन्यांची मालिका २-० अशी जिंकली होती.

Comments
Add Comment

आज होणार क्रिकेटपटू रिंकू सिंहचा साखरपुडा

लखनऊ : भारतीय क्रिकेटर रिंकू सिंह आणि समाजवादी पक्षाची खासदार प्रिया सरोज यांचा साखपुडा आज म्हणजेच रविवार ८ जून

French Open 2025 जिंकण्याचे जोकोविचचे स्वप्न अपूर्णच राहिले, उपांत्य फेरीत पराभव

पॅरिस : फ्रेंच ओपन २०२५ टेनिस स्पर्धा जिंकण्याचे सर्बियाच्या नोवाक जोकोविचचे स्वप्न अपूर्णच राहिले. टेनिसच्या

Shubhman Gill : १८ वर्षानंतर शुभमन गिल रचणार इंग्लंडमध्ये इतिहास?

नवी दिल्ली : टीम इंडियाचा नवनियुक्त कर्णधार शुभमन गिलला इंग्लंड दौऱ्यामध्ये मोठ्या अग्निपरीक्षेला सामोर जावे

Bangalore Stampede : चेंगराचेंगरी प्रकरणी विराट कोहलीवरही गुन्हा दाखल

बंगळुरू: बंगळुरूमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विजयी परेड दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणात स्टार

फिरकी गोलंदाज पियुष चावलाची निवृत्तीची घोषणा

नवी दिल्ली : भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज पियुष चावलाने क्रिकेटच्या सर्वच प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली आहे.

गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना

मुंबई : रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर रवाना