ऑस्ट्रेलियाचा सप्टेंबरमध्ये भारत दौरा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यंदा होणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या तयारीसाठी भारतीय संघ सप्टेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ भारतीय दौऱ्यावर येणार आहे. टी-२० विश्वचषक स्पर्धा १६ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर या कालावधीत ऑस्ट्रेलियात होणार आहे.


वृत्तसंस्थेने दिलेल्या माहीतीनुसार, आरोन फिंचच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियाचा संघ ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये झीम्बाम्बे आणि न्यूझीलंड या संघांविरुद्ध पांढऱ्या चेंडूवर मालिका खेळणार आहे. त्यानंतर सप्टेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी भारत दौऱ्यावर येईल. त्यानंतर वेस्ट इंडीज आणि इंग्लंडचे संघ ऑस्ट्रेलिया दौरा करतील. त्यांच्यात ३-३ सामन्यांची मालिका होणार आहे.


ऑस्ट्रेलियाने २०१८-१९ मध्ये भारत दौरा केला होता. त्यावेळी २ टी-२० सामन्यांची मालिका २-० अशी जिंकली होती.

Comments
Add Comment

भारताचा विजय, पुढील फेरीची आशा कायम; दक्षिण आफ्रिका सेमी फायनलमध्ये आणि झिम्बाब्वेचे आव्हान संपले

चेन्नई : आयसीसी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ मध्ये सुपर एट फेरीचे आजचे दोन्ही सामने सुपरहिट झाले. दक्षिण

भारताने झिम्बाब्वे विरूद्धच्या सामन्यात उभारला धावांचा डोंगर

चेन्नई : आयसीसी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ मध्ये झिम्बाब्वे विरूद्धच्या सुपर एट फेरीतील सामन्यात भारताने

दक्षिण आफ्रिकेचा वेस्ट इंडिजवर दणदणीत विजय

अहमदाबाद : वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ अंतर्गत सुपर ८ फेरीचा

श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात न्यूझीलंडचा विजय

कोलंबो : आर. प्रेमदासा स्टेडियम येथे आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमधील सुपर ८ फेरीतल्या श्रीलंका विरुद्ध

न्यूझीलंडने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेची निराशाजनक सुरुवात

कोलंबो : आर. प्रेमदासा स्टेडियम येथे आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमधील सुपर ८ फेरीतला श्रीलंका विरुद्ध

...तरच भारत सेमी फायनल खेळू शकेल

मुंबई : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमध्ये सुपर ८ फेरीचे सामने सुरू आहेत. ग्रुप एक मध्ये वेस्ट इंडिज (धावगती