लोटे एमआयडीसीत भीषण आग

खेड (प्रतिनिधी) : कोकणातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमधील लोटे औद्योगिक वसाहतीत मध्यरात्रीनंतर प्रिव्ही कंपनीत आग लागल्याची घटना घडली. यावेळी एका पाठोपाठ एक झालेल्या स्फोटामुळे परिसर हादरून गेला. या आगीत एक कामगार भाजला असून कंपनीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.


राज्यातील सर्वात मोठी रासायनिक कारखाने असलेली औद्योगिक वसाहत रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात लोटे येथे आहे. गेल्या दोन वर्षांत या औद्योगिक वसाहतीत अनेक कारखान्यातून आग लागून काही कामगारांना प्राण गमवावे लागले आहेत, तर काही जण जायबंदी झाले आहेत. या दुर्घटनांमुळे लोटे पंचक्रोशीतील नागरिक भयभीत झाले आहेत.


दरम्यान, शनिवारी दि. १६ एप्रिल रोजी मध्यरात्री नंतर प्रिव्ही कंपनी (जुनी रत्नागिरी केमिकल) या कंपनीत प्रक्रिया सुरू असताना अचानक आग लागली. यावेळी एक कामगार भाजला गेला. रविवार पहाटेपर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न लोटे औद्योगिक वसाहतीमधील अग्निशमन दल करत होते. या आगीत कंपनीची लाखो रुपयांची हानी झाली आहे.


आग लागण्याचे निश्चित कारण समजू शकले नसले, तरी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. दरम्यान, या आगीमुळे कंपनीतील सर्व साहित्य जळून खाक झाले असून घटनास्थळी नागरिकांसह पोलीस व प्रशासनाचे अधिकारी पोहोचले होते.

Comments
Add Comment

कोकणच्या लाल मातीला लागली शिमगोत्सवाची चाहूल

ग्रामदैवतांच्या पालख्या, पारंपरिक नृत्यप्रकार, दशावतारी नाट्यप्रयोगांची तयारी अंतिम टप्प्यात रत्नागिरी :

संगमेश्वर तालुक्यात तीन जि. प. गटांत होणार हायहोल्टेज लढती

साडवली गटात माजी राज्यमंत्री रवींद्र माने यांची प्रतिष्ठा पणाला नीलेश जाधव देवरूख : जिल्हा परिषद व पंचायत

सीटीईटी परीक्षार्थी शिक्षकांची इलेक्शन ड्युटी रद्द करण्याची मागणी

खेड : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा खेड यांच्यावतीने ७ व ८ फेब्रुवारी २०२६ रोजी सीटीईटी परीक्षा

गुहागरात युती विरुद्ध उबाठा लढत रंगणार

आशिष कारेकर गुहागर : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी गुहागर तालुक्यातील ५ जिल्हा परिषद व १० पंचायत

अपघातात जखमींना मिळणार कॅशलेस उपचार

प्राण वाचवणाऱ्या मदतनीसालाही २५ हजार रुपये रोख बक्षीस रत्नागिरी : रस्ते अपघातानंतर जखमींच्या जीवितासाठी

रत्नागिरी जिल्ह्यावर मळभ व पावसाचे सावट; आंबा-काजू उत्पादन धोक्यात

रत्नागिरी  : कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे सावट घोंगावत आहे. जिल्ह्यात पावसाचे