वाल्मिकीनगरमधील सार्वजनिक शौचालयांची निर्मिती अंतिम टप्प्यात

नेरळ (वार्ताहर) : नेरळ ग्रामपंचायतमधील वाल्मिकीनगर येथे असलेले सार्वजनिक शौचालय ३ फेब्रुवारी २०२२ रोजी तोडले होते. सदर सार्वजनिक शौचालय तोडल्यानंतर स्थानिक आदिवासींची गैरसोय होत होती. आदिवासी लोकांच्या मागणीनंतर नेरळ ग्रामपंचायतने सदर शौचालयाचे बांधकाम सुरू केले होते. दरम्यान, आता त्या सार्वजनिक शौचालयाचे काम पूर्ण होत आले असून त्यामुळे आदिवासी लोकांची गैरसोय थांबणार आहे.


नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील वाल्मिकीनगर येथील सार्वजनिक शौचालय ३ फेब्रुवारी २०२२ रोजी ग्रामपंचायतीने तोडले होते. ग्रामस्थांसाठी पर्यायी व्यवस्था न करता आदिवासी लोकांसाठी आरक्षित असलेल्या वाल्मिकीनगरमधील एका बिगर आदिवासी व्यक्तीने अर्ज करून तोडण्याची मागणी केली होती. त्यावर ग्रामसभेत चर्चा झाली आणि त्यानंतर ते सार्वजनिक शौचालय तोडण्यात आले, असा दावा नेरळ ग्रामपंचायतने केला आहे. मात्र त्या भागातील २००हून अधिक कुटुंब त्या सार्वजनिक शौचालयाचा वापर करत होते.


नेरळ ग्रामपंचायतने ते सार्वजनिक शौचालय तोडताना स्थानिकांची पर्यायी व्यवस्था केली नाही. नेरळ ग्रामपंचायतने त्या ठिकाणी १५ वित्त आयोगाच्या निधीमधून नवीन सार्वजनिक शौचालय बांधण्याचे काम सुरू केले आहे. स्थानिक महिलांची गैरसोय होणार यांची कल्पना असतानाही नेरळ ग्रामपंचायतने तेथील सार्वजनिक शौचालय तोडले होते. त्यामुळे आता ग्रामपंचायतकडून नाहक खर्च करत नवीन सार्वजनिक शौचालय बांधण्याचे काम सुरू केले होते.


आता या चार बेडच्या सार्वजनिक शौचालयचे काम अंतिम टप्प्यात असून या महिन्यात बांधकाम पूर्ण होऊन ते वापरास दिले जाऊ शकते. मात्र आदिवासी लोकांची गैरसोय करणाऱ्या ग्रामपंचायतच्या धोरणाचे आणि आदिवासी लोकांची गैरसोय दूर होणार असून नाहक खर्च जनतेच्या माथी टाकणाऱ्या प्रशासनाविरुद्ध नाराजी कायम आहे.

Comments
Add Comment

पेण अर्बन बँकेच्या संचालकांकडून प्रत्येकी २४ कोटींची वसुली?

बँक घोटाळ्यात सहकार आयुक्तांनी निश्चित केली सामूहिक जबाबदारी सुभाष म्हात्रे अलिबाग : पेण अर्बन बँक घोटाळ्यातील

अलिबाग नगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडीत बिघाडी

उबाठा गटाचे स्वतंत्र निवडणूक लढविण्याचे संकेत अलिबाग : अलिबाग नगरपालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची घोषणा

महाडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस-भाजप युती

राष्ट्रवादी काँग्रेसला नगराध्यक्ष पद आणि १५ जागा महाड : ऐतिहासिक महाड नगर परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी

विरार-अलिबाग कॉरिडोरचे काम सुरू होण्याच्या दिशेने एक पाऊल

चार तासांचा प्रवास केवळ दीड तासांत होणार मुंबई  : गेल्या ९ वर्षांपासून रखडलेल्या विरार-अलिबाग कॉरिडोरचे काम

जंजिरा किल्ला तब्बल नऊ दिवसांनी पर्यटकांसाठी झाला खुला

मुरुड : मुरुड जंजिरा किल्ला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची मांदियाळी येत असते. अचानक हवामानात बदल

करंजाचा धाडसी युवक आतिश कोळी ठरला ‘देवदूत’

वादळात अडकलेल्या १५ खलाशांचा वाचवला जीव अलिबाग  : उरण तालुक्यातील करंजा पाडा येथील आतिश सदानंद कोळी या युवकाने