वर्षभरात ६२७ अपघातात २५८ जणांचा मृत्यू

रस्ते बनलेत मृत्यूचा सापळा; अपघातांना कारणीभूत धोकादायक वळणे, रस्त्यांची दुरवस्था


वाहनांची वाढलेली वर्दळ, धोकादायक वळणे, रस्त्यांची झालेली दुरवस्था, भरधाव वाहने यामुळे रायगड जिल्ह्यातील रस्ते मृत्यूचा सापळा बनली आहेत. रायगड जिल्हा पोलीस दूरक्षेत्र हद्दीत दिवसाला जवळपास २ ते ३ अपघात होत आहेत. जानेवारी ते डिसेंबर २०२५ कालावधीत रायगड पोलीस दुरक्षेत्र हद्दीत ६२७ अपघात झाले असून, या अपघातांमध्ये २५८ जणांचा मृत्यू झाला असून, ७८० जण जखमी झाले आहेत.


रस्ते अपघात कमी करण्यासाठी वाहतूक विभागामार्फत अनेक प्रयत्न करण्यात येत आहेत. चालकांनी वाहन सावकाश चालवावे यासाठी ठिकठिकाणी पोस्टर लावण्यात आले आहेत. प्रमुख नाक्यांवर वाहतूक पोलीस वाहनचालकांची तपासणी करतात. वाहन चालकांमध्ये जागृती करण्यात येत आहे. वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर धडक कारवाई हाती घेतली आहे. एवढे प्रयत्न केल्यानंतर अपघातांची संख्या कमी करण्यात यश मिळाले आले तरी जिल्ह्यात आजही मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. मागील वर्षभरात जिल्ह्यात ६२७ अपघात झाले असून, यामध्ये २५८ जणांचा मृत्यू झाला आहे.


अपघातांची प्रमुख कारणे


१)  महामार्गांची संपूर्ण माहिती नसताना वेगाने वाहन चालविणे.
२) रस्त्यालगत इंडिकेटर न लावता थांबलेली वाहने.
३) रस्त्यावरील खड्डे चुकविण्याचा प्रयत्न करणे.
४) कोणतीही पूर्वकल्पना न देता वाहन दुसऱ्या बाजूला नेणे.
५)मद्य पिऊन वाहन चालविणे धोकादायक वळणे.



रस्ते अपघात दृष्टिक्षेप


मार्ग अपघात मृत्यू जखमी

मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग ९८ ३३ १३३

मुंबई पुणे जुना महामार्ग ४७ २० ४१

मुंबई गोवा महामार्ग १६० ५६ १७७

वडखळ अलिबाग १५ ३ ११

ताम्हिणी घाट माणगाव-दिघी ४५ २३ ५१

खोपोली वाकण-आगरदांडा ३२ १९ ५७

पेण खोपोली २५ १५ १५

अंतर्गत राज्यमार्ग ११६ ४६ १९०

इतर मार्ग ११४ ४३ १०५
Comments
Add Comment

Cyprus and India : सायप्रस आणि भारत यांच्यातील सांस्कृतिक संबंध दृढ

सायप्रस प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडौलिडेस 'इश्का' बॉलिवूड चित्रपटाचा थाटात मुहूर्त मुंबई :

रस्त्यावरील व दुर्लक्षित बालकांच्या पुनर्वसनासाठी ‘फिरते पथक; मंत्री आदिती तटकरे

मुंबई :  रस्त्यावर राहणाऱ्या, अनाथ, एकल आणि दुर्लक्षित बालकांच्या पुनर्वसनासाठी ‘फिरते पथक’ पथदर्शी योजना सहा

IPL 2026 : आरसीबीसाठी दिलासादायक बातमी! विराट कोहलीचा ओपनिंग पार्टनर प्लेऑफपूर्वी संघात परतणार...

RCB : आयपीएल २०२६ मध्ये अनेक खेळाडू दुखापतीमुळे संघातून बाहेर झाले आहेत. त्यामुळे संघांना त्याचा मोठा फटका बसला

अनुदानित खतांसोबत विना अनुदानित खतांची सक्तीची विक्री बंद

कृषी विभागाचा निर्णय; नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार मुंबई : "राज्यात काही खत उत्पादक आणि पुरवठादार

टेक-महाइम्पॅक्ट परिषदेत पहिल्याच दिवशी १५० कोटींचे करार

मुंबई : राज्याच्या तंत्रज्ञान आणि औद्योगिक विकासाला मोठी गती देण्यासाठी ‘आयटी’ विभागाच्या वतीने बुधवारी

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेत; कृषि मंत्री दत्तात्रय भरणे

द्राक्ष पिकाचा समावेश करण्याचे निर्देश मुंबई : राज्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी