लोकअदालतीतून वर्षभरात १९ संसारांचे पुनर्मिलन

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे समुपदेशन; तुटणाऱ्या नात्यांना नवसंजीवनी


अलिबाग: बदलती जीवनशैली, वाढता ताणतणाव, व्यसनाधीनता, आर्थिक अडचणी, संशय, संवादाचा अभाव तसेच शारिरिक व मानसिक छळ यांसारख्या विविध कारणांमुळे सध्या विवाहित जोडप्यांमध्ये कलह वाढताना दिसत आहे. किरकोळ वादातून सुरू झालेले मतभेद अनेकदा गंभीर स्वरूप धारण करून थेट घटस्फोटापर्यंत पोहोचत असल्याचे चित्र सर्वत्र दिसते. अशा परिस्थितीत तुटण्याच्या मार्गावर असलेल्या संसारांना वाचविण्यासाठी रायगड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने लोकअदालतीच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण पुढाकार घेत तुटणाऱ्या नात्यांना नवी दिशा लोकअदालतीतून मिळाली असून, वर्षभरात १९ संसार पुन्हा जुळले आहेत. जानेवारी ते डिसेंबर २०२५ या कालावधीत रायगड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या लोकअदालतींमधून तब्बल १९ विवाहित जोडप्यांचे संसार पुन्हा जुळविण्यात यश आले. घटस्फोटाच्या उंबरठ्यावर पोहोचलेली ही नाती समुपदेशन, संवाद आणि तडजोडीच्या माध्यमातून पुन्हा एकत्र आली असून, त्यामुळे संबंधित कुटुंबांचे भविष्य वाचले आहे. अनेकवेळा छोटे गैरसमज, अहंकार, संवादाचा अभाव आणि बाह्य हस्तक्षेप यामुळे वाद अधिक तीव्र होतात. हे वाद वेळेत मिटवले गेले नाहीत, तर त्याचे रुपांतर न्यायालयीन लढाईत होते. अशा प्रकरणांमध्ये पती-पत्नी घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज दाखल करतात. मात्र, अंतिम निर्णयापूर्वी ही प्रकरणे तडजोडीसाठी लोकन्यायालयात ठेवण्यात येतात. या न्यायालयीन वातावरणापेक्षा वेगळ्या, वातावरणात समुपदेशन केले जाते. दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून घेतले जाते. गैरसमज दूर करण्यासाठी संवाद साधला जातो. याच प्रक्रियेतून पती-पत्नींमधील दुरावा दूर करण्यात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाला यश आलेे.

लोकअदालतीतील वर्षभराचा तपशील


२२ मार्च २०२५ रोजी झालेल्या लोकअदालतीत ४ संसार जुळले. १० मे २०२५ रोजी ५ संसार पुन्हा एकत्र आले. १३ सप्टेंबर २०२५ रोजी ५ संसार जुळविण्यात यश मिळाले. १३ डिसेंबर २०२५ रोजी ५ संसार पुन्हा सुरळीत झाले. अशा प्रकारे वर्षभरात एकूण १९ संसार पुन्हा उभे राहिले.

गेल्या वर्षभरात झालेल्या चार लोकअदालतींमध्ये आम्हाला १९ जोडप्यांचे संसार पुन्हा जुळविण्यात यश आलेे. त्याचप्रमाणे आता पुन्हा जिल्हा प्रमुख व सत्र न्यायाधिश राजेंद्र सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन वर्षात १४ मार्च रोजी लोकअदालत होणार असून, ज्या जोडप्यांना आपला संसार टिकविण्याची आशा आहे, त्यांनी या लोकअदालतीचा नक्कीच लाभ घ्यावा.
- तेजस्विनी निराळे
Comments
Add Comment

Murud-Janjira Fort : मुरुड-जंजिरा किल्ल्यावर आता 'हायटेक' जेट्टी

मुरुड-जंजिरा : जागतिक पर्यटनाच्या नकाशावर असलेल्या ऐतिहासिक जंजिरा जलदुर्ग किल्ल्याच्या दर्शनासाठी येणाऱ्या

Raigad : भरडखोल बंदर प्रकल्पामुळे मच्छीमारांना मिळणार अत्याधुनिक सुविधा

श्रीवर्धन : महाराष्ट्रातील मच्छीमारांच्या सोयीसुविधांमध्ये वाढ करण्यासाठी आणि मत्स्यव्यवसायाला चालना

Raigad : रायगड जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील : पर्यटनमंत्री शंभूराज देसाई

मुंबई: रायगड जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी जिल्ह्यात सुरू असलेल्या पर्यटनांच्या कामांना गती

Tourists on Raigad's Beaches : रायगडच्या समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची विक्रमी गर्दी; समुद्रकिनारे पर्यटकांनी बहरले

रायगड : महाराष्ट्र दिनाची सुट्टी, त्याला जोडून आलेला शनिवार-रविवार आणि शाळांच्या परीक्षा संपल्यानंतर लागलेल्या

चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून भीषण अपघात, २५ वर्षीय चालकाचा चिरडून मृत्यू

श्रीवर्धन – श्रीवर्धन येथे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून भीषण अपघात घडल्याची घटना घडली आहे. म्हसळा

रायगड जिल्ह्यातील अंबा व कुंभे उदंचन जलविद्युत प्रकल्प क्षमतावाढीसाठी CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 'एनटीपीसी'शी सुधारित सामंजस्य करार

मुंबई : एनटीपीसी लिमिटेडच्या रायगड जिल्ह्यातील कुंभे व अंबा उदंचन जलविद्युत प्रकल्पांच्या स्थापित