लोकअदालतीतून वर्षभरात १९ संसारांचे पुनर्मिलन

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे समुपदेशन; तुटणाऱ्या नात्यांना नवसंजीवनी


अलिबाग: बदलती जीवनशैली, वाढता ताणतणाव, व्यसनाधीनता, आर्थिक अडचणी, संशय, संवादाचा अभाव तसेच शारिरिक व मानसिक छळ यांसारख्या विविध कारणांमुळे सध्या विवाहित जोडप्यांमध्ये कलह वाढताना दिसत आहे. किरकोळ वादातून सुरू झालेले मतभेद अनेकदा गंभीर स्वरूप धारण करून थेट घटस्फोटापर्यंत पोहोचत असल्याचे चित्र सर्वत्र दिसते. अशा परिस्थितीत तुटण्याच्या मार्गावर असलेल्या संसारांना वाचविण्यासाठी रायगड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने लोकअदालतीच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण पुढाकार घेत तुटणाऱ्या नात्यांना नवी दिशा लोकअदालतीतून मिळाली असून, वर्षभरात १९ संसार पुन्हा जुळले आहेत. जानेवारी ते डिसेंबर २०२५ या कालावधीत रायगड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या लोकअदालतींमधून तब्बल १९ विवाहित जोडप्यांचे संसार पुन्हा जुळविण्यात यश आले. घटस्फोटाच्या उंबरठ्यावर पोहोचलेली ही नाती समुपदेशन, संवाद आणि तडजोडीच्या माध्यमातून पुन्हा एकत्र आली असून, त्यामुळे संबंधित कुटुंबांचे भविष्य वाचले आहे. अनेकवेळा छोटे गैरसमज, अहंकार, संवादाचा अभाव आणि बाह्य हस्तक्षेप यामुळे वाद अधिक तीव्र होतात. हे वाद वेळेत मिटवले गेले नाहीत, तर त्याचे रुपांतर न्यायालयीन लढाईत होते. अशा प्रकरणांमध्ये पती-पत्नी घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज दाखल करतात. मात्र, अंतिम निर्णयापूर्वी ही प्रकरणे तडजोडीसाठी लोकन्यायालयात ठेवण्यात येतात. या न्यायालयीन वातावरणापेक्षा वेगळ्या, वातावरणात समुपदेशन केले जाते. दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून घेतले जाते. गैरसमज दूर करण्यासाठी संवाद साधला जातो. याच प्रक्रियेतून पती-पत्नींमधील दुरावा दूर करण्यात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाला यश आलेे.

लोकअदालतीतील वर्षभराचा तपशील


२२ मार्च २०२५ रोजी झालेल्या लोकअदालतीत ४ संसार जुळले. १० मे २०२५ रोजी ५ संसार पुन्हा एकत्र आले. १३ सप्टेंबर २०२५ रोजी ५ संसार जुळविण्यात यश मिळाले. १३ डिसेंबर २०२५ रोजी ५ संसार पुन्हा सुरळीत झाले. अशा प्रकारे वर्षभरात एकूण १९ संसार पुन्हा उभे राहिले.

गेल्या वर्षभरात झालेल्या चार लोकअदालतींमध्ये आम्हाला १९ जोडप्यांचे संसार पुन्हा जुळविण्यात यश आलेे. त्याचप्रमाणे आता पुन्हा जिल्हा प्रमुख व सत्र न्यायाधिश राजेंद्र सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन वर्षात १४ मार्च रोजी लोकअदालत होणार असून, ज्या जोडप्यांना आपला संसार टिकविण्याची आशा आहे, त्यांनी या लोकअदालतीचा नक्कीच लाभ घ्यावा.
- तेजस्विनी निराळे
Comments
Add Comment

Ambenali Ghat : आंबेनळी घाट ६ जुलैपर्यंत वाहनांसाठी बंद

अलिबाग : आंबेनळी घाट हा भूस्खलन, दरड कोसळणे आणि दगड घसरण्याच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक असून ही बाब लक्षात घेऊन

पनवेल-सीएसएमटी लोकलमध्ये मद्यधुंद प्रवाशाचा धिंगाणा; सहप्रवाशांना जीवे मारण्याच्या धमक्या

पनवेल : पनवेलहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) कडे जाणाऱ्या लोकलमध्ये मद्यधुंद अवस्थेतील एका प्रवाशाने

Voter List Update : मतदारयादी पुनरीक्षणाला वेग; ३० जूनपासून बीएलओंची घरभेट

रायगड : भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार रायगड जिल्ह्यात 'विशेष सखोल पुनरीक्षण २०२६' (SIR) मोहीम

Raigad Ropeway: रायगडावर जाणे होणार स्वस्त! रोपवेचे तिकीट ३५० रुपयांवरून ५०-१०० रुपयांपर्यंत कमी होणार

रायगड : किल्ले रायगडावर जाणाऱ्या शिवभक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र सरकारने रायगडावर नवीन रोपवे

Eknath Shinde : रायगड किल्ल्यावरून परतताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अपघातग्रस्त बाईक स्वाराला दिला मदतीचा हात

विचारपूस करत ताफ्यातील रुग्णवाहिकेतून नजीकच्या रुग्णालयात केले दाखल रायगड : छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५३

Eknath Shinde: रायगड किल्ल्यावरील पाण्याचे दुर्भिक्ष दूर करणार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही; शिवछत्रपतींचा ३५३ वा शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा मुंबई :