अवचित गडाचा मार्ग आता होणार सुखकर

खारापटीतील तरुणांनी केली रस्ता दुरुस्ती


रोहा : ऐतिहासिक वारसा असलेल्या अवचित गडावर जाणाऱ्या रस्त्याची पावसामुळे दुर्दशा होते. मात्र याकडे प्रशासनाचे नेहमीच दुर्लक्ष होत असल्याने दरवर्षी खारापटी गावांमधील गणेश आळी मित्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी स्वतःहून रस्ता दुरुस्तीची मोहीम हाती घेत,.' गड वाचवा, दुर्ग संवर्धन करा ' या भावनेतून मित्र मंडळीने रविवारी दिवसभर श्रमदान करून रस्त्यावरील खड्डे करण्याबरोबरच झाडीझुडपे साफ केली. गडावर प्रवेश करण्याआधी दहा ते पंधरा फूट लांबीची एक फांज लागते. ही फांज खोल असल्याकारणाने गडप्रेमींना गडावरती जाण्यास अडथळा निर्माण होत असतो; परंतु ही तरुण मंडळी दरवर्षी तिथे लाकडी पूल तयार करतात. गेल्या पावसाळ्यात दरडी कोसळल्यामुळे आणि पाण्याचा निचरा न झाल्यामुळे अवचित गडाकडे जाणाऱ्या पायवाटेवर आणि मुख्य रस्त्यावर मोठे खड्डे पडले होते. यामुळे पर्यटकांना आणि दुर्गप्रेमींना गडावर जाताना मोठा त्रास सहन करावा लागत होता. अनेकदा पर्यटक घसरून सुद्धा पडतात. संबंधित विभागाचे याकडे कायम दुर्लक्ष होत आहे.


खारापटी गावातील गणेश आळी मित्र मंडळीतील महेश चोरगे, जागृत पाटील, चेतन पाटील, शुभम पोकळे, कल्पेश पोकळे, रोहित सानप, केतन पीटनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली गडाच्या पायथ्याशी खारापटीतील इतर तरुण जमा झाले होते. कुदळ, फावडे आणि इतर साहित्यांसह त्यांनी रस्ता दुरुस्तीला सुरुवात केली.


रस्त्यावरील मोठे दगड बाजूला करणे, खड्डे मुरूम टाकून बुजवणे आणि वळणावरील अडथळा ठरणारी झुडपे काढण्याचे काम युद्ध पातळीवर करण्यात आले. छत्रपती शिवाजीमहाराजांचा वारसा जपणे हे आमचे कर्तव्य आहे. प्रशासनाच्या निर्णयाची वाट न पाहता, दुर्गप्रेमींना त्रास होऊ नये म्हणून आम्ही हे पाऊल उचलले आहे .


यापुढेही गडाच्या संवर्धनासाठी आम्ही सदैव तत्पर राहू अशी भावना गणेश आळी मित्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी 'दैनिक प्रहार'शी बोलताना सांगितले.

Comments
Add Comment

Raigad Ropeway: रायगडावर जाणे होणार स्वस्त! रोपवेचे तिकीट ३५० रुपयांवरून ५०-१०० रुपयांपर्यंत कमी होणार

रायगड : किल्ले रायगडावर जाणाऱ्या शिवभक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र सरकारने रायगडावर नवीन रोपवे

Eknath Shinde : रायगड किल्ल्यावरून परतताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अपघातग्रस्त बाईक स्वाराला दिला मदतीचा हात

विचारपूस करत ताफ्यातील रुग्णवाहिकेतून नजीकच्या रुग्णालयात केले दाखल रायगड : छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५३

Eknath Shinde: रायगड किल्ल्यावरील पाण्याचे दुर्भिक्ष दूर करणार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही; शिवछत्रपतींचा ३५३ वा शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा मुंबई :

Dam Water Levels : रायगड जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ

जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ नागरिकांसह शेतकऱ्यांना मोठा दिलासा अलिबाग : रायगड जिल्ह्यात मागील

RTI : माहिती अधिकार कायद्यात मोठे बदल; महाराष्ट्र शासनाचे नवे नियम लागू

रायगड : माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत अर्जदारांसाठी महाराष्ट्र शासनाने काही महत्त्वपूर्ण बदल लागू केले

Nitesh Rane : रायगड जिल्ह्यातील मच्छीमारांच्या समस्यांबाबत तातडीने कार्यवाही करा

मुंबई,  : रायगड जिल्ह्यातील आरसीएफ कंपनीच्या मरीन आउटफॉल लाईनमुळे निर्माण झालेल्या अडचणी दूर करण्यासाठी आवश्यक