जिल्ह्यातील १८१ आदिवासी वाड्या रस्त्याविना

अलिबाग : आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहासोबत आणण्याचा आणि त्यांचा सर्वांगीण विकास घडवून यावा, या उद्देशाने प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियानाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. यामध्ये रायगड जिल्ह्यातील ११३ गावांचा समावेश आहे. मात्र, हे अभियान राबवुनही आदिवासींची वाट आजही खडतरच आहे. रायगड जिल्ह्यातील १८१ आदिवासी वाड्यांवर आजही रस्ते नाहीत. निधी मंजूर असूनही आदिवासींची वाट आजही बिकटच असल्याच चित्र आहे.
आदिवासी समाज डोंगर-दऱ्यात वास्तव्य करीत असून, आजही हा समाज मुख्य प्रवाहापासून दूरच आहे. रस्ते, वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य या मूलभूत सुविधांपासून वंचित राहिलेला आहे. डोंगर दऱ्यात राहत असल्याने खाचखळग्यातून त्यांचा रोजच प्रवास करावा लागत आहे. रात्री-अपरात्री प्रवास करताना त्यांना अडचणीचे ठरत आहे. शासनाकडून आदिवासी समाजाच्या विकासासाठी नवनवीन योजना लागू केल्या जातात. मात्र, त्यांच्यापर्यंत त्या पोहचल्याच जात नाहीत. त्यामुळे आजही हा समाज सुधारणेपासून वंचित राहिला आहे. रायगड जिल्ह्यातील १८१ आदिवासी वाड्यांवर आजही रस्ते नाहीत. रस्त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर आहे. मात्र, तरीही रस्ते बांधण्यात आलेले नाहीत. काही ठिकाणी वन जमीन, तर काही ठिकाणी खासगी जमिनीची अडचण आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी आजही खाच खळग्याचे रस्ते आहेत, आदिवासी वाड्यांवर विजेचीही सुविधा अपुरी आहे. पाण्याचीही समस्या आहे. शिक्षणासाठी डोंगर-दऱ्या उतरून मुलांना शाळेत यावे लागत आहे. आरोग्यासाठीही त्यांना झगडावे लागत आहे. मात्र, गेली अनेक वर्षे आदिवासी वाड्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले असून, स्वातंत्र्यानंतरही आदिवासी समाज हा पारतंत्र्यात राहत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अभियान सुरू झालेले असले, तरी विकासाच्या गप्पा या कागदावरच राहिलेल्या दिसत आहेत. अभियान अंतर्गत किती रस्ते झाले याबाबत महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विभागाच्या कार्यकारी अभियंता सारिका देसाई यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.


प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्रामअभियान


आदिवासी बांधवांना पक्के घर देणे, बारमाही रस्ते, जल जीवन मिशन अंतर्गत प्रत्येक घरामध्ये नळाची सुविधा उपलब्ध करून देणे, प्रत्येक आदिवासी वाड्या-पाड्यांपर्यंत वीज सुविधा उपलब्ध करून देणे, जेथे जेथे शक्य आहे तेथे सौर विद्युत ऊर्जेद्वारे वीजपुरवठा उपलब्ध करून देणे, प्रत्येक वाडीतील प्रत्येक घरात एलपीजी गॅस जोडणी उपलब्ध करून देणे, तसेच अंगणवाडी केंद्र उभारून पोषण अभियान राबवणे या व यासारख्या अनेक सुविधांचा यात समावेश करण्यात येणार आहे.

Comments
Add Comment

MLA Prashant Thakur : आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त कामोठे येथे समाजोपयोगी वस्तूंचे वाटप

पनवेल : भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त

Cyber Crime : रायगड पोलिसांची सायबर टोळीवर मोठी कारवाई; ३५ कोटींच्या गैरव्यवहाराचा भंडाफोड

रायगड  : डिजिटल अरेस्ट, शेअर मार्केटमध्ये मोठ्या परताव्याचे आमिष आणि विविध ऑनलाइन माध्यमांतून नागरिकांची

Matheran Heritage Mini-Train : माथेरानच्या हेरिटेज मिनी ट्रेनला हायड्रोजन इंजिन जोडण्याची तयारी

माथेरान : ब्रिटिशकालापासून सह्याद्रीच्या निसर्गरम्य कुशीत नागमोडी वळणांवरून धावणारी जगप्रसिद्ध माथेरानची

Navi Mumbai International Airport : नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय सेवेला सुरुवात

पनवेल : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून बुधवारी आंतरराष्ट्रीय सेवेला सुरुवात झाली. याअंतर्गत एअर इंडिया

Vadkhal Bypass : वडखळ बायपासची दुरवस्था; अपूर्ण कामातच टोलवसुलीमुळे वाहनचालक संतप्त

रायगड : मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वडखळ बायपासची दुरवस्था दिवसेंदिवस गंभीर होत असून, पावसाळ्यात हा

Matheran's Honeymoon Point : माथेरानच्या हनिमून पॉईंट परिसरात बिबट्याचे दर्शन; सीसीटीव्हीत थरारक दृश्य कैद

रायगड : माथेरानच्या प्रसिद्ध हनिमून पॉईंट परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्याने पर्यटकांमध्ये उत्सुकता निर्माण