रिकामे हंडे घेऊन तीव्र आंदोलन व उपोषण

गौसखान पठाण


सुधागड-पाली : सुधागड तालुक्यातील दहीगाव बौद्धवाडी येथे पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. ही समस्या सोडवण्यासाठी तालुका वंचित बहुजन आघाडीतर्फे गटविकास अधिकारी विजय यादव यांना निवेदन देण्यात आले होते. मात्र, येथील पाणीप्रश्न सुटला नसल्याने गुरुवारी (ता. ७) वंचित बहुजन आघाडी पदाधिकारी व महिला आणि ग्रामस्थांनी रिकामे हंडे घेऊन पाली पंचायत समिती कार्यालयासमोर रिकामे हंडे घेऊन तीव्र आंदोलन केले. तसेच ग्रामस्थ रवी लोखंडे हे उपोषणास बसले होते. या वेळी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजीसुद्धा करण्यात आली.
दहिगाव बौद्धवाडी येथील ग्रामस्थ मागील दोन वर्षांपासून पाणीपुरवठा सुरळीत करण्याबाबत ग्रामपंचायत कार्यालयाशी संपर्क करत आहेत. मात्र ग्रामपंचायत ग्रामस्थांच्या पाणी प्रश्नावर गांभीर्याने विचार न करता केवळ उडवा-उडवीची उत्तरे देऊन हा विषय टाळत आहे. त्यामुळे या ग्रामस्थांचे पिण्याच्या पाण्यासाठीचे हाल होत आहेत. यासाठी त्यांना कोणाकडून तरी मागून पाणी आणावे लागत आहे. तसेच शासनाने १५ वित्त आयोगातून पाणीपुरवठ्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध केलेला असतानाही येथील पाणीपुरवठा योजना लांबणीवर टाकली जात असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे सुधागड तालुका अध्यक्ष अमित गायकवाड यांनी या वेळी केला.


या आंदोलनावेळी वंचित बहुजन आघाडी सुधागड तालुका अध्यक्ष अमित गायकवाड महासचिव आनंद जाधव, युवा अध्यक्ष राहुल गायकवाड, युवा महासचिव प्रशांत गायकवाड, मयूर गायकवाड, अनिकेत लोखंडे यासह नेते मंगेश वाघमारे, प्रमोद कदम, स्वप्नील गायकवाड, सचिन गायकवाड, रूपेश कदम व भागवत गायकवाड आदी पदाधिकारी महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.


‘लेखी आश्वासनाशिवाय मागे हटणार नाही’


या वेळी गटविकास अधिकारी विजय यादव, तहसीलदार दिलीप रायण्णावार, पंचायत समिती कृषी अधिकारी अशोक महामुनी आदी अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन चर्चा केली व यावर मार्ग काढला जाईल, असे सांगितले. मात्र आंदोलनकर्त्यांचे समाधान न झाल्याने ते आपल्या मागण्यांवर ठाम होते. ठोस व लेखी आश्वासन दिल्याशिवाय मागे हटणार नाही, असे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

मुंबई-विजयदुर्ग 'रोरो' सेवेचा आजपासून श्रीगणेशा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या शुभेच्छा

मुंबई: कोकणची लाल माती आणि अथांग अरबी समुद्र यांचे नाते आता अधिक घट्ट होणार आहे. गेल्या अनेक दशकांपासून ज्या

Narayan Rane : "आमच्यात कटुता असली तरी जिव्हाळा कायम!" भास्कर जाधवांनी व्यक्त केली राणे साहेबांबद्दलची कृतज्ञता;

'त्या' घटनेनंतर जुन्या आठवणींना उजाळा चिपळूण : राजकारणात एकमेकांवर तुटून पडणारे नेते, वैयक्तिक आयुष्यात

फोंडाघाटचा ‘किऱ्याचा आंबा’ होणार जमीनदोस्त

कणकवली : फोंडाघाट, हवेलीनगर येथील शेकडो वर्षांपूर्वीचे ऐतिहासिक अधिष्ठान आणि मार्गदर्शक आख्यायिका, तसेच

कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

उद्यापर्यंत ब्लॉक रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरील धावणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले असून पुढील

‘वलसाड हापूस’ या नावाने स्वतंत्र मानांकनांसाठी गुजरात प्रयत्नशील

मुंबई : हापूस आंबा म्हटले की, कोकण किनारपट्टीवर उत्पादित होणारा गोड, चविष्ट आणि सुवासिक आंबा सर्वांच्या

Anganewadi Jatra 2026 : भराडी देवीचा 'कौल' मिळाला! लाखो भाविकांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम; आंगणेवाडी जत्रेची तारीख अखेर ठरली!

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या आणि कोकणातील सर्वात महत्त्वाची यात्रा समजल्या जाणाऱ्या मालवण