दिल्लीत झोपडपट्टीला लागलेल्या आगीत सात जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील गोकुळपुरी भागात शुक्रवारी रात्री उशिरा भीषण आग लागली. या अपघातात आतापर्यंत ७ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १३ गाड्या दाखल झाल्या. आग आटोक्यात आल्याचे अग्निशमन विभागाने सांगितले.


पूर्व दिल्लीचे अतिरिक्त डीसीपी म्हणाले की, "रात्री एक वाजता गोकुळपुरी पोलीस स्टेशन परिसरात आग लागली. सर्व बचाव उपकरणांसह पथके तात्काळ घटनास्थळी पोहोचली. आम्ही अग्निशमन दलाशी देखील संपर्क साधला, त्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. जवळपास चार वाजेपर्यंत आग आटोक्यात आणण्यात यश आले. या आगीच्या घटनेत अनेक झोपडपट्ट्या जळून खाक झाल्या असून ७ जणांना प्राण गमवावे लागले आहेत."


याचबरोबर, दिल्ली अग्निशमन दलाचे संचालक अतुल गर्ग यांनाही आगीची माहिती दिले आहे. ते म्हणाले, "आम्ही ७ जळालेले मृतदेह बाहेर काढले, ज्यांची ओळख पटलेली नाही. असे दिसते की हे लोक झोपले होते आणि आग खूप वेगाने पसरली म्हणून ते बाहेर पडू शकले नाहीत. तसेच 60 झोपड्या पूर्णपणे जळून खाक झाल्या आहेत. आम्हाला अद्याप या आगीचे कारण समजू शकले नाही"


मुख्यमंत्री केजरीवाल यांनी व्यक्त केला शोक


दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आगीच्या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. सकाळी ही दुःखद बातमी ऐकली. मी स्वतः घटनास्थळी जाऊन पीडितांना भेटणार आहे, असल्याचे अरविंद केजरीवाल यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे.

Comments
Add Comment

राहुल गांधींचा 'मतदारचोरी'चा आरोप निवडणूक आयोगाने फेटाळला; 'ऑनलाइन' मतदान वगळणे शक्य नाही

नवी दिल्ली: कर्नाटकच्या आळंद मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात मतदार वगळल्याचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा

काँग्रेस समर्थकांची नावं मतदारयादीतून गायब केली जातात, राहुल गांधींचा नवा आरोप

नवी दिल्ली : लोकसभेच्या तसेच महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी मतांची चोरी करण्यात आल्याचा आरोप राहुल

आता 'ईव्हीएम' मतपत्रिकेवर उमेदवारांचे रंगीत फोटो; बिहारमधून सुरुवात

नवी दिल्ली: निवडणुकीदरम्यान मतदारांना स्पष्टता मिळावी आणि गोंधळ कमी व्हावा या उद्देशाने 'भारतीय निवडणूक

'राहुल गांधींनी काढली घुसखोर वाचवा यात्रा'

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त राजधानी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात

लिओनेल मेस्सीने पंतप्रधान मोदींना पाठवली वाढदिवसाची 'ही' खास भेट

नवी दिल्ली: आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशभर ७५ वा वाढदिवस साजरा होत आहे. वेगवेगळ्या

केरळमध्ये 'ब्रेन-इटिंग अमीबा'चा हाहाकार; १८ जणांचा बळी, ही लक्षणे दिसल्यास तातडीने व्हा सावधान!

नवी दिल्ली : केरळमध्ये पुन्हा एकदा 'ब्रेन-इटिंग अमीबा' (Brain-Eating Amoeba) चा धोका वाढला असून, या वर्षी या जीवघेण्या संसर्गाचे