भिवंडी (वार्ताहर) : भिवंडी शहरातील स्व. राजीव गांधी उड्डाणपूल भिवंडीच्या प्रथम नागरिक महापौर प्रतिभा विलास पाटील व भिवंडी महानगरपालिकेच्या आयुक्त डॉ. सुधाकर देशमुख यांनी हिरवा झेंडा दाखवून वाहनांसाठी खुला केला आहे.
या उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्यामुळे हा उड्डाणपूल मागील अनेक महिन्यांपासून दुरुस्तीसाठी बंद होता. मात्र आता हा उड्डाणपूल वाहनांसाठी खुला करण्यात आला आहे; परंतु कोट्यवधी रुपये खर्च करूनसुद्धा या उड्डाणपुलावरून अवजड वाहनांची बंदी असल्याने वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागणार हे निश्चित झाले आहे.
८ कोटींहून अधिक खर्च या उड्डाणपुलाच्या दुरुस्तीसाठी करूनही या उड्डाणपुलावरून अवजड वाहनांची वाहतूक पूर्ण होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना वाहतूक कोंडीतून थोडा दिलासा जरी मिळाला असला, तरी कोट्यवधी रुपये खर्च करूनसुद्धा या उड्डाणपुलावरून अवजड वाहनांची वाहतूक होत नसल्याने नागरिकांमध्ये व अवजड वाहनचालकांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
उड्डाणपुलावर फक्त सिमेंट काँक्रेट व डांबरी रस्ते तयार करण्यात आले आहेत. कोणत्याही प्रकारची रंगरंगोटी या उड्डाणपुलाला केली नाही, असे दिसून येत आहे. या उड्डाणपुलाच्या दुरुस्तीनंतर हिरवा झेंडा दाखवत हा उड्डाणपूल खुला करण्यात आला आहे.
या वेळी महापौर प्रतिभा विलास पाटील, आयुक्त डॉ. सुधाकर देशमुख उपमहापौर इम्रान वली खान, अॅड. मयुरेश पाटील, जनसंपर्क अधिकारी मिलिंद पळसुले आदी उपस्थित होते.
दिवसभर तुमची त्वचा ताजी राहील मुंबई: उन्हाळ्यात आपण आपल्या त्वचेची काळजी घेतली पाहिजे. कारण आता…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान सागरी तसेच भू सीमा मोठी आहे. भू…
मुंबई : महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या आणि जम्मू कश्मीर मध्ये दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर तिथे अडकलेल्या…
मुंबई(ज्ञानेश सावंत): राजस्थानने सलग चार सामने गमावले आहेत त्यापैकी तीन सामने अगदी थोड्या अंतराने गमावले…
महापालिकेच्या वतीने पाणीपुरवठ्याची कामे हाती घेतली जाणार मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेतर्फे घाटकोपर (पश्चिम) येथे…
ठाणे (प्रतिनिधी) : उष्म्याने ठाणेकर भलतेच हैराण झाले असून, एप्रिल महिन्यात उन्हाचा तडाखा वाढत चालला…