कोरोनाविरुद्धचा लढा तीव्र

तलासरी (वार्ताहर) :राज्यात कोरोना व ओमायक्रॉनचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य शासनाने नवीन निर्बंध घेतले आहेत. रविवारी मध्यरात्रीपासून संपूर्ण राज्यासह पालघर जिल्ह्यात नियमावलीचे काटेकोर पालन व अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. खुद्द तलासरी तहसीलदार श्रीधर गल्लीपिल्ले हे या नियमांच्या अमंलबजावणीसाठी रस्त्यावर उतरले असून बाजारपेठेतील आस्थापने, सलून, मॉल, किराणा दुकाने इत्यादी ठिकाणी सामाजिक अंतर, मास्क न वापरणाऱ्यांवर त्यांनी दंडात्मक कारवाई केली. कोरोनाविषयक निर्बंधांचे काटेकोर पालन करण्यासाठी तहीसलदार स्वतः अॅक्शन मोडमध्ये दिसले.



तहसीलदार गल्लीपिल्ले महसूल कर्मचारी व नगरपंचायत कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन लाऊड स्पीकरच्या सहाय्याने सामाजिक अंतर व चेहऱ्यावर मास्क वापरण्याचे आवाहन नागरिकांना करत आहेत. या नियमांचे पालन न केल्यास दंड आकारण्यात येऊन कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी िदला आहे. संपूर्ण बाजारपेठेत गाव-पाड्यातून नागरिक बाजारपेठेत येत असतात. नागरिकांमध्ये ओमायक्रॉन व कोरोनाविषयी जागृती निर्माण करण्याकरिता तहसीलदारांंच्या आदेशाने बाजारपेठेमध्ये जागोजागी लाऊड स्पीकर लावण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे तालुक्यातील खासगी दवाखाने, रुग्णालये या ठिकाणी अँटिजेन टेस्ट किटचे वाटप करण्यात आले.


खासगी डॉक्टरांकडे येणाऱ्या रुग्णांची अँटिजेन टेस्ट करून पॉझिटिव्ह रुग्णाची माहिती आरोग्य विभागास देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पण खासगी डॉक्टर पैशाच्या लोभासाठी थंडी-ताप-खोकल्याच्या आजारावर मनमानी उपचार करीत असून आरोग्य विभागाचे याकडे दुर्लक्ष आहे. नगरपंचायत हद्दीतील आठवडी बाजारात सोमवारी तोबा गर्दी असते. हे ध्यानी घेऊन आठवडी बाजारातील फेरीवाल्यांना मास्क वापरणे अनिवार्य करण्यात आले असून मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश तहसीलदारांनी दिले आहेत. तथापि, आठवडी बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता जास्त आहे, परिणामी हा आठवडी बाजार बंद ठेवण्याची कार्यवाही तहसीलदारांनी सुरू केली आहे.



कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी नियमांच्या काटेकोर अंमलबाजवणीसाठी तालुका दंडाधिकारी तथा तहसीलदार रस्त्यावर उतरले आहेत. त्यांना पोलीस प्रशासनाचे सहकार्य अपेक्षित आहे; परंतु पोलीस कर्मचारी इतर कामात व्यग्र असल्याने तहसीलदारांना म्हणावे तितके सहकार्य मिळत नाही. परिणामी लोकांना अद्याप वचक बसलेला नाही.

Comments
Add Comment

Crime News : आधी कार आता दुचाकी जळून खाक, अहिल्यानगरात काय घडतंय ? CCTV तील 'ते' दृश्य पाहून संशय बळावला

Crime News :  अहिल्यानगर शहरात वाहनांना लक्ष्य करून आग लावण्याच्या घटना सुरूच असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Jalgaon : भीषण अपघातामुळे वाटेतच काळाची झडप, १ वर्षाच्या चिमुकलीसह चौघांचा हृदयद्रावक अंत

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील वरणगावजवळ मुंबई-नागपूर महामार्गावरील (Mumbai-Nagpur Highway) बायपासवर थरारक अशी भीषण रस्ते अपघाताची

Crime News : शिट्टी वाजवली, उसाच्या शेतातून 10 ते 12 जण बाहेर आले, अन.... स्वस्तात सोने मिळण्याचे आमिष महागात पडले

अहिल्यानगर : स्वस्तात सोने मिळणार असल्याचं आमिष दाखवत रायगडच्या जिल्हा परिषद सदस्यालाच सापळ्यात ओढून तब्बल 52

Kolhapur News : कोल्हापूरात कोल्ह्याची दहशत! साडेतीन वर्षांच्या चिमुकल्यासह ११ जण जखमी; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांच्या (Attack) घटना सातत्याने समोर येत असताना आता

Yavatmal Murder Case : ‘गिफ्ट लवकरच पाठवतो’... स्टेटस ठेवला अन् घरात घुसून सपासप वार; तरुणाची निर्घृण हत्या

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून गुन्हेगारांचे प्रमाण वाढत चालले आहे. अशातच आणखी एका हत्येची घटना समोर आली

Navi Mumbai Airport Shivaji Maharaj Statue : नवी मुंबई विमानतळावर शिवरायांचा भव्य पुतळा! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते १२ फूट उंच कांस्य अर्धपुतळ्याचे अनावरण

नवी मुंबई : महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य १२ फूट उंच कांस्य