...अन्यथा वेंगुर्ले रुग्णालयातील बाह्यरुग्ण तपासणी सोमवारपासून बंद

वेंगुर्ले (प्रतिनिधी) : शिरोडा उपजिल्हा रुग्णालय येथील औषधनिर्माण अधिकारी दिनेश राणे यांची प्रशासकीय बदली वेंगुर्ले ग्रामीण रुग्णालय येथे झालेली आहे, मात्र त्यांना अद्यापपर्यंत कार्यमुक्त केलेले नाही. तरी त्यांना त्यांच्या पदावर तत्काळ रुजू करावे अन्यथा सोमवारपासून वेंगुर्ले ग्रामीण रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागाची सेवा बंद होणार असल्याचे पत्र अधिपरिचारिकांनी आरोग्य सहसंचालकांना लेखी स्वरूपात दिले आहे.



रुग्णालयात औषधनिर्माण अधिकारी हे पद रिक्त असल्याने अधिपरिचारीकांजवळ औषधनिर्माण अधिकारी यांचा कार्यभार दिलेला आहे. त्यामुळे रुग्णपत्रक काढणे, औषध वितरीत करणे ही कामे अधिपरिचारीकांना करावी लागतात, पण ती त्यांच्या कर्तव्यामध्ये येत नाहीत. अधिपरिचारीकांना त्यांच्या नेमून दिलेल्या रुग्णसेवेसंबंधीच्या कामाव्यतिरिक्त कोणतेही काम सोपविण्यात येऊ नये, अशा शासनाच्या स्पष्ट सूचना आहेत. मात्र, सदर पदावर कार्यभार सांभाळणाऱ्या अधिपरिचारिकांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे यापुढे कोणतीही परिचारीका सदरचा कार्यभार सांभाळण्यास तयार नाही.



याला वेंगुर्ले येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. अतुल मुळे यांनी दुजोरा दिला असून त्यांनी तत्काळ जिल्हा शल्य चिकित्सक सिंधुदुर्ग व आरोग्य सहसंचालक कोल्हापूर यांनी यामध्ये लक्ष घालून हा प्रश्न सोडवावा अशी मागणी केली आहे.
दरम्यान अधिपरीचारिका यांच्या आंदोलनामुळे वेंगुर्ले रुग्णालयाची गैरसोय होणार आहे. तरी या संबंधित जिल्हा शल्यचिकित्सक काय निर्णय घेतात, त्यावरच रुग्णसेवा बंद होणार की नाही ते ठरणार आहे.

Comments
Add Comment

मुंबई लोकलमध्ये नियम कडक; मासिक पाससाठी लागू होणार 'हे' कडक नियम

मुंबई : लोकलमध्ये विनातिकिट किंवा बनावट तिकिटांचा वापर करुन प्रवास करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी रेल्वे

सिडको घरांच्या किंमतीवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नाराजी; 'हे चालणार नाही, गरिबांसाठी ती घरं आहेत' बैठकीत स्पष्ट निर्देश

नागपूर: सिडको अंतर्गत बांधण्यात आलेल्या घरांच्या किंमतींमध्ये केलेल्या मोठ्या वाढीवरून निर्माण झालेल्या

जमिनीच्या अकृषिक वापरानंतर आता ‘सनद’ची अटही रद्द!

नागपूर : राज्यातील जमीन महसूल प्रक्रियेत सुलभता आणण्यासाठी राज्य सरकारने आणखी एक महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे.

मालवणीत २०१० नंतर विशिष्ट धर्मियांची लोकसंख्या २० टक्क्यांवरून ३६ टक्क्यांपर्यंत कशी वाढली? - मंत्री मंगल प्रभात लोढा यांता काँग्रेस आमदार अस्लम शेख यांना सवाल

नागपूर : मुंबईतील मालाड-मालवणी भागात गेल्या १४ वर्षांत एका विशिष्ट समाजाची लोकसंख्या २० टक्क्यांवरून ३६

चालान न भरणाऱ्या वाहनांना पेट्रोल-डिझेल मिळणार नाही ? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सभागृहात मोठी घोषणा

नागपूर: महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. आजच्या कामकाजात विधान परिषदेत नियम

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान स्थळ ते समाधी स्थळापर्यंतनवीन रस्ता निर्मितीस मान्यता

तुळापूर व वढू बुद्रुक येथील विकास आराखड्यात ग्रामस्थांच्या सूचना लक्षात घेण्यात याव्यात - मुख्यमंत्री