...अन्यथा वेंगुर्ले रुग्णालयातील बाह्यरुग्ण तपासणी सोमवारपासून बंद

  69

वेंगुर्ले (प्रतिनिधी) : शिरोडा उपजिल्हा रुग्णालय येथील औषधनिर्माण अधिकारी दिनेश राणे यांची प्रशासकीय बदली वेंगुर्ले ग्रामीण रुग्णालय येथे झालेली आहे, मात्र त्यांना अद्यापपर्यंत कार्यमुक्त केलेले नाही. तरी त्यांना त्यांच्या पदावर तत्काळ रुजू करावे अन्यथा सोमवारपासून वेंगुर्ले ग्रामीण रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागाची सेवा बंद होणार असल्याचे पत्र अधिपरिचारिकांनी आरोग्य सहसंचालकांना लेखी स्वरूपात दिले आहे.



रुग्णालयात औषधनिर्माण अधिकारी हे पद रिक्त असल्याने अधिपरिचारीकांजवळ औषधनिर्माण अधिकारी यांचा कार्यभार दिलेला आहे. त्यामुळे रुग्णपत्रक काढणे, औषध वितरीत करणे ही कामे अधिपरिचारीकांना करावी लागतात, पण ती त्यांच्या कर्तव्यामध्ये येत नाहीत. अधिपरिचारीकांना त्यांच्या नेमून दिलेल्या रुग्णसेवेसंबंधीच्या कामाव्यतिरिक्त कोणतेही काम सोपविण्यात येऊ नये, अशा शासनाच्या स्पष्ट सूचना आहेत. मात्र, सदर पदावर कार्यभार सांभाळणाऱ्या अधिपरिचारिकांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे यापुढे कोणतीही परिचारीका सदरचा कार्यभार सांभाळण्यास तयार नाही.



याला वेंगुर्ले येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. अतुल मुळे यांनी दुजोरा दिला असून त्यांनी तत्काळ जिल्हा शल्य चिकित्सक सिंधुदुर्ग व आरोग्य सहसंचालक कोल्हापूर यांनी यामध्ये लक्ष घालून हा प्रश्न सोडवावा अशी मागणी केली आहे.
दरम्यान अधिपरीचारिका यांच्या आंदोलनामुळे वेंगुर्ले रुग्णालयाची गैरसोय होणार आहे. तरी या संबंधित जिल्हा शल्यचिकित्सक काय निर्णय घेतात, त्यावरच रुग्णसेवा बंद होणार की नाही ते ठरणार आहे.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या