मेट फॉर्म कंपनी कामगारांना पगारवाढ

कुडूस/वाडा (वार्ताहर) : तालुक्यातील चिंचघर ग्रामपंचायतीच्या हद्दीत मेट फॉर्म ही कंपनी असून या कंपनीत लोखंडाचे उत्पादन केले जाते. गेल्या २० वर्षांपासून या कंपनीत काम करत असलेल्या कामगारांना कामगार कायद्याप्रमाणे किमान वेतन व इतर सोयी सुविधा मिळत नव्हत्या. अखेर केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे व महाराष्ट्र समर्थ कामगार संघटनेचे अध्यक्ष आमदार नितेश राणे यांच्या मार्गदर्शनानुसार सातत्याने कंपनीत बैठका घेऊन कामगार, कंपनी मालक व कंपनी व्यवस्थापक यांच्यासोबत चर्चा करून कामगारांना पगारवाढ मिळवून दिली आहे.

तालुक्यातील चिंचघर ग्रामपंचायत हद्दीतील मेट फॉर्म कंपनीतील १७ कामगारांना महाराष्ट्र समर्थ कामगार संघटनेच्या माध्यमातून पगारवाढ मिळाली असून या कामगार संघटनेच्या प्रयत्नांना यश आले आहे.

पगारवाढीच्या झालेल्या बैठकीस कामगार संघटनेचे सेक्रेटरी विश्वनाथ दळवी, उपाध्यक्ष जितेश (बंटी) पाटील, कंपनीचे मालक देवांक ठक्कर, व्यवस्थापक मधुकर रसाळ, स्वाभिमान संघटनेचे तालुकाध्यक्ष रविंद्र मेणे आदि उपस्थित होते.

येथील कामगारांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणे, समर्थ कामगार संघटनेचे सेक्रेटरी विश्वनाथ दळवी व संघटनेचे उपाध्यक्ष जितेश पाटील तसेच स्वाभिमान संटनेचे तालुका अध्यक्ष रवींद्र मेणे यांचे आभार मानत आनंद व्यक्त केला.
Comments
Add Comment

लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी प्रक्रियेस ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत मुदतवाढ

मुंबई - मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील महिलांची ई-केवायसी प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर सुरू असताना, अलिकडे

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात थंडीची लाट; कोणत्या शहरांमध्ये गारठा वाढणार? हवामान विभागाचा ताजा अंदाज!

मुंबई : राज्यातील बहुतांश भागात थंडीचा जोर वाढत असल्याचे हवामान विभागाच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. अनेक

विश्वास नांगरे पाटील यांना मातृशोक; मंगल नांगरे पाटील यांचे निधन

मुंबई : महाराष्ट्राचे अतिरिक्त पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांना मातृशोक झाला आहे. त्यांच्या मातोश्री

मुलांच्या तिकीट बुकिंगच्या नियमात बदल ५-१२ वर्षे वयादरम्यान तिकिटाचे धोरण ठरणार

मुंबई : भारतीय रेल्वेच्या २०२५ च्या बाल तिकीट धोरणानुसार ५ वर्षांखालील मुले स्वतंत्र बर्थ किंवा सीट न घेता

उबाठा युवा सेनेतील ३०० कार्यकर्ते शिंदे गटात

मुंबई : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलताना

ला निनाच्या प्रभावामुळे यंदा मुंबईकर गारठणार

मुंबई : नोव्हेंबरमध्ये उत्तर भारतात थंडीची सुरुवात झाल्यानंतर तिचा प्रभाव आता महाराष्ट्रातही जाणवू लागला आहे.