मेट फॉर्म कंपनी कामगारांना पगारवाढ

कुडूस/वाडा (वार्ताहर) : तालुक्यातील चिंचघर ग्रामपंचायतीच्या हद्दीत मेट फॉर्म ही कंपनी असून या कंपनीत लोखंडाचे उत्पादन केले जाते. गेल्या २० वर्षांपासून या कंपनीत काम करत असलेल्या कामगारांना कामगार कायद्याप्रमाणे किमान वेतन व इतर सोयी सुविधा मिळत नव्हत्या. अखेर केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे व महाराष्ट्र समर्थ कामगार संघटनेचे अध्यक्ष आमदार नितेश राणे यांच्या मार्गदर्शनानुसार सातत्याने कंपनीत बैठका घेऊन कामगार, कंपनी मालक व कंपनी व्यवस्थापक यांच्यासोबत चर्चा करून कामगारांना पगारवाढ मिळवून दिली आहे.

तालुक्यातील चिंचघर ग्रामपंचायत हद्दीतील मेट फॉर्म कंपनीतील १७ कामगारांना महाराष्ट्र समर्थ कामगार संघटनेच्या माध्यमातून पगारवाढ मिळाली असून या कामगार संघटनेच्या प्रयत्नांना यश आले आहे.

पगारवाढीच्या झालेल्या बैठकीस कामगार संघटनेचे सेक्रेटरी विश्वनाथ दळवी, उपाध्यक्ष जितेश (बंटी) पाटील, कंपनीचे मालक देवांक ठक्कर, व्यवस्थापक मधुकर रसाळ, स्वाभिमान संघटनेचे तालुकाध्यक्ष रविंद्र मेणे आदि उपस्थित होते.

येथील कामगारांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणे, समर्थ कामगार संघटनेचे सेक्रेटरी विश्वनाथ दळवी व संघटनेचे उपाध्यक्ष जितेश पाटील तसेच स्वाभिमान संटनेचे तालुका अध्यक्ष रवींद्र मेणे यांचे आभार मानत आनंद व्यक्त केला.
Comments
Add Comment

मध्य रेल्वेद्वारे दिवाळी आणि छठ उत्सवानिमित्त विशेष सेवा

मुंबई (प्रतिनिधी): मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक विजय कुमार यांनी सांगितले की, मध्य रेल्वेद्वारे २८ ऑक्टोबर २०२५

आजपासून मुंबईत 'इंडिया मेरीटाईम सप्ताह', केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई (प्रतिनिधी) : शंभराहून अधिक देशातील एक लाखापेक्षा अधिक प्रतिनिधी, ५०० प्रदर्शक, २०० पेक्षा अधिक तज्ज्ञ

दिवाळीनंतर मुंबई–पुणे–कोल्हापूर मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा !

मुंबई : दिवाळी सुट्टीनंतर परतीचा प्रवास आता मुंबई, पुणे आणि कोल्हापूरकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर मोठी

सलमान खानच्या रियाधमधील भाषणावर वाद: पाकिस्तानच्या दहशतवादी यादीत नाव असल्याचे दावे खोटे

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या अलीकडील एका आंतरराष्ट्रीय कार्यक्रमातील विधानामुळे सोशल मीडियावर वाद

समुद्रात जाणे टाळा ! हवामान विभागाचा मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा

मुंबई : राज्यातील सागरकिनाऱ्यावरील सर्व मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा: मुंबई आणि कोकणात जोरदार पावसाचा इशारा

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार,