मेट फॉर्म कंपनी कामगारांना पगारवाढ

कुडूस/वाडा (वार्ताहर) : तालुक्यातील चिंचघर ग्रामपंचायतीच्या हद्दीत मेट फॉर्म ही कंपनी असून या कंपनीत लोखंडाचे उत्पादन केले जाते. गेल्या २० वर्षांपासून या कंपनीत काम करत असलेल्या कामगारांना कामगार कायद्याप्रमाणे किमान वेतन व इतर सोयी सुविधा मिळत नव्हत्या. अखेर केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे व महाराष्ट्र समर्थ कामगार संघटनेचे अध्यक्ष आमदार नितेश राणे यांच्या मार्गदर्शनानुसार सातत्याने कंपनीत बैठका घेऊन कामगार, कंपनी मालक व कंपनी व्यवस्थापक यांच्यासोबत चर्चा करून कामगारांना पगारवाढ मिळवून दिली आहे.

तालुक्यातील चिंचघर ग्रामपंचायत हद्दीतील मेट फॉर्म कंपनीतील १७ कामगारांना महाराष्ट्र समर्थ कामगार संघटनेच्या माध्यमातून पगारवाढ मिळाली असून या कामगार संघटनेच्या प्रयत्नांना यश आले आहे.

पगारवाढीच्या झालेल्या बैठकीस कामगार संघटनेचे सेक्रेटरी विश्वनाथ दळवी, उपाध्यक्ष जितेश (बंटी) पाटील, कंपनीचे मालक देवांक ठक्कर, व्यवस्थापक मधुकर रसाळ, स्वाभिमान संघटनेचे तालुकाध्यक्ष रविंद्र मेणे आदि उपस्थित होते.

येथील कामगारांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणे, समर्थ कामगार संघटनेचे सेक्रेटरी विश्वनाथ दळवी व संघटनेचे उपाध्यक्ष जितेश पाटील तसेच स्वाभिमान संटनेचे तालुका अध्यक्ष रवींद्र मेणे यांचे आभार मानत आनंद व्यक्त केला.
Comments
Add Comment

Ajit Pawar : अजित पवारांच्या निधनावर 'या' प्रसिद्ध युट्युबरने केले असे काही की थेट झाली जेल वारी

मुंबई : २८ जानेवारी २०२६ महाराष्ट्रासाठी काळा दिवस ठरला. बारामतीमध्ये एका विमानाचा अपघात झाला आणि संपूर्ण

Mumbai 'MB3' Data : मुख्यमंत्रीडेटा ट्रॅफिक'ची कोंडी फुटणार

'इक्विनिक्स'ची मुंबईत मोठी गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ६ हजार कोटींच्या 'एमबी३' डेटा सेंटरचे

Mumbai BJP President MLA Amit Satam : बीएमसीकडून सर्व आरोग्यविषयक खरेदी GeM पोर्टलद्वारे केली जाणार – मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमीत साटम

बीएमसी रुग्णालयांमधील उपलब्ध खाटांची रिअल-टाइम माहिती दर्शविण्यासाठी ऑनलाइन डॅशबोर्ड विकसित केला जाणार;

Middle East War : युद्धविरामाच्या घोषणेमुळे कच्च्या तेलाच्या किमतीत १७ टक्क्यांची घसरण

मुंबई : अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धात युद्धविरामाची घोषणा झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय

Pod Taxi : लवकरच मुंबईत धावणार भारतातील पहिली 'पॉड टॅक्सी'

मुंबई : मुंबई शहरं हे कधीच विश्रांती घेत नाही इथे २४ तास सतत वर्दळ पाहायला मिळते असते. मुंबईत लोकांची गर्दी

Bmc News : मुंबईत ई-कचरा व्यवस्थापनासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारा

महापालिकेत ठरावाच्या सूचनेद्वारे झाली मागणी मुंबई : शहरात झपाट्याने वाढणाऱ्या ई-कचऱ्याच्या समस्येवर तोडगा