रत्नागिरी विमानतळासाठी होणार १८ एकर भूसंपादन

  455

रत्नागिरी  : रत्नागिरी विमानतळाच्या विस्तारीकरण आणि खासगी विमान वाहतुकीच्या दृष्टीने सुरू असलेल्या कामाला गती मिळाली आहे. यासाठी तालुक्यातील तिवंडेवाडीतील सुमारे १८.६८७ एकर खासगी जमीन संपादित करण्यात येणार आहे. त्यासाठीची अधिसूचना सोमवारी जाहीर करण्यात आली.


यामध्ये रत्नागिरी विमानतळ येथे डॉप्लर व्हेरी फ्रिक्वेंन्सी ओम्री डायरेक्शनल रेडिओ रेंज ही यंत्रणा कार्यान्वित केली जाणार असून विमानतळासाठी आवश्यक पॅरॉलल टॅक्सी ट्रॅक निर्माण करण्यात येणार आहे. येणाऱ्या विमानाला तत्काळ धावपट्टी रिकामी करून देण्यास त्याचा फायदा होणार आहे. संस्थापित नेविगेशनला या उपकरणामुळे विमानांशी हवाई संपर्क साधता येणार आहे.


रत्नागिरी विमानतळ काही वर्षे तटरक्षक दलाच्या ताब्यात आहे. सागरी किनापट्टीच्या सुरक्षेसाठी गोवा ते मुंबई या दरम्यान मध्यवर्ती ठिकाण म्हणून रत्नागिरी जिल्ह्यात दलाचा तळ उभारण्यात आला आहे. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा तळ अतिशय महत्त्वाचा आहे. काही वर्षांपासून त्याचे विस्तारीकरण सुरू आहे. धावपट्टीचे काम पूर्ण झाले असले तरी अनेक प्रश्न कायम आहेत.


मात्र काही अडचणी अजूनही कायम आहेत. दुसरे विमान आले तर धावपट्टी रिकामी असणे आवश्यक आहे. म्हणून विमान पार्किंगला मोठी जागा लागणार आहे. त्यासाठी तेथील चव्हाण यांची जमीन करारावर वापरण्यास घेण्याची मागणी करण्यात आली होती. त्याची प्रक्रिया सुरू असताना आता जिल्हा प्रशासनाने तालुक्यातील तिवंडेवाडी येथील १८.६७८ एकर खासगी जमीन संपादित करण्याची अधिसूचना जारी केली आहे. बाधित क्षेत्रात निवासी जागांचा अंतर्भाव होत नाही म्हणून बाधित कुटुंबाच्या विस्थापनाचा व पुनर्वसनाचा प्रश्न येथे उद्भवणार नाही.




पर्यटन, उद्योगांना प्रोत्साहन



प्रवासी वाहतुकीसाठी विमानतळ रिजनल कनेक्टीव्हिटी स्कीम (आरसीएस) योजनेअंतर्गत समाविष्ट करण्यात आले आहे. यामुळे एकंदरच पर्यटन, उद्योग व विमान वाहतूक यांना प्रोत्साहन मिळून रत्नागिरीत विकासाच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहेत.

Comments
Add Comment

एसटी महामंडळाच्या राखी पौर्णिमेसाठी ४० जादा गाड्या कार्यरत

लाडक्या बहिणींसाठी ८, ९ आणि ११ ऑगस्ट रोजी बसची विशेष सेवा पेण(स्वप्नील पाटील) : आधीच लाडक्या बहिणींना एसटी

राज्यातील ५ ज्योतिर्लिंग विकास आराखड्यांसाठी सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती

नियमितपणे आढावा, समन्वय साधणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश मुंबई : राज्यातील पाच

माधुरी लवकरच कोल्हापूरला परतणार!

कोल्हापूरकरांच्या लढ्याला यश; माधुरीला परत पाठवण्याबाबत वनताराकडून आश्वासन कोल्हापूर: कोल्हापूरकरांच्या

उत्तराखंडमधील ढगफुटीत अडकले महाराष्ट्रातील ५१ पर्यटक

सर्व पर्यटक सुखरूप असल्याची राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती मुंबई : उत्तराखंडमधील राज्यातील उत्तरकाशी

Hingoli Train Fire : हिंगोली रेल्वे स्थानकावर उभ्या बोगीला भीषण आग; संपूर्ण बोगी जळून खाक

हिंगोली : हिंगोली शहरातील रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या एका जुन्या बोगीला बुधवारी (६ ऑगस्ट) सकाळी सुमारे ८:३०

खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नांना यश, कोकण रेल्वेच्या रो - रो कार सेवेला नांदगावात थांबा

कोकण रेल्वे प्रवासी संघ समन्वय संघर्ष समितीने देखील वेधले होते लक्ष मुंबईकर चाकरमान्यांसाठी दिलासादायक