रत्नागिरी जिल्ह्यात २४ तासांत १०० नवीन रुग्ण

रत्नागिरी : मुंबईसह राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वेगाने वाढ होत आहे. आता कोकणातही कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत असून, मागील २४ तासांत, शंभर नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.


रत्नागिरी जिल्ह्यात गुरुवारी प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार मागील २४ तासांत कोरोनाचे नवीन १०० रुग्ण बाधित झाले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्णांची वाढती संख्या ही जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागासह नागरिकांसाठी चिंतेची बाब ठरली आहे.


दुसरीकडे, कोरोना रुग्णसंख्या वेगाने वाढत असल्याने प्राथमिक व माध्यमिक शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


मागील आठ दिवसांत जिल्ह्यातील रुग्ण सातत्याने वाढत आहेत. दोन दिवसांत पावणे दोनशेहून अधिक रुग्ण सापडले आहेत. चोवीस तासांत १०५३ रुग्णांची चाचणी करण्यात आली. त्यामध्ये शंभर नवे रुग्ण सापडले आहेत. १६ जणांना बरे वाटल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. जिल्ह्यात सध्या ३१५ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असून त्यामध्ये २३४ गृहविलगीकरणात, तर ८१ रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत.


जिल्ह्यात मागील चोवीस तासांत चिपळूण तालुक्यात सर्वाधिक २८ रुग्ण सापडले आहेत. तर रत्नागिरीत १७, दापोली १९, खेड १५, गुहागर ६, राजापूर ८, लांजा ३, संगमेश्‍वर व मंडणगडमध्ये प्रत्येकी १ रुग्ण सापडले आहेत. जिल्ह्यात चिपळूण येथील रूग्णसंख्या वाढ मोठी असून, त्यापाठोपाठ रत्नागिरी, दापोली, खेड येथील संशयित कोरोना रूग्णसंख्या वाढत आहे.

Comments
Add Comment

कोकणाच्या विकासासाठी भाजपचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’; जयगड बंदर बनणार अर्थव्यवस्थेचं केंद्र

रत्नागिरी: मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भाजप नेते नितेश राणे

रत्नागिरी नाचणेत मुलाकडून आईचा खून, खून करून मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न

गणेशोत्सवाच्या उत्साहात रत्नागिरी जिल्हा हादरला आहे. शहरातील नाचणे येथे पोटच्या मुलाने आपल्या आईचा निर्घृण

खेडमधील खवटी गावाजवळ खासगी बस आणि कारचा भीषण अपघात, तिघेजण गंभीर जखमी

खेडमधील खवटी गावाजवळ मंगळवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास खासगी बस आणि कार यांच्यात भीषण अपघात झाला. या

वैभव खेडेकरांची मनसेतून हकालपट्टी, वैभव खेडेकर भाजपाच्या वाटेवर, मनसेतून 4 जणांची हकालपट्टी

गेल्या काही दिवसांपासून वैभव खेडेकर यांच्या नावाची चर्चा सुरु होती, वैभव खेडेकर भाजपमध्ये जातील अशीही शक्यता

रत्नागिरीत खासगी बस आणि रिक्षा भाड्याबाबत ‘आरटीओ’कडून दर सूची प्रसिद्ध

रत्नागिरीत खासगी बस आणि रिक्षा भाड्याबाबत उपप्रादेशिक अधिकाऱ्यांनी दरतक्ता प्रसिद्ध करण्यात आले आहे.

मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी, काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम, दोन दिवस पावसाचा अंदाज

मुंबई : विश्रांती घेतलेल्या पावसाने मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी केली आहे. सकाळपासून रिमझिम पावसाळा सुरुवात