रत्नागिरी जिल्ह्यात २४ तासांत १०० नवीन रुग्ण

  36

रत्नागिरी : मुंबईसह राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वेगाने वाढ होत आहे. आता कोकणातही कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत असून, मागील २४ तासांत, शंभर नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.


रत्नागिरी जिल्ह्यात गुरुवारी प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार मागील २४ तासांत कोरोनाचे नवीन १०० रुग्ण बाधित झाले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्णांची वाढती संख्या ही जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागासह नागरिकांसाठी चिंतेची बाब ठरली आहे.


दुसरीकडे, कोरोना रुग्णसंख्या वेगाने वाढत असल्याने प्राथमिक व माध्यमिक शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


मागील आठ दिवसांत जिल्ह्यातील रुग्ण सातत्याने वाढत आहेत. दोन दिवसांत पावणे दोनशेहून अधिक रुग्ण सापडले आहेत. चोवीस तासांत १०५३ रुग्णांची चाचणी करण्यात आली. त्यामध्ये शंभर नवे रुग्ण सापडले आहेत. १६ जणांना बरे वाटल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. जिल्ह्यात सध्या ३१५ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असून त्यामध्ये २३४ गृहविलगीकरणात, तर ८१ रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत.


जिल्ह्यात मागील चोवीस तासांत चिपळूण तालुक्यात सर्वाधिक २८ रुग्ण सापडले आहेत. तर रत्नागिरीत १७, दापोली १९, खेड १५, गुहागर ६, राजापूर ८, लांजा ३, संगमेश्‍वर व मंडणगडमध्ये प्रत्येकी १ रुग्ण सापडले आहेत. जिल्ह्यात चिपळूण येथील रूग्णसंख्या वाढ मोठी असून, त्यापाठोपाठ रत्नागिरी, दापोली, खेड येथील संशयित कोरोना रूग्णसंख्या वाढत आहे.

Comments
Add Comment

मुंबई-गोवा महामार्ग पंधरा वर्षे का रखडला? प्रवाशांना १ कोटीचा विमा आणि नुकसान भरपाईसाठी नितीन गडकरींना थेट पत्र

रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दीर्घकाळ रखडलेल्या कामांमुळे त्रस्त झालेल्या कोकणवासीयांनी

मुसळधार पावसामुळे दुचाकीस्वार गेला वाहून, एनडीआरएफकडून तरुणाचा शोध सुरु...

सावंतवाडी : सोमवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साठल्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा

Ganesh Festival 2025 : चला गणपतीक गावाक जाऊचा असा; नियमित गाड्यांचे आरक्षण सुरु होतला…

कोकण मार्गावरील नियमित गाड्यांच्या आरक्षणाचे वेळापत्रक जारी झाल्याने रेल्वेच्या नियमांप्रमाणे ६० दिवसांचे

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर, माणगाव बायपास रस्त्यांचे काम पूर्ण होईपर्यंत वाहतूक कोंडी टाळण्यासाठी चार पर्यायी रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश मुंबई : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर आणि माणगाव बायपास

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाण्याखालील संग्रहालयाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

सेवानिवृत्त युद्धनौकेचे नवे स्वरूप, सागरी संवर्धन व पर्यटनाला चालना  मुंबई: आयएनएस गुलदार या नौदलातून

मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक १७ तासांनंतर सुरू

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील (Mumbai-Goa highway) निवळी घाटात सीएनजी टँकर आणि खासगी मिनी बस यांच्यात झालेल्या भीषण