कोकण पर्यटकांनी हाऊसफुल्ल; समुद्रकिनारे गजबजले

रत्नागिरी :नाताळ सणानंतर आता नववर्षाच्या स्वागतासाठी कोकणात दाखल झालेल्या हजारो पर्यटकांनी कोकण हाऊसफुल्ल झाले आहे. पर्यटकांचा सर्वाधिक ओढा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात असून दोन्ही जिल्ह्यातील हॉटेल्ससह एमटीडीसीची रिसॉर्टदेखील फुल्ल झाली आहेत. यावर्षी कोकणात येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली असून कोकणातील पर्यटकांनी नववर्षाच्या स्वागतासाठी सर्वाधिक पसंती समुद्र किनाऱ्यांना दिल्याने रत्नागिरीसह सिंधुदुर्गातील प्रत्येक समुद्रकिनारा पर्यटकांनी गजबजून गेले आहेत.


राज्यासह इतर राज्यांतील पर्यटकांनी कोकणाला पसंती दिल्याने गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी कोकणात दाखल झालेल्या पर्यटकांची संख्या दुप्पट झाली आहे. या पर्यटकांसाठी शासनाने काही विशेष सुविधा पुरवल्या नसल्या तरी येथील निवास, न्याहारी, हॉटेल्स तसेच ग्रामीण पर्यटनावर आधारित अशा सुविधा, वॉटर स्पोर्ट्स अशा सर्व सोयींमुळे पर्यटक आता कोकणात स्थिरावू लागले आहेत. पर्यटकांचा ओढा हा समुद्रकिनाऱ्यांकडे अधिक असून तेथे आनंद लुटतानाच पर्यटक जिल्ह्यातील अन्य पर्यटन स्थळांचीही सैर करू लागले आहेत. परिणामी आतापर्यंत गाडीतून कोकणचे दर्शन घेत गोव्याकडे धाव घेणारे पर्यटक आता येथे स्थिरावू लागले असल्याने खऱ्या अर्थाने पर्यटन व्यवसाय आता रुजू लागल्याचे दिसत आहे.


असे असले तरी शासनाने या पर्यटन व्यवसायाकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे. अनेक हॉटेल व्यावसायिकांनी नववर्ष स्वागतासाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. कोकणात येणाऱ्या पर्यटकांसह स्थानिकांनादेखील आकर्षित करण्यासाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.


Comments
Add Comment

Crime News : आधी कार आता दुचाकी जळून खाक, अहिल्यानगरात काय घडतंय ? CCTV तील 'ते' दृश्य पाहून संशय बळावला

Crime News :  अहिल्यानगर शहरात वाहनांना लक्ष्य करून आग लावण्याच्या घटना सुरूच असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Jalgaon : भीषण अपघातामुळे वाटेतच काळाची झडप, १ वर्षाच्या चिमुकलीसह चौघांचा हृदयद्रावक अंत

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील वरणगावजवळ मुंबई-नागपूर महामार्गावरील (Mumbai-Nagpur Highway) बायपासवर थरारक अशी भीषण रस्ते अपघाताची

Crime News : शिट्टी वाजवली, उसाच्या शेतातून 10 ते 12 जण बाहेर आले, अन.... स्वस्तात सोने मिळण्याचे आमिष महागात पडले

अहिल्यानगर : स्वस्तात सोने मिळणार असल्याचं आमिष दाखवत रायगडच्या जिल्हा परिषद सदस्यालाच सापळ्यात ओढून तब्बल 52

Kolhapur News : कोल्हापूरात कोल्ह्याची दहशत! साडेतीन वर्षांच्या चिमुकल्यासह ११ जण जखमी; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांच्या (Attack) घटना सातत्याने समोर येत असताना आता

Yavatmal Murder Case : ‘गिफ्ट लवकरच पाठवतो’... स्टेटस ठेवला अन् घरात घुसून सपासप वार; तरुणाची निर्घृण हत्या

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून गुन्हेगारांचे प्रमाण वाढत चालले आहे. अशातच आणखी एका हत्येची घटना समोर आली

Navi Mumbai Airport Shivaji Maharaj Statue : नवी मुंबई विमानतळावर शिवरायांचा भव्य पुतळा! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते १२ फूट उंच कांस्य अर्धपुतळ्याचे अनावरण

नवी मुंबई : महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य १२ फूट उंच कांस्य