Maharashtra Infrastructure : मुंबई आणि नागपूरसाठी मोठा निर्णय; दोन महत्त्वाच्या वाहतूक प्रकल्पांना राज्य सरकारची मंजुरी

राज्यातील वाहतूक व्यवस्था अधिक वेगवान आणि सुलभ करण्यासाठी राज्य सरकारने दोन महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मुंबई आणि नागपूरमधील महत्त्वाच्या प्रकल्पांबाबत निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे दोन्ही शहरांतील प्रवाशांना भविष्यात मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.



मुंबईमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर सागरी सेतूला (Swatantryaveer Savarkar Sea Link) वांद्रे किल्ला परिसराशी जोडण्यासाठी सुमारे ३.५५ किलोमीटर लांबीचा नवीन कनेक्टर उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी अंदाजे १,७२२.४० कोटी रुपयांचा खर्च होणार असून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत त्याची अंमलबजावणी केली जाईल. हा कनेक्टर तयार झाल्यानंतर सध्या २० ते ४५ मिनिटे लागणारा प्रवास अवघ्या १० मिनिटांत पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी कमी होऊन प्रवास अधिक सोयीचा होईल.


दुसरीकडे, नागपूर मेट्रो रेल टप्पा-२ अंतर्गत कन्हान नदी ते कन्हान शहर या मार्गावर १.४० किलोमीटर लांबीची उन्नत मेट्रो मार्गिका उभारण्यासही मंजुरी देण्यात आली आहे. या मार्गावर एक नवीन मेट्रो स्थानक उभारण्यात येणार असून या प्रकल्पासाठी सुमारे ३१०.३५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या कामाची जबाबदारी महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (महामेट्रो) यांच्याकडे असणार आहे.



नागपूर मेट्रो विस्तार प्रकल्पाला केंद्र सरकारची अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे मुंबई आणि नागपूरमधील वाहतूक व्यवस्था अधिक मजबूत होण्यास मदत होईल. तसेच नागरिकांचा प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि आरामदायी करण्याच्या दृष्टीने हे दोन्ही प्रकल्प महत्त्वाचे मानले जात आहेत.


Comments
Add Comment

Ahilyanagar : जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीला उच्च न्यायालयात आव्हान ; निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह, राजकीय वातावरण तापले

अहिल्यानगर (राहुरी प्रतिनिधी) : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Ahilyanagar District Central Cooperative Bank) होवू घातलेल्या

Ahilyanagar : श्रीरामपूरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेची सलग दुसऱ्या दिवशी मोठी कारवाई; एमडी तस्कर जेरबंद, अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

अहिल्यानगर (श्रीरामपूर) : श्रीरामपूर शहरात अंमली पदार्थांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने सलग दुसऱ्या दिवशी मोठी

Ketan Agrawal Murder Case : 'मला त्याला स्लो पॉयझन देऊन मारायचं होतं..';केतन हत्याकांड प्रकरणातील 'त्या' गुप्त कटामागचा मास्टरमाइंड कोण?

केतन अग्रवाल हत्याकांडात धक्कादायक दावा; 'स्लो पॉयझन' देण्याचाही कट असल्याची तपासात चर्चा पुणे : केतन

Minister Radhakrishna Vikhe Patil : मतदार यादीत घुसखोरांना जागा नाही ; पुनरिक्षण मोहिमेत कार्यकर्त्यांनी पुढे या : ना. राधाकृष्ण विखे पाटील

Ahilyanagar (Shevgaon) : मतदार यादीची सखोल पुनरिक्षण मोहीम भविष्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहे.सरकारी स्तरावर काम सुरू असले

Wardha Murder : वर्ध्यात काळजाचा थरकाप उडवणारी घटना! 12 वर्षांच्या मुलीची दगडाने ठेचून निर्घृण हत्या; नराधमांनी ओलांडल्या क्रूरतेच्या सर्व सीमा

वर्धा : वर्धा  (wardha) जिल्ह्यातील रोठा गावातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली

Pune Metro : पुणेकरांसाठी गुड न्यूज! हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोला नवा मुहूर्त; वाहतूक कोंडीतून लवकरच सुटका!

पुणे : पुण्यातील ट्रॅफिक जॅम, विशेषतः हिंजवडी आयटी पार्क परिसरात होणाऱ्या रोजच्या वाहतूक कोंडीने त्रस्त