राज्यपाल-राज्य सरकार वाद

  116

मुंबई (प्रतिनिधी): आवाजी पद्धतीने मतदान घेण्यास राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी विरोध दर्शवल्याने विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का बसला आहे. या निवडणुकीसाठी सोमवारपर्यंत अर्ज भरायचा होता. मात्र, राज्यपालांच्या आक्रमक भूमिकेमुळे ठाकरे सरकारसमोर नवा पेच निर्माण झाला आहे.

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक खुल्या पद्धतीने घेण्यासाठी नियमात बदल करण्यात आला होता. ही निवडणूक गुप्त मतदान पद्धतीने घेण्याऐवजी खुल्या किंवा आवाजी मतदानाने घेण्याच्या नियमबदलाबाबत कायदेशीर अभिप्राय घेण्यासाठी राज्यपालांनी वेळ मागून घेतला. तसेच विधिज्ञांशी चर्चा केल्यानंतर नियम बदलण्यासाठी करण्यात आलेली प्रक्रिया घटनाबाह्य असल्याचे राज्यपाल कोश्यारी यांनी राज्य सरकारला कळवले आहे. राज्यपालांच्या या निर्णयामुळे आता अध्यक्षपदाची निवडणूक रेंगाळण्याची शक्यता आहे.

राज्यपालांच्या मनधरणीसाठी महाविकास आघाडीकडून महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे व छगन भुजबळ यांनी रविवारी विधानसभा अध्यक्षांच्या निवडीचा कार्यक्रम राज्यपालांकडे सुपुर्द केला. तसेच निवडणुकीला परवानगी देण्याची विनंती केली होती. राज्यपालांच्या या उत्तरानंतर आता महाविकास आघाडीकडून राज्यपालांना तिसरं पत्र पाठवले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. या अगोदर मुख्यमंत्र्यांनी दोन शिफारस पत्रे पाठवलेली आहेत. तर, आता तिसऱ्या पत्रात ज्या कायदेशीर बाबींवर राज्यपालांकडून शंका उपस्थित केली जात आहे, त्याबाबत सविस्तर मुद्दे मांडले जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.


निवडणूक गुप्त पद्धतीने घेण्यास नेमकी कसली भीती? : फडणवीस


अध्यक्षपदाची निवडणूक गुप्त मतदानानेच व्हावी, अशी भाजपची मागणी आहे. महाविकास आघाडी सरकारचा आपल्या आमदारांवर विश्वास नसल्याने आवाजी मतदानाने निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विधानसभा नियमांमध्ये बदल करण्याबाबत बैठक घेण्याचा अधिकार अध्यक्षांनाच असून तो उपाध्यक्षांना नाही. त्यामुळे निवडणूक नियमातील बदल घटनाबाह्य आहे. निवडणूक गुप्त पद्धतीने घेण्यास सरकारला नेमकी कसली भीती वाटते, असा प्रश्न विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
Comments
Add Comment

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात होणार!

येत्या सप्टेंबर -ऑक्टोबर महिन्यात मतदान निवडणूक खर्चात वाढ करण्याबाबतही विचार राज्य निवडणूक आयुक्तांनी दिली

महाराष्ट्रातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु -

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात किसान क्रेडिट योजना लाखो शेतकऱ्यांसाठी ठरली जीवनवाहिनी - निर्मला सीतारामन

प्रतिनिधी: सरकारची योजना किसान क्रेडिट कार्ड (KCC) हे भारतीय शेतकऱ्यांसाठी जीवनरेखा ठरली आहे असे प्रतिपादन

Gold Silver Rate: चार दिवस सनसनाटी वाढीनंतर गुंतवणूकदारांना चालून आली संधी सोने 'इतक्या' रुपयांनी स्वस्त चांदी 'जैसे थे'

प्रतिनिधी: चार दिवसांच्या सनसनाटी वाढीनंतर सोन्याच्या दराने विश्रांती घेतली आहे. आज सराफ बाजारात सोन्याच्या

Mehul Choksi Breaking : फरार उद्योगपती मेहूल चोक्सी सेबीच्या रडारवर त्यांच्या सगळ्या मालमत्ता यंत्रणेने जप्त केल्या

प्रतिनिधी: नीरव मोदीनंतर आता मेहूल चोक्सींची घेराबंदी सेबीने केली आहे. सेबी (Security Exchange Board of India) एजन्सीने उद्योगपती

Eknath Shinde : लाडक्या बहिणीला 'डेडिकेटेड टू कॉमन मॅन'चा आधार! उपचारासाठी किडनीग्रस्त महिलेला एकनाथ शिंदेंनी केली मदत

जळगाव : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल मुक्ताईनगरला संत मुक्ताबाई पालखी प्रस्थान सोहळ्याला उपस्थित