शेतकऱ्यांच्या वीजप्रश्नी भाजपचे ठिय्या आंदोलन

चांदवड (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वीज पुरवठा सुरळीत होत नाही म्हणून भाजपच्या वतीने सोमवारी ठिय्या आंदोलन करण्यात आले. जिल्ह्यातील चांदवड येथे मुंबई आग्रा महामार्गावर आमदार राहुल आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली चक्काजाम आंदोलन केले. यावर अधिकाऱ्यांनी लवकरच वीज पुरवठा सुरळीत केला जाईल, असे आश्वासन दिले त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.



शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करावा, त्याचप्रमाणे थकीत वीज बिलासाठी खंडित केलेला ग्रामीण भागातील वीज पुरवठा त्वरीत सुरळीत करावा, या मागणीसाठी सोमवारी भाजपच्या वतीने आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई-आग्रा महमार्गावर ठिय्या आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांचे प्रश्न व समस्यांबाबत भाजप आक्रमक झाले असून याबाबत आवाज उठवण्यासाठी ठिय्या आंदोलनाला सुरुवात झाली.


जिल्ह्यातील ग्रामीण तालुक्यातील शेती सिंचनासाठी पाणी उपलब्ध असून सध्या रब्बी पिकांची पेरणी करून गहू, मका, हरभरा, भुईमूग इत्यादी पिकांना सिंचनासाठी पाण्याची आवश्यकता असते, मात्र विद्युत विभागाकडून शेतकऱ्यांना कधी दिवसा, तर कधी रात्री वीज पुरवठा केला जातो. तर काही ठिकाणी थकीत वीजबिलामुळे वीज पुरवठाच खंडित केल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे.
या पार्श्वभूमीवर नाशिक ग्रामीण भाजपने सोमवारी रस्त्यावर उतरून सरकारला जाब विचारला. दरम्यान या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. मात्र कालांतराने सुरळीत झाली. यावेळी वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांनी हा प्रश्न लवकरच सोडविला जाईल, असे आश्वासन दिले.

Comments
Add Comment

आधी निवडणुकीचा गुलाल, मग मुलाला खांदा; नवनिर्वाचित नगरसेवकावर कोसळला दु:खाचा डोंगर

 बीड: निवडणुकीच्या विजयी गुलालात बापाला खांद्यावर घेऊन नाचला आणि मग बापानेच मुलाला खांदा दिल्याची धक्कादायक

ताडोबातल्या तारा वाघिणीचा पाटणमध्ये मुक्त संचार, नागरिकामध्ये भीतीचं वातावरण

पाटण : सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात एक वाघीण मुक्त संचार करताना आढळली. ही तारा नावाची वाघीण ताडोबा

नागपुरात सकाळी गोळीबाराचा थरार; प्राध्यापकासह तिघे जण जखमी

नागपूर : नागपुरात बुधवारी पहाटेच्या सुमारास गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा

भीमाशंकरला जाण्याचे नियोजन करत असाल तर थांबा; विकासकामांच्या पार्श्वभूमीवर मंदिर राहणार तीन महिने बंद

पुणे: ज्योतिर्लिंग म्हणजे भारतीयांसाठी फार जवळचा विषय. मात्र तुम्ही जर बारा ज्योतिर्लिंगांचे किंवा भीमाशंकरला

Pankaj Bhoyar : "ठाकरे बंधूंच्या युतीचा मुंबईत काहीही परिणाम होणार नाही"; गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचा जालन्यातून टोला

जालना : "आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी कोणाशीही किंवा एकमेकांशी युती केली

Navneet Rana : "हिंदूंनी किमान ३-४ मुलांना जन्म द्यावा"; लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावरून नवनीत राणांचा 'हुंकार', मौलाना कादरीला सडेतोड उत्तर

अमरावती : लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावरून अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी पुन्हा एकदा आक्रमक