राज्यात ‘ओमायक्रॉन’चे आणखी २३ रुग्ण

मुंबई  :राज्यातील कोरोना संसर्ग अद्याप पूर्णपणे ओसरलेला नसताना, आता हळूहळू ‘ओमायक्रॉन’बाधितांच्या संख्येतही भर पडताना दिसत आहे. राज्यात गुरूवारी २३ नवे ओमायक्रॉनबाधित आढळले आहेत. तसेच, दिवसभरात १ हजार १७९ नवीन कोरोनाबाधितांची देखील नोंद झाली आहे. तर, ओमायक्रॉनची वाढती रुग्ण संख्या आणि कोरोनाबाधितांची संख्या मागील काही दिवसांमध्ये कमी होत असताना आता ती देखील पुन्हा एकदा वाढू लागल्याने चिंता व्यक्त होत आहे.


राज्यात आजपर्यंत आढळलेल्या ओमायक्रॉनबाधितांची एकूण संख्या ८८ झाली आहे. तर, मागील २४ तासात राज्यात ६१५ रूग्ण कोरोनामुक्त झाले असून, १७ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे. आजपर्यंत राज्यात ६५,००,३७५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९७.७ टक्के आहे. तर, मृत्यू दर २.१२ टक्के आहे. ओमायक्रॉन व्हेरिएंटचा राज्यात वेगाने प्रादुर्भाव होत आहे. यापूर्वीच्या करोनाच्या दोन लाटांमध्ये हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबईत सध्या कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा दुप्पट झाला आहे. मुंबईत कोरोनाचा पुन्हा एकदा वेगाने फैलाव होत असल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकार नाताळ आणि नववर्षाच्या पूर्वसंध्येला होऊ घातलेल्या कार्यक्रमांवर निर्बंध लादणार का, हे पाहावे लागेल.

Comments
Add Comment

पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून आरे कॉलनी व दिंडोशी वन क्षेत्रातील रहिवाश्यांना घरे द्या'

मुंबई : आरेमध्ये तसेच दिंडोशी येथील वन क्षेत्रात गेली अनेक वर्ष वास्तव्य रहिवाशी हि देखील माणसे असून ते मुलभूत

फडणवीस सरकारची ‘विकसित महाराष्ट्र २०४७’च्या दिशेने वाटचाल

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे; महायुती सरकारच्या वर्षपूर्ती निमित्त विशेष संवाद मुंबई : “पंतप्रधान नरेंद्र

डॉ. अविनाश ढाकणे यांनी स्वीकारला महापालिका अतिरिक्त आयुक्त पदाचा कार्यभार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) म्हणून डॉ. अविनाश ढाकणे यांनी

१० टोलनाक्यांवर नवीन टोल प्रणाली सुरू

गडकरी यांची लोकसभेत माहिती मुंबई : देशातील वाहनचालकांना आणि प्रवाशांना मोठी दिलासा देणारी घोषणा केंद्रीय

महावितरणमध्ये एआय तंत्रज्ञानाच्या आधारित डिजीटलायझेशन

तांत्रिक किचकट अडचणी दूर होणार मुंबई : राज्यात सौर ऊर्जेसह नवीनीकृत ऊर्जा स्त्रोतांच्या ‘डिजिटल ट्वीन’

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात