टोमॅटोच्या कॅरेटमध्ये निघाली चक्क दारू

नाशिक  : नववर्षाचे स्वागत तथा 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई सुरु केली आहे. त्यात चक्क टोमॅटोच्या कॅरेटमधून मद्याची चोरटी वाहतूक केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने सापळा रचून नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर अवैध मद्याचा तब्बल 7 लाखांचा बेकायदा मद्यसाठा जप्त केला आहे. हा मद्यसाठा चक्क टोमॅटोच्या कॅरेटमधून नेण्यात येत होता. या प्रकाराबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.



महाराष्ट्रात विक्रीसाठी प्रतिबंध असलेला मद्याचा हा साठा दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशातून बेकायदेशीररित्या टोमॅटोची वाहतूक करणाऱ्या पीकअप वाहनात टोमॅटो कॅरेटमधून टोमॅटो ऐवजी चक्क अवैध मद्याची वाहतूक केली जात होती. या धडक कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध मद्यासह तब्बल 15 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच दोघांना अटक केली आहे.



दरम्यान दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशातून राज्यात अवैध मद्यसाठ्याची वाहतूक केली जात असल्याचे या कारवाईवरुन स्पष्ट झाले असून राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून आता याचा सखोल तपास सुरु करण्यात आला आहे.

Comments
Add Comment

"शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोहोचेपर्यंत आमचा प्रयत्न सुरूच राहील" : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दुष्काळमुक्तच नाही तर, हरित माणदेशाच्या दिशेने मार्गक्रमण! सातारा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज फलटण,

पंढरपूरमध्ये कार्तिकी यात्रेला प्रारंभ, २४ तास दर्शनाची सुविधा!

पंढरपूर : पंढरपूरमध्ये विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भक्तीच्या

नातेवाईकांना भेटण्यासाठी गेलेले मराठवाड्याचे प्राध्यापक येताना पत्नीसह भीषण अपघात दगावले...

पुणे : छत्रपती संभाजीनगरातील पडेगाव परिसरात शनिवारी सायंकाळी घडलेल्या भीषण अपघातात विद्यापीठाचे निवृत्त

पिंपरीत भाजप स्वबळावर लढणार

भाजप-अजित पवार गट आमने-सामने पिंपरी : महायुती सरकारमध्ये सहभागी असलेले राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे

डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येनंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांचा फलटण दौरा

सातारा: फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी आतापर्यंत दोन आरोपींना अटक झाली आहे.

रिद्धपूर येथे जागतिक कीर्तीचे विद्यापीठ साकारणार: फडणवीस

नाशिक : रिद्धपूर या तीर्थक्षेत्राने मराठी भाषा जीवंत ठेवण्याचे काम केले असून तेथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन