सिंधुदुर्गात शांततेत मतदान; कडेकोट पोलीस बंदोबस्त

  79

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात चार नगर पंचायतीसाठी सकाळपासून शांततेत सुरुवात झाली आहे. सकाळी ११.३० वाजेपर्यंत सुमारे ३० ते ३५ टक्के मतदान झाले होते.


जिल्ह्यात कुडाळ, कसई-दोडामार्ग, देवगड-जामसंडे आणि वाभवे-वैभववाडी या नगरपंचायतीसाठी आज मतदान होत आहे. प्रत्येक नगर पंचायतीच्या १३ अशा एकूण ५२ जागांसाठी १५४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. सर्वच मतदान केंद्रावर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.


भाजप विरुद्ध शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस अशी लढत बहुतेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. काँग्रेसनेही आपले उमेदवार उभे केले आहेत.


दरम्यान जिल्ह्यात निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या जिल्ह्यातील १३० ग्राम पंचायतींच्या पोट निवडणुकांपैकी केवळ १४ ग्राम पंचायतीसाठी आज शांततेत मतदान होत आहे. ओबीसी आरक्षण रद्द केल्याने तब्बल ७५ ग्राम पंचायतीत अर्ज आलेले नाहीत तर ४१ ग्रामपंचायतीमध्ये एकही अर्ज दाखल झाला नाही.

Comments
Add Comment

Red Soil Stories चे सुप्रसिद्ध यूट्यूबर शिरीष गवस यांचं निधन, वयाच्या ३३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

कोकणातील खाद्यसंस्कृती यूट्यूब व्हिडीओच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवणारे सुप्रसिद्ध Red Soil Stories चे युट्युबर

गणेशभक्तांचा रेल्वे प्रवास अधिक सुखकर करा!

खा. नारायण राणे यांनी रेल्वेमंत्र्यांची भेट घेऊन विशेष गाड्या,अधिकचे कोच जोडण्याची केली मागणी नवी दिल्ली :

सिंधुदुर्गमध्ये महाराष्ट्राचा पहिला काचेचा पूल सज्ज! नापणे धबधब्यावर पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण, कोकण पर्यटनाला नवी झळाळी

सिंधुदुर्ग: कोकणच्या निसर्गरम्य सिंधुदुर्ग जिल्ह्यात, पर्यटनाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणारे एक महत्त्वाचे

अभय योजनेचा नागरिकांनी लाभ घ्यावा

आयुक्त मंगेश चितळे यांचे आवाहन पनवेल : मालमत्ता करांवरील शास्तीमध्ये सवलत देत पनवेल महापालिकेने दिनांक १८ जुलै

Reservation Chart : आता ट्रेन सुटण्याच्या ८ तास आधी पाहायला मिळणार आरक्षण चार्ट, 'या' दिवसापासून सेवा सुरूवात

मुंबई : रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना अधिक सोयीस्कर सेवा देण्यासाठी आणि त्यांचा प्रवास अधिक चांगल्या पद्धतीने

मुंबई-गोवा महामार्ग पंधरा वर्षे का रखडला? प्रवाशांना १ कोटीचा विमा आणि नुकसान भरपाईसाठी नितीन गडकरींना थेट पत्र

रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दीर्घकाळ रखडलेल्या कामांमुळे त्रस्त झालेल्या कोकणवासीयांनी