पहिली कसोटी प्रेक्षकांविना

सेंच्युरियन (वृत्तसंस्था):भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिली कसोटी प्रेक्षकांविना खेळली जाणार आहे. ओमायक्रॉनचे संकट पाहता ‘बॉक्सिंग डे’ कसोटीसाठी तिकीटांची विक्री केली नसल्याचे दक्षिण आफ्रिका बोर्डाने म्हटले आहे.


उभय संघांमधील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेला सेंच्युरियन येथे २६ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. ओमायक्रॉनचे सावट पाहता या सामन्यासाठी मोजक्या आणि महत्त्वपूर्ण प्रतिनिधींना मैदानावर जाण्याची परवानगी दिली जाईल. दक्षिण आफ्रिकेतील कोरोना निर्बंधांमध्ये एका ठिकाणी जास्तीत जास्त दोन हजार लोकांना एकत्र येण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे पहिल्या कसोटीमध्ये किमान दोन हजार प्रेक्षकांना प्रवेश मिळेल, असे वाटत होते. ओमायक्रॉन रुग्णांमध्ये घट झाली तर प्रेक्षकांची संख्या वाढेल असे सांगण्यात आले. मात्र, ओमायक्रॉनचा वाढता प्रभाव पाहता प्रेक्षकांना परवानगी नाकारली आहे.


दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यात इम्पीरियल वांडरर्स स्टेडियमवर खेळल्या जाणार्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी प्रेक्षक येतील की नाही हे सध्या स्पष्ट नाही. या संदर्भात पुढील घोषणा करण्यात येईल, अशी माहिती सेंच्युरियन स्टेडियमच्या ट्विटर हँडलवर देण्यात आली आहे.



भारताचा कसून सराव सुरू


दरम्यान, विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेत पोहोचलेल्या भारताने मालिकेपूर्वी येथे सराव सुरू केला आहे. दौऱ्यावर जाण्यापूर्वी संघाला मुंबईत क्वारंटाइन करण्यात आले होते.


भारताचा संघ आठव्यांदा दक्षिण आफ्रिकेचा दौरा करत आहे. जगातील हा एकमेव देश आहे जिथे भारतीय संघ अजूनही कसोटी मालिका जिंकलेला नाही. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली दुसऱ्यांदा दक्षिण आफ्रिकेत पोहोचलेला संघ यंदा यावेळी इतिहास बदलेल, असा विश्वास चाहत्यांना वाटतो. भारताला साउथ आफ्रिकेत येथे तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. यानंतर तीन वनडे सामन्यांची मालिकाही सुरू होईल.

Comments
Add Comment

Asia Cup: टीम इंडियाने सुपर ४ साठी केले क्वालिफाय, पाकिस्तानचे काय होणार?

दुबई: टीम इंडियाने आशिया कप २०२५च्या सुपर ४ साठी क्वालिफाय केले आहे. आता या ग्रुपमधून दुसरा कोणता संघ क्वालिफाय

पाकिस्तानशी हस्तांदोलन न केल्याबद्दल टीम इंडियावर कारवाई होणार?

नवी दिल्ली: काल भारत आणि पाकिस्तान या दरम्यान दुबईत झालेल्या आशिया चषक २०२५ स्पर्धेत सूर्याच्या टीमने

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून सूर्याने पाकिस्तानी खेळाडूंशी हात नाही मिळवला, सांगितले हे कारण

मुंबई: आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात भारताने ७ विकेट राखत विजय मिळवला. या

IND vs PAK: भारताने पाकड्यांना धुतले, ७ विकेट राखत मिळवला विजय

दुबई: आशिया कप स्पर्धेतील सहाव्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर जबरदस्त विजय मिळवला आहे. पाकिस्तानने

हॉकी आशिया कपमध्ये भारतीय महिला संघ उपविजेता

अंतिम सामन्यात चीनकडून ४-१ ने पराभव बीजिंग : महिला हॉकी आशिया कपमध्ये भारतीय संघ उपविजेता राहिला. हांगझोऊ येथे