देवगड हापूसची पहिली पेटी वाशी मार्केटला रवाना

सिंधुदुर्ग : देवगड तालुक्यातून आंब्याची पहिली पेटी पाठवण्याचा मान कुणकेश्वर-वाळकेवाडी येथील उपक्रमशील आंबा बागायतदार अरविंद सीताराम वाळके यांनी प्राप्त केला आहे.


अरविंद वाळके यांनी देवगड हापुसच्या पाच डझनाच्या पाच पेट्या दि. १९ डिसेंबर रोजी नवी मुंबई येथील एपीएमसी मार्केटला विक्रीसाठी पाठविल्या. यातील प्रत्येक आंबा २७५ ग्रॅम ते ३०० ग्रॅम या वजनातील आहे. यावर्षी नोव्हेंबर महिन्यात शेवटचा पाऊस पडला. या प्रतिकूल परिस्थितीतही झाडांची योग्य निगा राखून पिक घेणे हे खरंतर अवघड काम. पण या परिस्थितीवरही मात करुन वाळके यांनी हापुसचे उत्पादन घेतले आहे. हवामानाच्या प्रतिकूल परिस्थितीत आंबा मोहर टिकवून उत्पादन मिळवण्याची किमया त्यांनी गेली सहा वर्षे केली आहे.


वाळके यांनी आंबा विक्रीस पाठवण्याचा शुभारंभ केला यावेळी प्रगतशील आंबा बागायतदार अजित वाळके, रावजी वाळके, भरत वाळके, मयूर वाळके व परिवार उपस्थित होता. वाळके यांच्या हापूस आंबा बागेतील दहा कलमांच्या झाडावर जुलै महिन्याच्या अखेरीस मोहोर आला होता. आलेला मोहर टिकवणे ही खरी कसरत होती. त्यासाठी त्यांनी पावसाचा हंगाम असतानाही औषधांची फवारणी केली. मोहरावर बुरशीचा उपद्रव होऊ नये यासाठी त्यांना बुरशीनाशकांची फवारणी जास्त प्रमाणात करावी लागली. तसेच सुरुवातीचे आंबा फळ टिकविण्यासाठी व त्याची गळ थांबवण्यासाठी कीटकनाशकांची फवारणी करण्यात आली. झाडाला पूर्णतः सेंद्रिय खतांचा वापर करण्यात आला होता. कोणत्याही प्रकारे नवसंजीवकांचा वापर करण्यात आला नाही. त्यामुळे प्राप्त आंब्याची प्रतवारी उत्कृष्ट झाल्याची माहिती वाळके यांनी दिली.


नवी मुंबई येथील एपीएमसी मार्केट मधील कंपनीच्या माध्यमातून या फळांची विक्री होणार आहे. तसेच वाळके यांनी एएसडब्ल्यू या नावाने ब्रँड तयार केला आहे. निश्चितच हंगामापूर्वी झालेल्या आंब्याला चांगला दर मिळेल. बदलत्या हवामानामुळे व अवेळी पडणाऱ्या पावसामुळे आंबा बागायतदारांचे गेल्या चार-पाच वर्षात मोठे नुकसान झाले आहे. आंबा बागायतदारांना पिक विमा काढून सुद्धा योग्य भरपाई देण्यात येत नाही. विभागांमध्ये उभारण्यात आलेले हवामान केंद्राच्या योग्य नोंदी उपलब्ध होत नसल्यामुळे नुकसान भरपाई सुद्धा योग्य प्रकारे मिळत नाही, असे वाळके यांनी सांगितले.

Comments
Add Comment

‘वलसाड हापूस’ या नावाने स्वतंत्र मानांकनांसाठी गुजरात प्रयत्नशील

मुंबई : हापूस आंबा म्हटले की, कोकण किनारपट्टीवर उत्पादित होणारा गोड, चविष्ट आणि सुवासिक आंबा सर्वांच्या

Anganewadi Jatra 2026 : भराडी देवीचा 'कौल' मिळाला! लाखो भाविकांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम; आंगणेवाडी जत्रेची तारीख अखेर ठरली!

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या आणि कोकणातील सर्वात महत्त्वाची यात्रा समजल्या जाणाऱ्या मालवण

Eknath Shinde : शिंदेंकडून निलेश राणेंचं तोंडभरून कौतुक! "इलाका किसी का भी हो, धमाका निलेश राणेच करणार"; मालवण हा सेनेचाच बालेकिल्ला

मालवणमध्ये झालेल्या एका जाहीर सभेत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आमदार निलेश राणे यांचे

मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव येथे धुक्यामुळे भीषण अपघात

शिवशाही बस, ट्रकमध्ये धडक; १ ठार, ११ जखमी प्रमोद जाधव माणगाव : मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरू आहे.

संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारणार; पहिल्या टप्प्यातील संकल्पचित्राचे सादरीकरण

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराज स्मारक

जयगड बंदरातून काजू निर्यातीसाठी आवश्यक प्रक्रिया गतीने कराव्यात – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड बंदरातून मोठ्या प्रमाणात काजू निर्यात व्हावी यासाठी संबधित विभागांनी