देवगड हापूसची पहिली पेटी वाशी मार्केटला रवाना

  124

सिंधुदुर्ग : देवगड तालुक्यातून आंब्याची पहिली पेटी पाठवण्याचा मान कुणकेश्वर-वाळकेवाडी येथील उपक्रमशील आंबा बागायतदार अरविंद सीताराम वाळके यांनी प्राप्त केला आहे.


अरविंद वाळके यांनी देवगड हापुसच्या पाच डझनाच्या पाच पेट्या दि. १९ डिसेंबर रोजी नवी मुंबई येथील एपीएमसी मार्केटला विक्रीसाठी पाठविल्या. यातील प्रत्येक आंबा २७५ ग्रॅम ते ३०० ग्रॅम या वजनातील आहे. यावर्षी नोव्हेंबर महिन्यात शेवटचा पाऊस पडला. या प्रतिकूल परिस्थितीतही झाडांची योग्य निगा राखून पिक घेणे हे खरंतर अवघड काम. पण या परिस्थितीवरही मात करुन वाळके यांनी हापुसचे उत्पादन घेतले आहे. हवामानाच्या प्रतिकूल परिस्थितीत आंबा मोहर टिकवून उत्पादन मिळवण्याची किमया त्यांनी गेली सहा वर्षे केली आहे.


वाळके यांनी आंबा विक्रीस पाठवण्याचा शुभारंभ केला यावेळी प्रगतशील आंबा बागायतदार अजित वाळके, रावजी वाळके, भरत वाळके, मयूर वाळके व परिवार उपस्थित होता. वाळके यांच्या हापूस आंबा बागेतील दहा कलमांच्या झाडावर जुलै महिन्याच्या अखेरीस मोहोर आला होता. आलेला मोहर टिकवणे ही खरी कसरत होती. त्यासाठी त्यांनी पावसाचा हंगाम असतानाही औषधांची फवारणी केली. मोहरावर बुरशीचा उपद्रव होऊ नये यासाठी त्यांना बुरशीनाशकांची फवारणी जास्त प्रमाणात करावी लागली. तसेच सुरुवातीचे आंबा फळ टिकविण्यासाठी व त्याची गळ थांबवण्यासाठी कीटकनाशकांची फवारणी करण्यात आली. झाडाला पूर्णतः सेंद्रिय खतांचा वापर करण्यात आला होता. कोणत्याही प्रकारे नवसंजीवकांचा वापर करण्यात आला नाही. त्यामुळे प्राप्त आंब्याची प्रतवारी उत्कृष्ट झाल्याची माहिती वाळके यांनी दिली.


नवी मुंबई येथील एपीएमसी मार्केट मधील कंपनीच्या माध्यमातून या फळांची विक्री होणार आहे. तसेच वाळके यांनी एएसडब्ल्यू या नावाने ब्रँड तयार केला आहे. निश्चितच हंगामापूर्वी झालेल्या आंब्याला चांगला दर मिळेल. बदलत्या हवामानामुळे व अवेळी पडणाऱ्या पावसामुळे आंबा बागायतदारांचे गेल्या चार-पाच वर्षात मोठे नुकसान झाले आहे. आंबा बागायतदारांना पिक विमा काढून सुद्धा योग्य भरपाई देण्यात येत नाही. विभागांमध्ये उभारण्यात आलेले हवामान केंद्राच्या योग्य नोंदी उपलब्ध होत नसल्यामुळे नुकसान भरपाई सुद्धा योग्य प्रकारे मिळत नाही, असे वाळके यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Red Soil Stories चे सुप्रसिद्ध यूट्यूबर शिरीष गवस यांचं निधन, वयाच्या ३३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

कोकणातील खाद्यसंस्कृती यूट्यूब व्हिडीओच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवणारे सुप्रसिद्ध Red Soil Stories चे युट्युबर

गणेशभक्तांचा रेल्वे प्रवास अधिक सुखकर करा!

खा. नारायण राणे यांनी रेल्वेमंत्र्यांची भेट घेऊन विशेष गाड्या,अधिकचे कोच जोडण्याची केली मागणी नवी दिल्ली :

सिंधुदुर्गमध्ये महाराष्ट्राचा पहिला काचेचा पूल सज्ज! नापणे धबधब्यावर पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण, कोकण पर्यटनाला नवी झळाळी

सिंधुदुर्ग: कोकणच्या निसर्गरम्य सिंधुदुर्ग जिल्ह्यात, पर्यटनाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणारे एक महत्त्वाचे

अभय योजनेचा नागरिकांनी लाभ घ्यावा

आयुक्त मंगेश चितळे यांचे आवाहन पनवेल : मालमत्ता करांवरील शास्तीमध्ये सवलत देत पनवेल महापालिकेने दिनांक १८ जुलै

Reservation Chart : आता ट्रेन सुटण्याच्या ८ तास आधी पाहायला मिळणार आरक्षण चार्ट, 'या' दिवसापासून सेवा सुरूवात

मुंबई : रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना अधिक सोयीस्कर सेवा देण्यासाठी आणि त्यांचा प्रवास अधिक चांगल्या पद्धतीने

मुंबई-गोवा महामार्ग पंधरा वर्षे का रखडला? प्रवाशांना १ कोटीचा विमा आणि नुकसान भरपाईसाठी नितीन गडकरींना थेट पत्र

रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दीर्घकाळ रखडलेल्या कामांमुळे त्रस्त झालेल्या कोकणवासीयांनी