कणकवली (प्रतिनिधी) : ‘‘वापर संपतो तेव्हा तुम्हाला च्युइंगमसारखं थुंकले जाते’’, असे सांगतानाच आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेला लक्ष्य केले आहे. राणे साहेबांनी शिवसेना सोडली तेव्हा याच रामदास कदमांना उद्धव ठाकरेंनी विरोधी पक्षनेता बनवलं होतं. तेव्हा ते जिभेला हाड नसल्यासारखे आमच्यावर बोलायचे. आता कदमांसारख्या असंख्य शिवसैनिकांनी विचार करावा की, उद्धव ठाकरे तुम्हाला कसे वापरून घेतात. जेव्हा तुमचा वापर संपतो तेव्हा तुम्हाला च्युइंगमसारखे थुंकतात. याचं उत्तम उदाहरण म्हणजे रामदास कदम.
आज मी रामदास कदमांना सांगेन की, तुमची आज काय अवस्था झाली आहे. तुम्ही आज राजकारणामध्ये कुठेच नाहीत आणि राणे साहेब केंद्रात मंत्री आहेत. या फरकाचा रामदास कदमांनी विचार करावा. उद्धव ठाकरे हा व्यक्ती आयुष्यात कोणाचाच झालेला नाही. उद्धव ठाकरेंनी शिवसेना पक्ष स्वतःच्या स्वार्थासाठी वापरला आहे. असंख्य शिवसैनिकांनी रामदास कदम या घटनेचा बोध घ्यायला पाहिजे, अशी घणाघाती टीका नितेश राणे यांनी केली आहे.
‘त्या’ कथित ऑडिओ क्लिपवरुन मागील काही दिवसांपासून डाववले जात असलेले रामदास कदम यांनी खदखद माध्यमांसमोर व्यक्त केली. यावेळी त्यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. परब यांनी आपल्या कार्यक्षेत्रात घुसखोरी करत आपले आणि आपल्या मुलाचे राजकीय अस्तित्व संपवण्याचा घाट घातल्याचा गंभीर आरोप कदम यांनी केला. या पार्श्वभूमीवर भाजप आमदार नितेश राणे यांनी रामदास कदम यांच्यासह शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला.
मुंबई : भारतीय क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत वानखेडे स्टेडियमवर एक धक्कादायक घटना घडली…
मुंबई : बॉलीवूडचा किंग खान म्हणून शाहरुख खानची ओळख आहे. अनेकदा तो आणि त्याचे कुटुंब…
मुंबई : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोमधून स्वत:ची ओळख निर्माण करणारा 'फिल्टरपाड्याचा बच्चन' म्हणजेच गौरव मोरे…
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांना विमान कंपनीच्या गैरव्यवस्थापनाचा चांगलाच फटका बसला. अब्दुल्ला…
छत्तीसगड : छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यात आईस्क्रीम कारखान्यात एक धक्कादायक घटना घडली. कारखान्याच्या मालकाने चोरीच्या संशयावरुन…
मुंबई : आपण अनेक चित्रपटांची गाणी ऐकली आणि बघितली असतील. भारतीय चित्रपटात गाणी नसतील तर…