फोन टॅपिंग : रश्मी शुक्ला यांच्या मागण्या हायकोर्टाने फेटाळल्या

मुंबई : फोन टॅपिंग आणि गोपनीय माहिती उघड केल्याप्रकरणी दाखल केलेला गुन्हा रद्द करावा तसेच सदर प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग करावा, अशा मागण्यांची आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी फेटाळून लावली.


न्यायमूर्ती नितीन जामदार आणि न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या खंडपीठाने शुक्ला यांना दिलासा देण्यास नकार दिला. त्यावेळी खंडपीठाने म्हटले आहे की, याचिकाकर्तीच्या मागण्या मान्य कराव्यात असे हे प्रकरण नाही. तसेच, फोन टॅपिंग प्रकरण सकृतदर्शनी दखलपात्र दिसत असल्याने त्याचा तपास करणे हे पोलिसांचे कर्तव्य आहे. त्यामुळे त्याला मज्जाव करणे वा गुन्हा रद्द करण्याचा प्रश्न उद्भवत नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.


दरम्यान याचिकाकर्ती रश्मी शुक्ला यांच्या नावाचा समावेश नाही. त्यामुळे शुक्ला यांच्यावर कोणतीही कठोर कारवाई करायची असल्यास त्यांना सात दिवसांची नोटीस देण्यात यावी, असे निर्देशही न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत.

Comments
Add Comment

स्वतंत्र न राहता दोन्ही राष्ट्रवादी आणि समाजवादी पक्ष येणार एकत्र

गट स्थापन करत आपला नेमणार गटनेता, विविध समित्यांमध्ये मिळवणार स्थान मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत

Dahisar Bhayandar Metro 9 Line Railway : दहिसर-भाईंदरकरांची प्रतीक्षा संपली! मेट्रो-९ ला 'ग्रीन सिग्नल', १० स्थानके, १३ किमी मार्गाचा रुट; फेब्रुवारीत धावणार पहिली ट्रेन

मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरातील प्रवाशांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत

महाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणुका: मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षा पुन्हा एकदा पुढे,कधी आहेत?

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रणधुळीमध्ये विद्यार्थ्यांच्या परीक्षा ह्या पुढे ढकलण्यात

मुख्यमंत्र्यांनी केली तिसऱ्या मुंबईतील रायगड-पेण ग्रोथ सेंटरची घोषणा; एक लाख कोटींची गुंतवणूक येणार

मुंबई : स्वित्झर्लंडमध्ये वर्ल्ड ईकॉनॉमिक फोरमच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्या

बारावी–दहावी परीक्षेआधी महाराष्ट्र बोर्डाचा निर्णय, नियम, मार्गदर्शन, प्रेरणा सर्व काही यूट्यूब चॅनेलवर

मुंबई : बारावी आणि दहावी परीक्षांच्या आधी, महाराष्ट्र बोर्डाने विद्यार्थी, शाळा आणि परीक्षा केंद्र अधिकाऱ्यांना

टीईटीच्या निकालात यंदा ८.५३ टक्के उमेदवार पात्र

पावणेचार लाख उमेदवारांनी दिली परीक्षा उत्तीर्ण बंधनकारक केल्याने वाढली संख्या मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या