दक्षिण मुंबईतील बेलासीस पुलाला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव; मंगलप्रभात लोढा यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

कॅबिनेट मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांनी मानले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे आभार


ब्रिटिशांच्या आठवणी पुसून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे बेलासीस पुलाला नाव


दक्षिण मुंबईतील बेलासिस पुलाचे नाव बदलण्यासाठी मंत्री लोढा यांनी केला होता पाठपुरावा


मुंबई : राज्याचे कौशल्य विकास तथा मुंबईचे सह पालकमंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांच्या प्रयत्नांना यश आले असून दक्षिण मुंबईतील बेलसिस पुलाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याचा निर्णय माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी घेतला आहे. यासंदर्भात मंत्री लोढा यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत.


ब्रिटिशांच्या खुणा सांगणाऱ्या या पुलाचे नाव मेजर जनरल जॉन बेलासिस असे होते. हे नाव बदलण्यासाठी मंत्री लोढा यांनी सातत्याने मुंबई महापालिकेकडे तसेच राज्य सरकारकडे पाठपुरावा केला होता. मुख्यमंत्री फडणवीस यांनीही या मागणीला मान्यता देऊन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा सन्मान केला आहे.


मोडकळीला आलेल्या या पुलाची पुनर्बांधणी आता पूर्ण झाली असून माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते गुरुवार २६ फेब्रुवारी रोजी ऑनलाईन या पुलाचे उद्घाटन होणार आहे. यासंदर्भात आनंद व्यक्त करताना मंत्री लोढा म्हणाले की, आदरणीय प्रधानमंत्री श्री नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार भारताच्या वसाहतकालीन भूतकाळाची आठवण करून देणाऱ्या पाऊलखुणा पुसून भारतीयत्वाचा सन्मान करणारे आहे. गेल्या वर्षी जुलैमध्ये महानगरपालिकेने मुंबईतील जुना कोर्नॅक पूल ‘सिंदूर ब्रिज’ असे नामांतरित केले होते. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर भारताने दिलेल्या प्रत्युत्तरार्थ राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’च्या स्मरणार्थ हे नामकरण करण्यात आले होते, अशी माहिती ही मंत्री लोढा यांनी दिली. दरम्यान, कौशल्य विभागानेही राज्यातील सर्व आयटीआयला थोर संत आणि महापुरुषांची नावे देण्याचा निर्णय आधीच घेतला असून त्याची अंमलबजावणी सुरू आहे.

Comments
Add Comment

Sejal Pawar Controversy : मनोरंजनाच्या नावाखाली अश्लीलता खपवून घेतली जाणार नाही, कारवाई होणारच

वैद्यकीय विद्यार्थिनी सेजल पवार प्रकरणावर मुंबईच्या महापौर रितू तावडे यांची प्रतिक्रिया मुंबई (विशेष

Devendra Fadnavis : अल निनोचा मोठा परिणाम राज्यावर होईल, टास्क फोर्स तयार

मुंबई : अल निनोचा मोठा परिणाम आपल्या राज्यावर होईल. या संदर्भात आपण तयारी करत आहोत. आपण त्याचा टास्क फोर्स तयार

Devendra Fadnavis : गुटखा व्यवसाय करणाऱ्यांवर आता मकोका अंतर्गत कठोर कारवाई

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा अधिवेशनात दिले होते स्पष्ट संकेत अन्न व औषध प्रशासन मार्फत अत्यंत

Dahanu Love Jihad : डहाणू लव्ह जिहाद प्रकरणी डीसीपी मीना मकवानांच्या अध्यक्षतेखाली एसआयटीची स्थापना

एसआयटी स्थापनेसाठी आमदार चित्रा वाघ यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार मुंबई : पालघर जिल्ह्यातील डहाणू येथे

Devendra Fadnavis : ग्रामीण भागातील पाणीपुरवठा १०० टक्के सौर ऊर्जेवर आणणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : पाणीपुरवठा योजनेच्या व्यवस्थापनासाठी तालुकास्तरावर युनिटची निर्मिती मुंबई :

Konkan Railway : गणेशोत्सवासाठी आताच तयारीला लागा ! कोकण रेल्वेचे कधी सुरू होणार आरक्षण ?

मुंबई : यंदा १४ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी असल्यामुळे ११, १२ आणि १३ सप्टेंबर रोजी गावी पोहोचू इच्छिणाऱ्यांची