आता तरी बाधित मच्छीमारांना न्याय मिळणार का?

  114

मुंबई (प्रतिनिधी) : कोस्टल रोड प्रकल्पात बाधित होणाऱ्या वरळीतील मच्छिमारांच्या भरपाईसाठी मसुदा धोरण व आराखडा तयार करण्यासाठी पालिकेने टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सची नियुक्ती केली आहे. याबाबतचा प्रस्ताव मंगळवारी स्थायी समितीत आला असता बहुमताने तो मंजूर करण्यात आला. तर आता इतक्या वर्षांनंतर तरी मच्छीमारांना न्याय मिळेल का? सवाल भाजपने केला आहे.



कोस्टल रोड प्रकल्पामुळे मच्छीमारांचे नुकसान होत असून त्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी सल्लागार म्हणून टाटा इन्स्टिट्यूटची नियुक्ती करण्यात आली आहे. महापालिकेने यासाठी निविदा काढल्या होत्या; मात्र निविदेला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने अखेर टाटा इन्स्टिट्यूटची नियुक्ती करण्यात आली आहे. या कामासाठी पालिकेचा अंदाजित खर्च १ कोटी ५० लाख रुपये असून टाटा इन्स्टिट्यूटने कमी म्हणजेच १ कोटी ४४ लाखांत काम करण्याची तयारी दर्शवली आहे.



दरम्यान या बाबतचा प्रस्ताव मंजूर झाला असला तरी भाजपने या प्रस्तावाबाबत अनेक प्रश्न उभे केले आहेत. आजतागायत मच्छीमारांना संभाव्य नुकसान भरपाई मिळालेली नाही. त्यामुळे मच्छीमार बांधव हवालदिल झाले असून प्रकल्पालाही विलंब होत असल्याची टीका भाजप गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केली आहे. कोस्टल रोडच्या प्रकल्पाबाबत सत्ताधारी गंभीर नसून त्यांच्या उदासीनतेमुळे गेल्या ५ वर्षांत प्रकल्पाचे केवळ ४० टक्के काम पूर्ण झाले असल्याचेही शिंदे म्हणाले.



तसेच समितीत सादर केलेल्या प्रस्तावात बाधित होणाऱ्या मच्छीमारांच्या उदरनिर्वाहाचे सर्वेक्षण व अभ्यास करून नुकसान भरपाईसाठी मसुदा धोरण व आराखडा तयार करण्याची जबाबदारी टाटा सामाजिक विज्ञान संस्थेवर सोपवली जाणार आहे. मात्र, त्यालाही तब्बल नऊ महिन्यांचा कालावधी लागणार असून त्यानंतर तरी मच्छिमार बांधवांना नुकसान भरपाई मिळणार का? असा सवाल भाजप स्थायी समिती सदस्य भालचंद्र शिरसाट यांनी उपस्थित केला आहे.

Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.