जडेजा कसोटीतून घेणार निवृत्ती?

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू रवींद्र जडेजा कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याची चर्चा आहे. झटपट क्रिकेटमध्ये दीर्घकाळ खेळण्यासाठी तो या निर्णयाप्रत आल्याचे समजते. न्यूझीलंडविरुद्ध संपलेल्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत जडेजा खेळला. कानपूर कसोटी सामन्यात त्याने श्रेयस अय्यरसोबत संघाला संकटातून बाहेर काढताना शानदार भागीदारी केली, तसेच शानदार गोलंदाजी केली. मात्र, पहिल्या सामन्यात शानदार खेळ केल्यानंतर दुखापतीमुळे तो मुंबई कसोटी सामन्यातून बाहेर पडला. दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून तो बाहेर आहे. जडेजाच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली आहे.



गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाल्यास जडेजाला चार ते सहा महिने क्रिकेटपासून दूर राहावे लागू शकते, असे सांगण्यात येत आहे. त्यामुळेच त्याला दक्षिण आफ्रिकेला जाणाऱ्या कसोटी संघातून बाहेर ठेवण्यात आले आहे. त्याच्या जागी जयंत यादवला जागा मिळाली आहे. जडेजाची दुखापत गंभीर असल्याची माहिती बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने दिली आहे. एप्रिल-मे मध्ये होणाऱ्या आयपीएल २०२२मध्ये जडेजा पूर्ण क्षमतेसह चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना दिसेल अशी अपेक्षा आहे. पुढील मोसमासाठी चेन्नईने त्याला कर्णधार महेंद्रसिंह धोनीपेक्षा जास्त पसंती दिली आहे. तो धोनीनंतर चेन्नईचा कर्णधार म्हणून तो प्रबळ दावेदार आहे.

Comments
Add Comment

२० जानेवारीपासून नितीन नवीन भाजपचे अध्यक्ष

नवी दिल्ली : नितीन नवीन यांना भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्याची घोषणा २० जानेवारी रोजी

लाल किल्ला स्फोट प्रकरणी एनआयएच्या तपासातून हाती आली धक्कादायक माहिती, २०२३ पासूनचा दहशतवाद्यांचा कट उघड

नवी दिल्ली : दिल्लीच्या ऐतिहासिक लाल किल्ल्याबाहेर झालेल्या कार स्फोटाच्या तपासात महत्वाची माहिती समोर आली

प्रत्येक जोडप्याला किमान तीन मुले हवीतच; चंद्राबाबू नायडूंचं विधान चर्चेत

तिरुपती : तिरुपती येथे झालेल्या एका कार्यक्रमात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी

वाढदिवसाची पार्टी, धुम्रपानास जबरदस्ती अन् कारमध्ये बलात्कार!

उदयपूरमधील आयटी कंपनीच्या मॅनेजरची 'ती' काळरात्र उदयपूर: राजस्थानमधील उदयपूर येथे एका खाजगी आयटी कंपनीच्या

भारतीय जॉब मार्केटची विक्रमी झेप; 'एआय'मुळे भरती प्रक्रियेला वेग

९ कोटींहून अधिक जॉब अॅप्लिकेशनची नोंद नवी दिल्ली : भारतीय अर्थव्यवस्थेसाठी आणि रोजगार बाजारपेठेसाठी २०२५ हे

शाळांमध्ये सकाळचा नाश्ता देण्याची केंद्राची सूचना

शिक्षणासोबत पोषणावर भर नवी दिल्ली : शालेय विद्यार्थ्यांना संतुलित व पुरेसे पोषण मिळावे, या उद्देशाने केंद्र