जडेजा कसोटीतून घेणार निवृत्ती?

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू रवींद्र जडेजा कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याची चर्चा आहे. झटपट क्रिकेटमध्ये दीर्घकाळ खेळण्यासाठी तो या निर्णयाप्रत आल्याचे समजते. न्यूझीलंडविरुद्ध संपलेल्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत जडेजा खेळला. कानपूर कसोटी सामन्यात त्याने श्रेयस अय्यरसोबत संघाला संकटातून बाहेर काढताना शानदार भागीदारी केली, तसेच शानदार गोलंदाजी केली. मात्र, पहिल्या सामन्यात शानदार खेळ केल्यानंतर दुखापतीमुळे तो मुंबई कसोटी सामन्यातून बाहेर पडला. दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून तो बाहेर आहे. जडेजाच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली आहे.



गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाल्यास जडेजाला चार ते सहा महिने क्रिकेटपासून दूर राहावे लागू शकते, असे सांगण्यात येत आहे. त्यामुळेच त्याला दक्षिण आफ्रिकेला जाणाऱ्या कसोटी संघातून बाहेर ठेवण्यात आले आहे. त्याच्या जागी जयंत यादवला जागा मिळाली आहे. जडेजाची दुखापत गंभीर असल्याची माहिती बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने दिली आहे. एप्रिल-मे मध्ये होणाऱ्या आयपीएल २०२२मध्ये जडेजा पूर्ण क्षमतेसह चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना दिसेल अशी अपेक्षा आहे. पुढील मोसमासाठी चेन्नईने त्याला कर्णधार महेंद्रसिंह धोनीपेक्षा जास्त पसंती दिली आहे. तो धोनीनंतर चेन्नईचा कर्णधार म्हणून तो प्रबळ दावेदार आहे.

Comments
Add Comment

अखंड भारताचा उदय होईल, भारत तोडण्याची भाषा करणारेच तुटतील : डॉ. मोहन भागवत

मुंबई : भारत तोडण्याचा विचार करणारे स्वतःच तुटतील; हा १९४७ चा भारत राहिलेला नाही. आगामी २०४७ मध्ये अखंड भारताच्या

मोहम्मद खान अन्सारीने शिक्षिकेला केली मारहाण

बडोदा (वडोदरा) : बारावीच्या परीक्षेसाठी २० मिनिटे उशिराने आलेल्या मोहम्मद खान अन्सारीला शिक्षिकेने जाब विचारला.

नशीब पालटले! दूध आणि पेपर विकणाऱ्या रमेश बाबूंकडे आज ४०० आलिशान गाड्या, जाणून घ्या...

दिल्ली: परिस्थिती कशीही असो, करण्याची इच्छा असेल तर सगळं होतं म्हणतात ते खरं आहे. बेंगळुरूच्या रमेश बाबू यांचे

India -Malaysia Deal: भारत-मलेशियामध्ये प्रमुख करारांवर स्वाक्षरी; दोन्ही देशांचा होणार आर्थिक फायदा

मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांच्या निमंत्रणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मलेशियाचा दोन

Rafale Deal: भारताची संरक्षण शक्ती वाढणार; फ्रान्सकडून करणार १०० पेक्षा अधिक राफेल खरेदी

नवी दिल्ली: शत्रुराष्ट्रांच्या कोणत्याही आक्रमक हालचालींना तात्काळ आणि चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारत सरकार

पाकिस्तानी तुरुंगात मृतावस्थेत आढळलेल्या एका भारतीय मच्छिमाराचा मृतदेह भारतात आणण्यात आला. त्याचा मृत्यू कसा झाला हे जाणून घ्या?

दिल्ली: गेल्या महिन्यात पाकिस्तानी तुरुंगात मृतावस्थेत आढळलेल्या एका भारतीय मच्छिमाराचा मृतदेह भारतात