जडेजा कसोटीतून घेणार निवृत्ती?

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू रवींद्र जडेजा कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याची चर्चा आहे. झटपट क्रिकेटमध्ये दीर्घकाळ खेळण्यासाठी तो या निर्णयाप्रत आल्याचे समजते. न्यूझीलंडविरुद्ध संपलेल्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत जडेजा खेळला. कानपूर कसोटी सामन्यात त्याने श्रेयस अय्यरसोबत संघाला संकटातून बाहेर काढताना शानदार भागीदारी केली, तसेच शानदार गोलंदाजी केली. मात्र, पहिल्या सामन्यात शानदार खेळ केल्यानंतर दुखापतीमुळे तो मुंबई कसोटी सामन्यातून बाहेर पडला. दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून तो बाहेर आहे. जडेजाच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली आहे.



गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाल्यास जडेजाला चार ते सहा महिने क्रिकेटपासून दूर राहावे लागू शकते, असे सांगण्यात येत आहे. त्यामुळेच त्याला दक्षिण आफ्रिकेला जाणाऱ्या कसोटी संघातून बाहेर ठेवण्यात आले आहे. त्याच्या जागी जयंत यादवला जागा मिळाली आहे. जडेजाची दुखापत गंभीर असल्याची माहिती बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने दिली आहे. एप्रिल-मे मध्ये होणाऱ्या आयपीएल २०२२मध्ये जडेजा पूर्ण क्षमतेसह चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना दिसेल अशी अपेक्षा आहे. पुढील मोसमासाठी चेन्नईने त्याला कर्णधार महेंद्रसिंह धोनीपेक्षा जास्त पसंती दिली आहे. तो धोनीनंतर चेन्नईचा कर्णधार म्हणून तो प्रबळ दावेदार आहे.

Comments
Add Comment

आकाशात 'या' दिवशी दिसणार नेहमीपेक्षा मोठा आणि तेजस्वी चंद्र

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काही आठवड्यांपूर्वी भारतासह जगभरात 'ब्लड मून' दिसल्यानंतर, आता पुन्हा एकदा आकाशात एका

जीएसटी कपातीमुळे भारतात नवरात्रीमध्ये १० वर्षांत सर्वाधिक विक्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): मोदी सरकारच्या नेक्स्ट जेन जी. एस. टी. सुधारणांमुळे केवळ करांचे दर कमी झाले नाहीत तर

तरुणांसाठी ६२,००० कोटी रुपयांची मोठी योजना; मोदी आज करणार सुरू

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशातील तरुणांना कौशल्ये, शिक्षण आणि रोजगार (Skilling, education, and employment) देण्यासाठी अनेक

सावधान! भारतात ५० लाखांहून अधिक लोकांना चिकनगुनियाचा मोठा धोका

नवी दिल्ली: डासांमुळे होणाऱ्या चिकनगुनिया नावाच्या एका व्हायरल आजाराने भारतात सुमारे ५१ लाख (५.१ दशलक्ष) लोकांना

१,२०० कोटींच्या गोवा जमीन घोटाळ्यात शिवशंकर मायेकरला ED कडून अटक

नवी दिल्ली: सक्तवसुली संचालनालयाने (ED) आज सांगितले की, यशवंत सावंत आणि इतरांशी संबंधित असलेल्या जमीन

दहशतवाद्यांचा 'धर्म' नाही, आम्ही दहशतवादाला मारलं: राजनाथ सिंह यांचा सर्जिकल स्ट्राईकवर जोर

नवी दिल्ली: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज २०१६ चा सर्जिकल स्ट्राईक, २०१९ चा बालाकोट हवाई हल्ला आणि ऑपरेशन