अंतर्गत वादामुळे काँग्रेसचा पराभव, पटोलेंनी राजीनामा द्यावा

नागपूर : विधान परिषद निवडणुकीत (Legislative Council Election) अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. यामध्ये ऐनवेळी काँग्रेसवर (Congress) अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देण्याची नामुष्की ओढावली होती. यामुळे भाजपच्या (BJP) चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांचा विजय निश्चित मानला जात होता. बावनकुळे यांनीही अपेक्षेप्रमाणे विजय मिळवला आहे. महाविकास आघाडीला (MVA) 180 मते मिळाली. काँग्रेसमध्ये (Congress) नाना पटोले (Nana Patole) यांची हुकुमशाहीचे हे परिणाम आहे. काँग्रेसचे नेते हुकुमशाही करत होते म्हणून त्यांचा पराभव झाला. नाना पटोले प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करण्याच्या लायकीचे नाहीत अशा शब्दात बावनकुळेंनी टीका केली.


भाजपने स्वत:ची मते एकत्र ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न घोडेबाजार नाहीत. आमच्याकडे घोडेबाजार झाला नाही तर काँग्रेसकडे झाला, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.


छोटू भोयरच्या मदतीने खिंडार पाडू अशी काँग्रेसला अपेक्षा होती. पण छोटू भोयरचा अपमान केला. शेवटच्या दिवशी त्या उमेदवाराला बदललं हे दुर्दैवी आहे आणि महाराष्ट्राच्या इतिहासातली ही पहिलीच अशी घटना आहे. काँग्रेसचा छोटा कार्यकर्तासुद्धा यामुळे नाराज आहे, अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.


यावेळी सुरुवातीलाच बावनकुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, जेपी नड्डा, नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. काँग्रेसमध्ये अफरातफरी झाली. हुकूमशाही पद्धतीने पक्ष चालवण्याच्या परिणामाचे हे उदाहरण आहे. प्रदेश अध्यक्ष नाना पटोले हे दोन मंत्र्यांच्या दबावात आले आणि त्यांनी उमेदवार बदलला. हे उमेदवार व मतदारांना जनतेला मान्य नव्हते. काँग्रेसमध्ये अस्वस्थता आहे आणि याचा फटका बसला, असेही बावनकुळे यांनी म्हटले.


महाराष्ट्रामध्ये संपूर्ण स्थानिक स्वराज्य संस्था आणि यानंतर सर्व निवडणुका होतील त्यात भारतीय जनता पार्टी विजय मिळवेल असंही बावनकुळे म्हणाले. तसंच नाना पटोले हुकुमशाही पद्धतीने पक्ष चालवत आहेत. विधानपरिषदेत खऱ्या अर्थाने नाना पटोलेंचा पराभव आहे. त्यांनी पदाचा राजीनामा दिला पाहिजे, असे बावनकुळे म्हणाले.


नागपूरमध्ये विधानपरिषद निवडणुकीत ५५४ पैकी बावनकुळे यांना ३६२ मते मिळाली. बावनकुळेंनी या निवडणुकीत १७६ मतांनी विजय मिळवला. मंगेश देशमुख यांना १८६ मते तर काँग्रेसच्या तिकिटावर उभा राहिलेले रविंद्र भोयर यांना एकच मत मिळाले. महाविकास आघाडीकडे नागपुरात २०२ मते होते. मात्र त्यांची १६ मते फुटल्याचं निकालातून स्पष्ट दिसून आले. यामुळे भाजपने घोडेबाजार केला असा आरोप काँग्रेसकडून केला जात आहे.

Comments
Add Comment

थंडी संपताच महाराष्ट्रात जाणवू लागलाय उन्हाचा तडाखा

मुंबई : थंडी सरत आली आहे. आणि हवामानात बदल जाणवायला लागला आहे. मार्च मधल्या आल्हाददायक वातावरणात उकाडा जाणवायला

CH. SAMBHAJINAGAR : MGM Hospital परिसरात नायजेरियन तरुणांकडून महिलेची छेडछाड आणि मारहाण

छत्रपती संभाजीनगर: शहरातील MGM Hospital परिसरात एका महिलेची छेडछाड व मारहाण झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या

Malegaon Namaz Pathan : मालेगाव मनपा कार्यालयात नमाज पठण, सात जणांवर गुन्हा दाखल

मालेगाव महानगरपालिकेच्या कार्यालयामध्ये नमाज पडल्याप्रकरणी सात जणांवरती पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल

शनिवारपासून सलग पाच दिवस बँका राहणार बंद

मुंबई: तुम्ही जर बँकेत जाऊन काही काम करायचा विचार करत असाल किंवा लोन किंवा इतर काही कामं तुमची राहिली असतील तर

Air Ticket Refund Rules: विमान प्रवाशांसाठी आनंदाची बातमी; आतापासून तिकिट रद्द केल्यास परतावा..., जाणून घ्या नवीन नियम

मुंबई: देशातील विमान प्रवाशांच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) विमान

12th Exam Paper Leak : बारावी पेपरफुटी प्रकरणाला अंत नाहीच! रसायनशास्त्र, भौतिकशास्त्रानंतर गणिताचा पेपरसुद्धा फुटला ?

नागपूर : बारावी पेपरफुटी प्रकणात नवनवीन धक्कादायक खुलासे सुरुच आहेत. १८ फेब्रुवारी रोजी पेपर फुटीचा पोलीस