प्रहार    

कोरोना काळात मुंबई महानगरपालिकेचा घोटाळयात वरचा नंबर!

  110

कोरोना काळात मुंबई महानगरपालिकेचा घोटाळयात वरचा नंबर! प्रशांत जोशी

डोंबिवली : कोरोना काळात सर्वात जास्त आर्थिक घोटाळा करण्यात मुंबई महानगरपालिकेचा वरचा नंबर आहे. या काळात भारतात सर्वात जास्त कोरोना मृत्यूची संख्या आहे. मात्र, हे ठाकरे सरकारने जनतेपासून लपवले आहे. याला हे सरकार जबाबदार असून या घोटाळ्यात मुंबई महानगरपालिकेतील अधिकारी सामील असतील, तर त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई केली पाहिजे. यावर मंगळवारी मुंबई महानगरपालिकेत जाऊन याचा जाब विचारणार आहे. यानंतर कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचा नंबर आहे, असा स्पष्ट इशारा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी डोंबिवलीत दिला.

सोमय्या रविवारी सायंकाळी डोंबिवलीतील ठाकूर सभागृहात कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना सोमय्या यांनी थेट महाविकास आघाडी सरकारवर निशाण साधला.

कोरोना काळात मोदी सरकार महाराष्ट्राला मोफत लस देणार होते, मात्र मुंबई महापालिकेच्या महापौरांनी आम्हाला तुमची लस नको, आम्ही तीन महिन्यांत मुंबईतील सर्व जनतेला लस देऊ असे बोलल्या होत्या. अजूनही मुंबईतील ती लस जनतेपर्यंत पोहोचलीच नाही.
यावेळी किरीट सोमय्या यांचे ‘महावसुली सरकारचे हे घोटाळे’ हे पुस्तक कार्यकर्त्यांना देण्यात आले. कार्यकर्ता मेळाव्यात आमदार रवींद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, डोंबिवली ग्रामीण मंडळ अध्यक्ष नंदू परब, माजी नगरसेवक मंदार हळबे यांसह महिला पदाधिकारी सुहासिनी राणे, पूनम पाटील आदी उपस्थित होते.
Comments
Add Comment

बोईसर MIDC मध्ये वायू गळती, ४ कामगारांचा मृत्यू, तर अनेकांची प्रकृती चिंताजनक

पालघर: बोईसर तारापूर एमआयडीसीतील कारखान्यात वायुगळती झाल्याची घटना घडली आहे. या वायू गळतीमुळे ८ कामगारांना बाधा

ढोल-ताशा वाजवणाऱ्या मुस्लिम तरुणांचा व्हिडिओ व्हायरल!

मुंबई: गणेश चतुर्थीच्या आधी, डिजिटल क्रिएटर भावेशने शेअर केलेला एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यात मुंबईतील

रिओ वर्ल्ड चॅम्पियनशिपपूर्वी जिनॅस्ट संयुक्ताला क्रीडामंत्र्यांचा फोन

मुंबई : रिदमिक जिम्नॅस्टिक्समध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणारी महाराष्ट्राची हिरकणी संयुक्ता काळे हिची

Modak For Ganesh Chaturthi : गणपती बाप्पासाठी घरपोच मोदक! BMCची खास सेवा, लवकर करा ऑर्डर

मुंबई : गणेशोत्सव जवळ येत असताना संपूर्ण मुंबईत बाप्पाच्या आगमनाची लगबग सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर

मुंबईकर झाले चिंतामुक्त, जलाशयांमध्ये पाण्याचा मुबलक साठा

मुंबई : मुंबईकरांची यंदाची पाण्याची चिंता दूर झाली आहे. कारण मागील तीन - चार दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे

राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती

वयोमर्यादा संपलेल्या ‘या’ उमेदवारांना एक संधी मुंबई : राज्यात सप्टेंबरपासून १५ हजार ६३१ पोलीस शिपाई, चालक,