मुंबईत दोन दिवस जमावबंदी

मुंबई : राज्यातील ओमायक्रॉनच्या वाढत्या आकडेवारीच्या पार्श्वभूमीवर ११ आणि १२ डिसेंबर रोजी मुंबईत जमावबंदी (कलम १४४) लागू करण्यात आली आहे. त्यामुळे व्यक्ती किंवा वाहनांच्या रॅली, मोर्चे, मिरवणुका इत्यादींना मनाई करण्यात आली आहे. त्यासाठी मुंबईमध्ये शुक्रवारी मध्यरात्रीपासून कडक नियम लागू करण्यात आले आहेत.

मालेगाव, अमरावती हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी कडक पाऊल उचलली आहे. मुंबईत शुक्रवारी रात्रीपासून १२ डिसेंबरच्या रात्रीपर्यंत मोर्चा, रॅली किंवा कोणत्याही आंदोलनाला परवानगी नसणार आहे. याबद्दल मुंबई पोलिसांनी नवे आदेश जारी केले आहे. विशेष म्हणजे या आदेशात अमरावती, नांदेडमध्ये झालेल्या हिसाचाराचाही संदर्भ देण्यात आला आहे. त्याचबरोबर कोव्हिडचा नवा व्हेरिएन्ट ओमायक्रॉन पसरत असल्याने काळजी म्हणून रॅली, आंदोलन आणि सभांना परवानगी नसल्याचं मुंबई पोलिसांकडून आदेशात म्हटले आहे.

दरम्यान मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे आणि वक्फ मालमत्तेचे संरक्षण व्हावे, या मागणींसाठी मुंबईत मोर्चा काढण्याचा निर्णय एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी घेतला आहे. मुस्लिम आरक्षणासाठी एमआयएम मुंबईपर्यंत तिरंगा रॅली काढणार आहे. तिरंगे झेंडे हातात घेऊन एमआयएम कार्यकर्त्यांची वाहने राज्यभरातून मुंबईकडे निघाली आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी उपरोक्त आदेश जारी केले आहेत.
Comments
Add Comment

भारताने झिम्बाब्वे विरूद्धच्या सामन्यात उभारला धावांचा डोंगर

चेन्नई : आयसीसी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ मध्ये झिम्बाब्वे विरूद्धच्या सुपर एट फेरीतील सामन्यात भारताने

दक्षिण आफ्रिकेचा वेस्ट इंडिजवर दणदणीत विजय

अहमदाबाद : वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ अंतर्गत सुपर ८ फेरीचा

श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात न्यूझीलंडचा विजय

कोलंबो : आर. प्रेमदासा स्टेडियम येथे आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमधील सुपर ८ फेरीतल्या श्रीलंका विरुद्ध

न्यूझीलंडने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेची निराशाजनक सुरुवात

कोलंबो : आर. प्रेमदासा स्टेडियम येथे आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमधील सुपर ८ फेरीतला श्रीलंका विरुद्ध

...तरच भारत सेमी फायनल खेळू शकेल

मुंबई : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमध्ये सुपर ८ फेरीचे सामने सुरू आहेत. ग्रुप एक मध्ये वेस्ट इंडिज (धावगती

फिटनेस स्टार मयांक पवार याचे ३७ व्या वर्षी आकस्मिक निधन

मुंबई : रिअ‍ॅलिटी शोच्या दुनियेतून प्रसिद्धी मिळवलेले आणि फिटनेस क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण करणारे