मुंबईत दोन दिवस जमावबंदी

मुंबई : राज्यातील ओमायक्रॉनच्या वाढत्या आकडेवारीच्या पार्श्वभूमीवर ११ आणि १२ डिसेंबर रोजी मुंबईत जमावबंदी (कलम १४४) लागू करण्यात आली आहे. त्यामुळे व्यक्ती किंवा वाहनांच्या रॅली, मोर्चे, मिरवणुका इत्यादींना मनाई करण्यात आली आहे. त्यासाठी मुंबईमध्ये शुक्रवारी मध्यरात्रीपासून कडक नियम लागू करण्यात आले आहेत.

मालेगाव, अमरावती हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी कडक पाऊल उचलली आहे. मुंबईत शुक्रवारी रात्रीपासून १२ डिसेंबरच्या रात्रीपर्यंत मोर्चा, रॅली किंवा कोणत्याही आंदोलनाला परवानगी नसणार आहे. याबद्दल मुंबई पोलिसांनी नवे आदेश जारी केले आहे. विशेष म्हणजे या आदेशात अमरावती, नांदेडमध्ये झालेल्या हिसाचाराचाही संदर्भ देण्यात आला आहे. त्याचबरोबर कोव्हिडचा नवा व्हेरिएन्ट ओमायक्रॉन पसरत असल्याने काळजी म्हणून रॅली, आंदोलन आणि सभांना परवानगी नसल्याचं मुंबई पोलिसांकडून आदेशात म्हटले आहे.

दरम्यान मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे आणि वक्फ मालमत्तेचे संरक्षण व्हावे, या मागणींसाठी मुंबईत मोर्चा काढण्याचा निर्णय एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी घेतला आहे. मुस्लिम आरक्षणासाठी एमआयएम मुंबईपर्यंत तिरंगा रॅली काढणार आहे. तिरंगे झेंडे हातात घेऊन एमआयएम कार्यकर्त्यांची वाहने राज्यभरातून मुंबईकडे निघाली आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी उपरोक्त आदेश जारी केले आहेत.
Comments
Add Comment

अपोलो टायर्स टीम इंडियाचा नवीन स्पॉन्सर; प्रत्येक सामन्यासाठी बीसीसीआयला देणार ४.५ कोटी रुपये

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारतीय क्रिकेट संघासाठी नवीन जर्सी स्पॉन्सर म्हणून अपोलो

युवराज सिंगनं काय केलं... ? ईडीनं विचारला जाब

नवी दिल्ली : माजी क्रिकेटपटू युवराज सिंग याला बेकायदेशीर बेटिंग अ‍ॅप 1xBet प्रकरणात ईडीने समन्स बजावले आहे.

Asia Cup: टीम इंडियाने सुपर ४ साठी केले क्वालिफाय, पाकिस्तानचे काय होणार?

दुबई: टीम इंडियाने आशिया कप २०२५च्या सुपर ४ साठी क्वालिफाय केले आहे. आता या ग्रुपमधून दुसरा कोणता संघ क्वालिफाय

पाकिस्तानशी हस्तांदोलन न केल्याबद्दल टीम इंडियावर कारवाई होणार?

नवी दिल्ली: काल भारत आणि पाकिस्तान या दरम्यान दुबईत झालेल्या आशिया चषक २०२५ स्पर्धेत सूर्याच्या टीमने

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून सूर्याने पाकिस्तानी खेळाडूंशी हात नाही मिळवला, सांगितले हे कारण

मुंबई: आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात भारताने ७ विकेट राखत विजय मिळवला. या