मुंबई (विशेष प्रतिनिधी) : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या २२ ते २८ डिसेंबरपर्यंत मुंबईत घेतले जाणार आहे. कामकाज सल्लागार समितीच्या सोमवारी झालेल्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अधिवेशनाला प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहेत. तसेच दुसऱ्या आठवड्यात २७ आणि २८ डिसेंबर, असे दोनच दिवस कामकाज होईल. याच काळात अधिवेशन वाढवायचे किंवा नाही याचाही विचार केला जाईल, असे राज्याचे संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी सांगितले.
या हिवाळी अधिवेशनात एकूण १२ विधेयके असतील. तारांकित प्रश्नांसंदर्भात गुरुवारी सभापतींकडे होणाऱ्या बैठकीत निर्णय घेतला जाईल. तसेच २४ डिसेंबरला पुन्हा बैठक घेऊन अधिवेशन वाढवायचे किंवा नाही यावर निर्णय होईल. ज्यांचे कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस झाले आहेत, त्यांनाच प्रवेश मिळणार आहे.
चेन्नई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४३व्या सामन्यात आज सनरायजर्स हैदराबादने चेन्नई सुपर किंग्सला ५ विकेट्स…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण त्रयोदशी ८.३० पर्यंत नंतर चतुर्दशी शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराभाद्रपदा…
पावसाळा आता जेमतेम सव्वा महिन्यावर आलेला आहे. पावसाळी हंगामास दरवर्षी कागदोपत्री १ जूनला सुरुवात होत…
मराठवाडा वार्तापत्र: अभयकुमार दांडगे उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. त्याच तुलनेत मराठवाड्यात तहानलेल्या गावांच्या संख्येतही…
रवींद्र तांबे ग्रामीण भागाचा विचार करता अजूनही पुरेशा मूलभूत सोयी नसल्याने नागरिक मुलांना घेऊन शहराकडे…
मुंबई: पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दुर्घटनेनंतर जखमी व त्यांच्या कुटुंबियांसाठी मुंबई महानगरपालिकेच्या टोपीवाला नॅशनल मेडिकल…