श्री देव अंजनेश्वर मंदिराच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देऊ

Share

निलेश राणे यांची ग्वाही

राजापूर (प्रतिनिधी) : राजापूर तालुक्यातील मिठगवाणे येथील श्री देव अंजनेश्वर मंदिराच्या विकासासाठीचा जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पांतर्गत मंजूर झालेला विकास निधी लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याबाबत केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांच्यामार्फत निश्चितच प्रयत्न करू. मात्र तरीही जादा निधी लागल्यास आम्ही हा निधी निश्चितच उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही माजी खासदार निलेश राणे यांनी मिठगवाणे येथे श्री देव अंजनेश्वर मंदिराच्या विश्वस्तांना दिली.

गुरुवारी राजापूर तालुका दौऱ्यावर आलेले निलेश राणे यांनी श्री देव अंजनेश्वर मंदिराच्या यात्रोत्सवाला हजेरी लावली. यावेळी यांनी श्री देव अंजनेश्वराचे दर्शन घेतले. यानंतर निलेश राणे यांचा विश्वस्त डॉ. मिलींद देसाई यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या प्रसंगी डॉ. देसाई यांनी मंदिराच्या एकूणच कामकाजाबाबत माहिती देताना जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पात हे गाव बाधित आहे, मात्र या गावाच्या आणि मंदिराच्या विकासासाठी कंपनीकडून जो विकास निधी देण्यात येणार होता तो अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे मंदिर परिसरातील भौतिक सुविधा व अन्य कामे करता आली नसल्याचे यावेळी नमूद करत हा निधी लवकरात लवकर मिळावा अशी मागणी केली. त्यासाठी आपण पाठपुरावा करावा अशी निलेश राणे यांच्याकडे मागणी केली.

निलेश राणे यांनी आपण निश्चितच केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांच्यामार्फत प्रयत्न करू अशी ग्वाही दिली. मात्र तरीही निधी कमी पडला, तर भाजपच्या विधान परिषद सदस्यांच्या निधीतून आम्ही निधी देऊ, आपण प्रस्ताव द्या, असे सांगितले.

याप्रसंगी भाजप जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र नागरेकर, भाजपचे ठाणे शहर युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष सारंग मेढेकर, युवा मोर्चा ठाणे शहर जिल्हा संघटन सरचिटणीस अक्षय तिवरामकर, भाजप महिला आघाडीच्या नेत्या उल्का विश्वासराव, भाजप जिल्हा उद्योग आघाडीचे अध्यक्ष मुकुंद जोशी, दोनिवडेचे माजी सरपंच दीपक बेंद्रे, तालुका युवा मोर्चा अध्यक्ष जब्बार काझी, तालुका उपाध्यक्ष राजा काजवे, साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा शीतल चव्हाण, कोकण जनकल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंढरीनाथ आंबेरकर, राजन कुवेसकर आदींसह पदाधिकारी स्थानिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Recent Posts

Riteish Deshmukh : ‘हा’ कलाकार नदीत वाहून गेला म्हणून; रितेश देशमुखने थांबवलं ‘राजा शिवाजी’ सिनेमाचं शूटिंग

सातारा: रितेश देशमुखचा ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आला आहे. या चित्रपटाचं शूट…

24 minutes ago

Kesari Chapter 2 : अक्षय कुमारचा ‘केसरी 2’ फ्लॉप! ६ दिवस उलटूनही गल्ला रिकामाच

मुंबई : बॉलीवूड (Bollywood) चित्रपटसृष्टीत सातत्याने नवनवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. गेल्या काही दिवसांत…

44 minutes ago

उधमपूरमध्ये चकमक सुरू, जवान हुतात्मा

उधमपूर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांच्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. यानंतर संपूर्ण जम्मू…

57 minutes ago

पाकिस्तानचे अधिकृत ट्विटर हँडल भारतात ब्लॉक

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांच्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला.…

2 hours ago

गौतम गंभीरला ISIS Kashmir ने दिली ठार मारण्याची धमकी

नवी दिल्ली : भारताच्या पुरुष क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक (हेड कोच) गौतम गंभीर याला आयसिस…

2 hours ago

Health Tips: उन्हाळ्यात कशी घ्यावी त्वचेची काळजी ? जाणून घ्या

मुंबई: उन्हाळा आला की तो आपल्यासोबत अनेक आव्हाने घेऊन येतो. घामामुळे आणि तीव्र सूर्यप्रकाशामुळे त्वचेला…

3 hours ago