मासेमारी व्यवसायावर संकट कायम; निर्यातक्षम मासळीची वानवा


रत्नागिरी : मासेमारीचा हंगाम सुरू झाल्यापासून परदेशात जाणारी मासळी निर्यात करणाऱ्या कंपन्यांकडे फारच कमी प्रमाणात येत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून मच्छीमार नौकांना मासळी मिळण्यास नियमितपणा नसल्याचे मासळी निर्यात करणाऱ्या एका कंपनी मालकाने सांगितले.


बांगडा, सुरमई, बळा, ढोमा, म्हाकुळ, तार्ली सर्व प्रकारची कोळंबी आदी प्रकारची मासळी रत्नागिरीतून परदेशात निर्यात होते. गद्रे मरीन, नाईक, कारुण्य, जिलानी मरीन आणि एसकेआर या कंपन्यांकडून मासळी निर्यात होते.


सर्व प्रकारच्या मच्छीमार नौकांना समुद्रात मिळणारी मासळी या कंपन्यांकडे विकली जाते.


मासेमारीच्या यंदाच्या मोसमात गेल्या दोन महिन्यांपासून केवळ १५ ते २० टक्के नौकांनाच मासळी मिळण्याचा रिपोर्ट चांगला आहे. उर्वरित नौकांना आठवडाभर चांगल्या प्रमाणात मासळी मिळाली, तर दुसरा आठवडा तोट्याचा जातोय. अशी कमी-जास्त प्रमाणात कंपनीकडे मासळी येत असल्याचे एसकेआर कंपनीचे सुरेशकुमार खाडीलकर यांनी सांगितले.


रत्नागिरी जिल्ह्यात सर्व प्रकारच्या जाळ्यांनी मासेमारी करणाऱ्या ३ हजार ७७ मच्छीमार नौका आहेत. यामध्ये ३ हजार ५१९ यांत्रिकी, तर ४४२ बिगर यांत्रिकी नौका आहेत.


नौकांना सध्या एक आठवडा चांगली किंमत देणारी मासळी मिळाली, तर दुसरा आठवडा फिशमिल कंपन्यांना जाणारी बारीक मासळी म्हणजेच कुटी मिळत आहे. सध्या बांगडा बऱ्यापैकी प्रमाणात कंपन्यांकडे येत असल्याचेही एसकेआर कंपनीचे खाडीलकर यांनी सांगितले.

Comments
Add Comment

कोकणाच्या विकासासाठी भाजपचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’; जयगड बंदर बनणार अर्थव्यवस्थेचं केंद्र

रत्नागिरी: मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भाजप नेते नितेश राणे

रत्नागिरी नाचणेत मुलाकडून आईचा खून, खून करून मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न

गणेशोत्सवाच्या उत्साहात रत्नागिरी जिल्हा हादरला आहे. शहरातील नाचणे येथे पोटच्या मुलाने आपल्या आईचा निर्घृण

खेडमधील खवटी गावाजवळ खासगी बस आणि कारचा भीषण अपघात, तिघेजण गंभीर जखमी

खेडमधील खवटी गावाजवळ मंगळवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास खासगी बस आणि कार यांच्यात भीषण अपघात झाला. या

वैभव खेडेकरांची मनसेतून हकालपट्टी, वैभव खेडेकर भाजपाच्या वाटेवर, मनसेतून 4 जणांची हकालपट्टी

गेल्या काही दिवसांपासून वैभव खेडेकर यांच्या नावाची चर्चा सुरु होती, वैभव खेडेकर भाजपमध्ये जातील अशीही शक्यता

रत्नागिरीत खासगी बस आणि रिक्षा भाड्याबाबत ‘आरटीओ’कडून दर सूची प्रसिद्ध

रत्नागिरीत खासगी बस आणि रिक्षा भाड्याबाबत उपप्रादेशिक अधिकाऱ्यांनी दरतक्ता प्रसिद्ध करण्यात आले आहे.

मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी, काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम, दोन दिवस पावसाचा अंदाज

मुंबई : विश्रांती घेतलेल्या पावसाने मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी केली आहे. सकाळपासून रिमझिम पावसाळा सुरुवात