मासेमारी व्यवसायावर संकट कायम; निर्यातक्षम मासळीची वानवा

  29


रत्नागिरी : मासेमारीचा हंगाम सुरू झाल्यापासून परदेशात जाणारी मासळी निर्यात करणाऱ्या कंपन्यांकडे फारच कमी प्रमाणात येत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून मच्छीमार नौकांना मासळी मिळण्यास नियमितपणा नसल्याचे मासळी निर्यात करणाऱ्या एका कंपनी मालकाने सांगितले.


बांगडा, सुरमई, बळा, ढोमा, म्हाकुळ, तार्ली सर्व प्रकारची कोळंबी आदी प्रकारची मासळी रत्नागिरीतून परदेशात निर्यात होते. गद्रे मरीन, नाईक, कारुण्य, जिलानी मरीन आणि एसकेआर या कंपन्यांकडून मासळी निर्यात होते.


सर्व प्रकारच्या मच्छीमार नौकांना समुद्रात मिळणारी मासळी या कंपन्यांकडे विकली जाते.


मासेमारीच्या यंदाच्या मोसमात गेल्या दोन महिन्यांपासून केवळ १५ ते २० टक्के नौकांनाच मासळी मिळण्याचा रिपोर्ट चांगला आहे. उर्वरित नौकांना आठवडाभर चांगल्या प्रमाणात मासळी मिळाली, तर दुसरा आठवडा तोट्याचा जातोय. अशी कमी-जास्त प्रमाणात कंपनीकडे मासळी येत असल्याचे एसकेआर कंपनीचे सुरेशकुमार खाडीलकर यांनी सांगितले.


रत्नागिरी जिल्ह्यात सर्व प्रकारच्या जाळ्यांनी मासेमारी करणाऱ्या ३ हजार ७७ मच्छीमार नौका आहेत. यामध्ये ३ हजार ५१९ यांत्रिकी, तर ४४२ बिगर यांत्रिकी नौका आहेत.


नौकांना सध्या एक आठवडा चांगली किंमत देणारी मासळी मिळाली, तर दुसरा आठवडा फिशमिल कंपन्यांना जाणारी बारीक मासळी म्हणजेच कुटी मिळत आहे. सध्या बांगडा बऱ्यापैकी प्रमाणात कंपन्यांकडे येत असल्याचेही एसकेआर कंपनीचे खाडीलकर यांनी सांगितले.

Comments
Add Comment

मुंबई-गोवा महामार्ग पंधरा वर्षे का रखडला? प्रवाशांना १ कोटीचा विमा आणि नुकसान भरपाईसाठी नितीन गडकरींना थेट पत्र

रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दीर्घकाळ रखडलेल्या कामांमुळे त्रस्त झालेल्या कोकणवासीयांनी

मुसळधार पावसामुळे दुचाकीस्वार गेला वाहून, एनडीआरएफकडून तरुणाचा शोध सुरु...

सावंतवाडी : सोमवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साठल्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा

Ganesh Festival 2025 : चला गणपतीक गावाक जाऊचा असा; नियमित गाड्यांचे आरक्षण सुरु होतला…

कोकण मार्गावरील नियमित गाड्यांच्या आरक्षणाचे वेळापत्रक जारी झाल्याने रेल्वेच्या नियमांप्रमाणे ६० दिवसांचे

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर, माणगाव बायपास रस्त्यांचे काम पूर्ण होईपर्यंत वाहतूक कोंडी टाळण्यासाठी चार पर्यायी रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश मुंबई : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर आणि माणगाव बायपास

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाण्याखालील संग्रहालयाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

सेवानिवृत्त युद्धनौकेचे नवे स्वरूप, सागरी संवर्धन व पर्यटनाला चालना  मुंबई: आयएनएस गुलदार या नौदलातून

मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक १७ तासांनंतर सुरू

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील (Mumbai-Goa highway) निवळी घाटात सीएनजी टँकर आणि खासगी मिनी बस यांच्यात झालेल्या भीषण