रत्नागिरी : मासेमारीचा हंगाम सुरू झाल्यापासून परदेशात जाणारी मासळी निर्यात करणाऱ्या कंपन्यांकडे फारच कमी प्रमाणात येत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून मच्छीमार नौकांना मासळी मिळण्यास नियमितपणा नसल्याचे मासळी निर्यात करणाऱ्या एका कंपनी मालकाने सांगितले.
बांगडा, सुरमई, बळा, ढोमा, म्हाकुळ, तार्ली सर्व प्रकारची कोळंबी आदी प्रकारची मासळी रत्नागिरीतून परदेशात निर्यात होते. गद्रे मरीन, नाईक, कारुण्य, जिलानी मरीन आणि एसकेआर या कंपन्यांकडून मासळी निर्यात होते.
सर्व प्रकारच्या मच्छीमार नौकांना समुद्रात मिळणारी मासळी या कंपन्यांकडे विकली जाते.
मासेमारीच्या यंदाच्या मोसमात गेल्या दोन महिन्यांपासून केवळ १५ ते २० टक्के नौकांनाच मासळी मिळण्याचा रिपोर्ट चांगला आहे. उर्वरित नौकांना आठवडाभर चांगल्या प्रमाणात मासळी मिळाली, तर दुसरा आठवडा तोट्याचा जातोय. अशी कमी-जास्त प्रमाणात कंपनीकडे मासळी येत असल्याचे एसकेआर कंपनीचे सुरेशकुमार खाडीलकर यांनी सांगितले.
रत्नागिरी जिल्ह्यात सर्व प्रकारच्या जाळ्यांनी मासेमारी करणाऱ्या ३ हजार ७७ मच्छीमार नौका आहेत. यामध्ये ३ हजार ५१९ यांत्रिकी, तर ४४२ बिगर यांत्रिकी नौका आहेत.
नौकांना सध्या एक आठवडा चांगली किंमत देणारी मासळी मिळाली, तर दुसरा आठवडा फिशमिल कंपन्यांना जाणारी बारीक मासळी म्हणजेच कुटी मिळत आहे. सध्या बांगडा बऱ्यापैकी प्रमाणात कंपन्यांकडे येत असल्याचेही एसकेआर कंपनीचे खाडीलकर यांनी सांगितले.
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण त्रयोदशी ८.३० पर्यंत नंतर चतुर्दशी शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराभाद्रपदा…
पावसाळा आता जेमतेम सव्वा महिन्यावर आलेला आहे. पावसाळी हंगामास दरवर्षी कागदोपत्री १ जूनला सुरुवात होत…
मराठवाडा वार्तापत्र: अभयकुमार दांडगे उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. त्याच तुलनेत मराठवाड्यात तहानलेल्या गावांच्या संख्येतही…
रवींद्र तांबे ग्रामीण भागाचा विचार करता अजूनही पुरेशा मूलभूत सोयी नसल्याने नागरिक मुलांना घेऊन शहराकडे…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४३व्या सामन्यात आज चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायजर्स हैदराबादशी होत…
मुंबई: पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दुर्घटनेनंतर जखमी व त्यांच्या कुटुंबियांसाठी मुंबई महानगरपालिकेच्या टोपीवाला नॅशनल मेडिकल…