रझा अकादमीवर बंदी घाला, अन्यथा...

  35


आमदार नितेश राणे यांचा इशारा




मुंबई (प्रतिनिधी) : त्रिपुरामधील कथित घटनेच्या विरोधात रझा अकादमीने शुक्रवारी राज्यात काही ठिकाणी काढलेल्या मोर्चांना हिंसक वळण लागले होते. त्याविरोधात भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. आघाडी सरकारने रझा अकादमीवर लवकरात लवकर बंदी घालावी. अन्यथा त्यांना कसे संपवायचे ते आम्ही येणाऱ्या दिवसांमध्ये बघू, असा इशारा भाजपचे आमदार नितेश राणे यांनी दिला आहे.


ज्या पद्धतीने रझा अकादमीने ही दंगल घडवली आहेत, त्याची माहिती आमच्याकडे आहे, असे सांगून नितेश राणे म्हणाले, शुक्रवारी एका वेगळ्या उद्देशाने मोर्चा काढला गेला. हिंदूंना दबावात आणण्यासाठी हा मोर्चा होता.


महाराष्ट्रात जी दंगल उसळली त्याच्या पाठीमागे अतिरेकी संघटना रझा अकादमीच आहे. सरकारने त्यांच्यावर बंदी घालावी अन्यथा, महाराष्ट्राच्या भल्यासाठी आम्ही त्यांना संपवू, असा इशारा त्यांनी दिला.


रझा अकादमीला भाजपाचे पिल्लू म्हणणारे संजय राऊत यांचाही नितेश राणे यांनी समाचार घेतला. ते म्हणाले की, संजय राऊत आणि शिवसेनेने आपला आत्मा सत्तेसाठी विकला आहे. त्यांनी बाळासाहेबांच्या भाषणाची सीडी पाठवणार आहे. ती भाषणे ऐकल्यावर संजय राऊतांना कळेल की, सेनेची ओरिजनल भूमिका काय होती! तसेच ही रझा अकादमी हे महाविकास आघाडीचेच चौथे पिल्लू आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.


...तर अशा घटना होतच राहतील - निलेश राणे


त्रिपुरामध्ये घटना घडलीच नाही तरी, हिंदू समाजाला त्रास देण्यासाठी महाराष्ट्रात मोर्चे काढले गेले. रझा अकादमीच्या लोकांना आत्ताच ठेचले नाही तर अशा घटना नेहमी होत राहतील. याच रझा अकादमीने आझाद मैदानात देखील मोर्चा काढला होता आणि अनेक पोलीस बांधवांवर हात उचलले होते, असे भाजपचे प्रदेश सचिव निलेश राणे यांनी म्हटले आहे.

Comments
Add Comment

परवानगीविना ३४ मजली इमारत उभी राहिलीच कशी? उच्च न्यायालयाने महापालिकेला खडसावले!

मुंबई : मुंबईत ताडदेव भागात अनिवार्य अग्निसुरक्षा परवाना आणि इतर आवश्यक परवानग्यांविना ३४ मजली इमारत कशी उभी

Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन चीनमुळे रखडली; चीनमधील बंदरात टीबीएम मशिन अडकल्या!

मुंबई : चीनमधील बंदरात टीबीएम मशिन अडकल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी मुंबई-अहमदाबाद

भाईंदर येथे खून करुन बिहारला फरार झालेला आरोपी १३ वर्षांनी दिल्लीत सापडला

भाईंदर : भाईंदर पूर्वेतील नवघर पोलीस ठाणे हद्दीत १३ वर्षांपूर्वी घडलेल्या एका धक्कादायक खुनाचा गुंता आता सुटला

उबाठा-मनसे एकत्र येण्याआधीच काँग्रेसचा महाआघाडीला झटका!

महापालिका निवडणुका स्वबळावर लढवण्याची तयारी मुंबई : हिंदी सक्तीच्या विषयावरून मनसेप्रमुख राज ठाकरे आणि उबाठा

मुंबईत मरीन ड्राईव्हपेक्षा मोठा समुद्री पदपथ तयार! कधी सुरु होणार?

या मार्गाला धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता असे नाव मुंबई : मुंबईकरांसाठी

विकसित महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने काम करणार - मुख्य सचिव राजेश कुमार

मुंबई : महाराष्ट्र हे सर्व क्षेत्रात प्रगत राज्य आहे. राज्याचा मुख्य सचिव म्हणून २०४७ च्या विकसित महाराष्ट्र