रोजगार वाढतोय!

मुंबई (वार्ताहर) : अर्थव्यवस्था ‘रिकव्हरी मोड’मध्ये असल्याने नोकरीच्या संधीही वाढत आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत सप्टेंबर तिमाहीत रोजगाराच्या १४ टक्के जास्त संधी उपलब्ध आहेत. ‘मायकेल पेज इंडिया’ या जॉब आणि रिक्रूटमेंट एजन्सीने ही माहिती दिली आहे.


मायकेल पेजच्या मते, सप्टेंबरच्या तिमाहीत सर्वाधिक नोकरीच्या संधी अभियांत्रिकी, उत्पादन आणि तंत्रज्ञान क्षेत्रात निर्माण झाल्या आहेत. सप्टेंबर तिमाहीत नोकऱ्यांमध्ये वार्षिक १४ टक्के वाढ झाली, असे कंपनीचे एमडी निकोलस डुमॉलिन म्हणतात. गेल्या वर्षीच्या तुलनेत रोजगार संधींमध्ये पन्नास टक्के वाढ झाली आहे. आज कोरोनाच्या संकटातून देश सावरत आहे. त्यामुळे कंपन्यांच्या उत्पादनांना मागणी वाढली आहे. कंपन्यांना उत्पादन वाढवावं लागत असून त्यासाठी नोकर भरती करावी लागत आहे. जानेवारी ते सप्टेंबर २०२१ दरम्यान नोकरीच्या संधींमध्ये सातत्याने वाढ झाली आहे.


अभियांत्रिकी आणि उत्पादन क्षेत्रात नोकऱ्यांमध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे. लीगल आणि एचआरसारख्या नॉन आयटी भरतीमध्येही वाढ झाली आहे. मायकेल पेज इंडियाच्या अहवालानुसार, तंत्रज्ञान क्षेत्र ५८ टक्के वार्षिक वाढीसह दुसऱ्या स्थानावर आहे. त्यानंतर ३५ टक्के वाढीसह कायदा आणि २५ टक्के वाढीसह मानवी संसाधनांसारख्या क्षेत्रांचा क्रमांक लागतो.


त्रैमासिक आधारावर अभियांत्रिकी क्षेत्रातल्या भरतीमध्ये २० टक्के वाढ झाली. अहवालात असंही म्हटलं आहे, की गेल्या काही महिन्यांमध्ये लसीकरण आणि आर्थिक क्रियाकलाप वाढल्याने रोजगाराच्या संधी वाढल्या आहेत. अभियांत्रिकी आणि उत्पादन क्षेत्रं या बाबतीत आघाडीवर आहेत, तिमाही आधारावर भरती २० टक्क्यांनी वाढली आहे. बहुतांश भरती मार्केटिंगच्या क्षेत्रात होत आहे. त्यात विपणन प्रथम आणि तंत्रज्ञान दुसऱ्या स्थानावर होतं.


स्टार्टअप इकोसिस्टीममध्ये मोठ्या प्रमाणावर आयटी नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत. जून २०२१ नंतर कंपन्यांचं काम पुन्हा सुरू झालं.

Comments
Add Comment

मुंबई वॉटर मेट्रो जलवाहतूक प्रकल्पाला गती देण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

मुंबई : "मुंबई महानगर प्रदेशात जलप्रवासी वाहतुकीसाठी वॉटर मेट्रो प्रकल्प तीन टप्प्यात कार्यान्वित करण्यात

आमदार हेमंत पाटील यांनी मांडली 'लव्ह जिहाद' आणि 'लोकसंख्या नियंत्रणाची' आग्रही भूमिका

विधान परिषदेत धर्मांतर विरोधी विधेयकावर चर्चा मुंबई : विधान परिषदेत आज धर्मांतर विरोधी विधेयकावर अत्यंत

धर्मांतर हा श्रद्धेचा विषय, व्यवहाराचा नाही!"; विधान परिषदेत आमदार प्रवीण दरेकरांची ठाम भूमिका

मुंबई: "धर्म हा केवळ मानवी श्रद्धेचा भाग असून त्याचा व्यवहारासाठी किंवा स्वार्थासाठी वापर करणे चुकीचे आहे.

राज्यातील कालबाह्य ८० कायदे रद्द

विधेयक मंजूर; मुंबई फटक्यांची शिक्षा रद्द करण्याचा अधिनियम रद्द मुंबई : महाराष्ट्रातील कालबाह्य झालेले ८०

नायजेरियन नागरिकांविरोधात लवकरच धडक मोहीम - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

वैध कागदपत्रे नसलेल्यांना हद्दपार करणार मुंबई : राज्यात विशेषतः मुंबईनजीकच्या उपनगरांमध्ये बेकायदेशीरपणे

ड्रग्ज तस्करी रोखण्यासाठी कारवाईची वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षे करणार

मुंबई : अमली पदार्थांच्या तस्करीसाठी मोठ्या प्रमाणात अल्पवयीन मुलांचा उपयोग केला जात आहे. त्यामुळे याला पायबंद