मुंबई (वार्ताहर) : अर्थव्यवस्था ‘रिकव्हरी मोड’मध्ये असल्याने नोकरीच्या संधीही वाढत आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत सप्टेंबर तिमाहीत रोजगाराच्या १४ टक्के जास्त संधी उपलब्ध आहेत. ‘मायकेल पेज इंडिया’ या जॉब आणि रिक्रूटमेंट एजन्सीने ही माहिती दिली आहे.
मायकेल पेजच्या मते, सप्टेंबरच्या तिमाहीत सर्वाधिक नोकरीच्या संधी अभियांत्रिकी, उत्पादन आणि तंत्रज्ञान क्षेत्रात निर्माण झाल्या आहेत. सप्टेंबर तिमाहीत नोकऱ्यांमध्ये वार्षिक १४ टक्के वाढ झाली, असे कंपनीचे एमडी निकोलस डुमॉलिन म्हणतात. गेल्या वर्षीच्या तुलनेत रोजगार संधींमध्ये पन्नास टक्के वाढ झाली आहे. आज कोरोनाच्या संकटातून देश सावरत आहे. त्यामुळे कंपन्यांच्या उत्पादनांना मागणी वाढली आहे. कंपन्यांना उत्पादन वाढवावं लागत असून त्यासाठी नोकर भरती करावी लागत आहे. जानेवारी ते सप्टेंबर २०२१ दरम्यान नोकरीच्या संधींमध्ये सातत्याने वाढ झाली आहे.
अभियांत्रिकी आणि उत्पादन क्षेत्रात नोकऱ्यांमध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे. लीगल आणि एचआरसारख्या नॉन आयटी भरतीमध्येही वाढ झाली आहे. मायकेल पेज इंडियाच्या अहवालानुसार, तंत्रज्ञान क्षेत्र ५८ टक्के वार्षिक वाढीसह दुसऱ्या स्थानावर आहे. त्यानंतर ३५ टक्के वाढीसह कायदा आणि २५ टक्के वाढीसह मानवी संसाधनांसारख्या क्षेत्रांचा क्रमांक लागतो.
त्रैमासिक आधारावर अभियांत्रिकी क्षेत्रातल्या भरतीमध्ये २० टक्के वाढ झाली. अहवालात असंही म्हटलं आहे, की गेल्या काही महिन्यांमध्ये लसीकरण आणि आर्थिक क्रियाकलाप वाढल्याने रोजगाराच्या संधी वाढल्या आहेत. अभियांत्रिकी आणि उत्पादन क्षेत्रं या बाबतीत आघाडीवर आहेत, तिमाही आधारावर भरती २० टक्क्यांनी वाढली आहे. बहुतांश भरती मार्केटिंगच्या क्षेत्रात होत आहे. त्यात विपणन प्रथम आणि तंत्रज्ञान दुसऱ्या स्थानावर होतं.
स्टार्टअप इकोसिस्टीममध्ये मोठ्या प्रमाणावर आयटी नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत. जून २०२१ नंतर कंपन्यांचं काम पुन्हा सुरू झालं.
सिंधू नदीला पाकिस्तानची लाईफलाईन समजले जाते. अरबी समुद्राला जाऊन मिळणारी सिंधू नदी पाकिस्तानातील अनेक राज्यांमधून…
पहलगाममध्ये निष्पाप हिंदू पर्यटकांवर थेट धर्म विचारून गोळ्या झाडण्यात आल्या... ३७० हटवल्यानंतर, काश्मीरने लोकशाहीच्या दिशेनं…
नवी दिल्ली : काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा परिपाक आता भारत सरकारने कठोर…
जम्मू-काश्मीरमधील निसर्गसंपन्न, सुंदर ठिकाण म्हणजे पहेलगाम. अनेक वर्षांपासून इथे पर्यटकांची मोठी वर्दळ असते. पण नुकताच…
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा परिणाम माता वैष्णवदेवी यात्रेवरही पाहायला मिळत आहे. जम्मू काश्मीर: पहलगाममधील (Pahalgam Terror…
काश्मीरच्या निळ्याशार आकाशाखाली, निसर्गाच्या कुशीत… पुन्हा एकदा दहशतीचा अंधार दाटलाय. निसर्गदृश्यांचं स्वर्ग जिथं वाटायचं, तिथंच…