मंत्री नवाब मलिक ‘पाकिस्तानचे एजंट’


आमदार नितेश राणे यांचा घणाघात




कणकवली (प्रतिनिधी) : ठाकरे सरकारमधील राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक हे पाकिस्तानचे 'एजंट' झालेले आहेत. पाकिस्तानमधून येणारे ड्रग्ज मुंबईसह महाराष्ट्रात पुरविणारे जे ड्रग्ज माफिया आहेत, त्यांचे ते ब्रँड अॅम्बेसेडर आहेत, अशी जोरदार टीका आमदार नितेश राणे यांनी केली.


कणकवलीत प्रहार भवन येथे भाजप प्रदेशच्या वतीने आयोजित रत्नागिरी-सिंधुदुर्गमधील पत्रकार परिषदेत आ. नितेश राणे यांनी ठाकरे सरकारचा समाचार घेतला. यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष संदेश ऊर्फ गोट्या सावंत, भाजप कृषी मोर्चा जिल्हाध्यक्ष उमेश सावंत, कणकवली तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, शहर अध्यक्ष अण्णा कोदे आदी उपस्थित होते.


एनसीबीने नवाब मलिक यांच्या जावयाला अशाच एका प्रकरणात अटक केली होती, म्हणून ते या खात्याची आणि अधिकाऱ्यांची बदनामी करत आहेत.

मात्र, स्वतःला मराठी माणसांची संघटना म्हणवून घेताना शिवसेनेला लाज वाटली पाहिजे. अधिकारी वानखेडे कोण आहेत? ते मराठी नाहीत काय? तुमचा नवाब मलिक मराठी माणसाला रोज चिरडतो, त्याला धमकी देतो, तुम्ही काहीच बोलणार नाही. शिवसेनेची मराठी अस्मिता आता कुठे गेली? असा संतप्त सवाल आ.नितेश राणे यांनी केला.


नवाब मलिक पाठराखण करत असल्याने राज्यातील ड्रग्ज माफिया शांत झोपत आहेत. राज्याची भावी पिढी बरबाद करण्यात मंत्री नवाब मलिक यांची महत्वाची भूमिका आहे, असे सांगतानाच, शिवसेना खा. संजय राऊत यांनी मराठी अस्मिता, हिंदुत्व हिंमत असेल तर मंत्री नवाब मलिक यांना शिकवावे, असे त्यांनी सुनावले.

Comments
Add Comment

मुंबई-विजयदुर्ग 'रोरो' सेवेचा आजपासून श्रीगणेशा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या शुभेच्छा

मुंबई: कोकणची लाल माती आणि अथांग अरबी समुद्र यांचे नाते आता अधिक घट्ट होणार आहे. गेल्या अनेक दशकांपासून ज्या

Narayan Rane : "आमच्यात कटुता असली तरी जिव्हाळा कायम!" भास्कर जाधवांनी व्यक्त केली राणे साहेबांबद्दलची कृतज्ञता;

'त्या' घटनेनंतर जुन्या आठवणींना उजाळा चिपळूण : राजकारणात एकमेकांवर तुटून पडणारे नेते, वैयक्तिक आयुष्यात

फोंडाघाटचा ‘किऱ्याचा आंबा’ होणार जमीनदोस्त

कणकवली : फोंडाघाट, हवेलीनगर येथील शेकडो वर्षांपूर्वीचे ऐतिहासिक अधिष्ठान आणि मार्गदर्शक आख्यायिका, तसेच

कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

उद्यापर्यंत ब्लॉक रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरील धावणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले असून पुढील

‘वलसाड हापूस’ या नावाने स्वतंत्र मानांकनांसाठी गुजरात प्रयत्नशील

मुंबई : हापूस आंबा म्हटले की, कोकण किनारपट्टीवर उत्पादित होणारा गोड, चविष्ट आणि सुवासिक आंबा सर्वांच्या

Anganewadi Jatra 2026 : भराडी देवीचा 'कौल' मिळाला! लाखो भाविकांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम; आंगणेवाडी जत्रेची तारीख अखेर ठरली!

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या आणि कोकणातील सर्वात महत्त्वाची यात्रा समजल्या जाणाऱ्या मालवण