मंत्री नवाब मलिक ‘पाकिस्तानचे एजंट’


आमदार नितेश राणे यांचा घणाघात




कणकवली (प्रतिनिधी) : ठाकरे सरकारमधील राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक हे पाकिस्तानचे 'एजंट' झालेले आहेत. पाकिस्तानमधून येणारे ड्रग्ज मुंबईसह महाराष्ट्रात पुरविणारे जे ड्रग्ज माफिया आहेत, त्यांचे ते ब्रँड अॅम्बेसेडर आहेत, अशी जोरदार टीका आमदार नितेश राणे यांनी केली.


कणकवलीत प्रहार भवन येथे भाजप प्रदेशच्या वतीने आयोजित रत्नागिरी-सिंधुदुर्गमधील पत्रकार परिषदेत आ. नितेश राणे यांनी ठाकरे सरकारचा समाचार घेतला. यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष संदेश ऊर्फ गोट्या सावंत, भाजप कृषी मोर्चा जिल्हाध्यक्ष उमेश सावंत, कणकवली तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, शहर अध्यक्ष अण्णा कोदे आदी उपस्थित होते.


एनसीबीने नवाब मलिक यांच्या जावयाला अशाच एका प्रकरणात अटक केली होती, म्हणून ते या खात्याची आणि अधिकाऱ्यांची बदनामी करत आहेत.

मात्र, स्वतःला मराठी माणसांची संघटना म्हणवून घेताना शिवसेनेला लाज वाटली पाहिजे. अधिकारी वानखेडे कोण आहेत? ते मराठी नाहीत काय? तुमचा नवाब मलिक मराठी माणसाला रोज चिरडतो, त्याला धमकी देतो, तुम्ही काहीच बोलणार नाही. शिवसेनेची मराठी अस्मिता आता कुठे गेली? असा संतप्त सवाल आ.नितेश राणे यांनी केला.


नवाब मलिक पाठराखण करत असल्याने राज्यातील ड्रग्ज माफिया शांत झोपत आहेत. राज्याची भावी पिढी बरबाद करण्यात मंत्री नवाब मलिक यांची महत्वाची भूमिका आहे, असे सांगतानाच, शिवसेना खा. संजय राऊत यांनी मराठी अस्मिता, हिंदुत्व हिंमत असेल तर मंत्री नवाब मलिक यांना शिकवावे, असे त्यांनी सुनावले.

Comments
Add Comment

कोकणाच्या विकासासाठी भाजपचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’; जयगड बंदर बनणार अर्थव्यवस्थेचं केंद्र

रत्नागिरी: मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भाजप नेते नितेश राणे

रत्नागिरी नाचणेत मुलाकडून आईचा खून, खून करून मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न

गणेशोत्सवाच्या उत्साहात रत्नागिरी जिल्हा हादरला आहे. शहरातील नाचणे येथे पोटच्या मुलाने आपल्या आईचा निर्घृण

खेडमधील खवटी गावाजवळ खासगी बस आणि कारचा भीषण अपघात, तिघेजण गंभीर जखमी

खेडमधील खवटी गावाजवळ मंगळवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास खासगी बस आणि कार यांच्यात भीषण अपघात झाला. या

वैभव खेडेकरांची मनसेतून हकालपट्टी, वैभव खेडेकर भाजपाच्या वाटेवर, मनसेतून 4 जणांची हकालपट्टी

गेल्या काही दिवसांपासून वैभव खेडेकर यांच्या नावाची चर्चा सुरु होती, वैभव खेडेकर भाजपमध्ये जातील अशीही शक्यता

रत्नागिरीत खासगी बस आणि रिक्षा भाड्याबाबत ‘आरटीओ’कडून दर सूची प्रसिद्ध

रत्नागिरीत खासगी बस आणि रिक्षा भाड्याबाबत उपप्रादेशिक अधिकाऱ्यांनी दरतक्ता प्रसिद्ध करण्यात आले आहे.

मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी, काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम, दोन दिवस पावसाचा अंदाज

मुंबई : विश्रांती घेतलेल्या पावसाने मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी केली आहे. सकाळपासून रिमझिम पावसाळा सुरुवात