निकृष्ट दर्जाची कामे खपवून घेणार नाही


उंबर्डे - फोंडा रस्ता दुरुस्ती कामाच्या शुभारंभावेळी नितेश राणे यांचा इशारा




वैभववाडी (प्रतिनिधी) : दुरवस्थेमुळे चर्चेचा विषय ठरलेल्या उंबर्डे - फोंडा रस्ता डागडुजी कामाला सुरुवात होत आहे. या रस्त्याचे काम दर्जेदारपणे करून घेण्याची जबाबदारी ही स्थानिक नागरिक व लोकप्रतिनिधी यांची आहे. निकृष्ट दर्जाची कामे खपवून घेणार नाही. अशी कामे होत असतील तर ती तात्काळ थांबवा, अशा सूचना आमदार नितेश राणे यांनी उपस्थित नागरिकांना दिल्या.


उंबर्डे - फोंडा रस्ता डागडुजी कामाचा शुभारंभ आमदार नितेश राणे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष नासीर काझी, पंचायत समिती उपसभापती अरविंद रावराणे, माजी वित्त व बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे, भालचंद्र साठे, दिलीप रावराणे, जिल्हा बँक संचालक गुलाबराव चव्हाण, राजेंद्र राणे, स्नेहलता चोरगे, सीमा नानिवडेकर, प्राची तावडे, उपनगराध्यक्ष रोहन रावराणे, किशोर दळवी, आबा दळवी, संताजी रावराणे, संजय सावंत, रज्जब रमदुल, बाबालाल लांजेकर, उमर रमदुल, उदय मुद्रस, दशरथ दळवी, सुनील भोगले, प्रकाश पाटील, तसेच कार्यकारी अभियंता शेवाळे, उपकार्यकारी अभियंता कांबळे, कनिष्ठ अभियंता सुतार, दुडिये, ठेकेदार व भाजप पदाधिकारी उपस्थित होते.


उंबर्डे - फोंडा हा रस्ता सर्वांसाठी चर्चेचा विषय राहीला आहे. या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. रस्त्याने चालणे देखील मुश्कील झाले आहे. या रस्त्याच्या डागडुजीसाठी एकूण ६ कोटींचा निधी मंजूर आहे. परंतु कोरोना काळात अनेक अडचणीमुळे हे काम थांबले होते. प्रत्येक बैठकीत काम मंजूर आहे इतकं उत्तर अधिकाऱ्यांकडून दिले जात होते.


या पार्श्वभूमीवर वैभववाडी येथे आमदार नितेश राणे यांनी बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांची रस्ते दुरवस्थेबाबत बैठक घेतली. या बैठकीत नासीर काझी, भालचंद्र साठे व राजेंद्र राणे यांनी या रस्त्याच्या दुरवस्थेबाबत लक्ष वेधले. दरम्यान शेवाळे यांनी निधी मंजूर आहे. लवकरच काम सुरू होईल असे तोकडे उत्तर दिले. आमदार नितेश राणे यांनी थेट अधिकाऱ्यांना भुमीपूजनाची तारीख व वेळ दिली. त्यामुळे यंत्रणा खडबडून जागी झाली. उंबर्डे येथे हा भूमिपूजन सोहळा पार पडला. काम कधी पासून सुरू करणार? असा प्रश्न नितेश राणे यांनी अधिकारी व ठेकेदार यांना केला. १० नोव्हेंबर पासून काम सुरू करणार असल्याचे ठेकेदार सुधाकर साळुंखे व देवानंद पालांडे यांनी सांगितले.


यावेळी उंबर्डे ग्रामस्थ व भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments
Add Comment

जयगड बंदरातून काजू निर्यातीसाठी आवश्यक प्रक्रिया गतीने कराव्यात – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड बंदरातून मोठ्या प्रमाणात काजू निर्यात व्हावी यासाठी संबधित विभागांनी

Narayan Rane : 'कोण आदित्य ठाकरे?' "बाळासाहेबांनंतर शिवसेना राहिली नाही! नारायण राणेंचा उद्धव गटावर हल्लाबोल

चिपळूण : भाजप खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी आज चिपळूण दौऱ्यादरम्यान शिउबाठा नेतृत्वावर अत्यंत कडक शब्दांत टीका

साळीस्ते खून प्रकरणात नवा ट्विस्ट! मृतदेह डॉक्टर पेशातील व्यक्तीचा असल्याची चर्चा ?

कणकवली: साळीस्ते येथे गुरुवारी दुपारी १२:३० एका पुरुषाचा मृतदेह काहीसा कुजलेल्या अवस्थेत सापडल्याने खळबळ माजली

Rain Alert : दिवाळीच्या उत्साहात पावसाचं विघ्न? मुंबई-कोकण किनारपट्टीवरील हवामान बदलणार, कसा असेल अंदाज?

मुंबई : महाराष्ट्रासह देशातील बहुतांश राज्यांतून मान्सूनने आता माघार घेतली असली तरीही, अनेक ठिकाणी अद्याप

दिवाळीच्या सुट्टीत मुंबई-गोवा महामार्ग ठप्प! प्रवाशांचा खोळंबा; 'खड्ड्यांतील प्रवास कधी थांबणार?'

मुंबई/महाड: दिवाळीच्या सुट्ट्या तोंडावर आल्या असतानाच मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर (NH-66) आज, १७ ऑक्टोबर रोजी

IRCTC Website Crash : ऐन दिवाळीच्या तोंडावर रेल्वे प्रवाशांना मोठा फटका! तिकीट बुक होता होईना, IRCTC वेबसाइट आणि ॲप अचानक ठप्प

दिवाळीच्या तोंडावर प्रवाशांची मोठी गैरसोय दिवाळीच्या काळात गावी जाणाऱ्या लाखो प्रवाशांना आज एक मोठी तांत्रिक