मुंबईतील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करा

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील अनधिकृत बांधकामांवर महापालिकेने युद्ध पातळीवर तातडीने कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री आणि पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांची बैठक झाल्यानंतर पालिका आयुक्तांनी आदेश दिले आहेत.


सध्या मुंबईत अनधिकृत बांधकामे उभी राहत आहेत. कोरोना काळातील निर्बंध शिथिल होऊ लागल्यानंतर देखील यात भर पडली आहे. या पार्श्वभूमीवर या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. व्हीडिओ कॉन्फरन्िसंगद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमवेत पालिका आयुक्तांच्या झालेल्या बैठकीत याबाबत चर्चा करण्यात आली. मुंबईतील रस्ते दुरुस्ती कामांची निविदा प्रक्रिया व्यवस्थितपणे आणि पारदर्शक पद्धतीने करा. रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे काम प्राधान्याने पूर्ण झाले पाहिजे, त्यासाठी कालमर्यादा ठरवून द्या, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.


रस्ते, पदपथ, दुभाजक, रस्त्यांच्या कडेचे कठडे, बागा-उद्याने सुंदर आणि व्यवस्थित असतील हे पाहण्याचे काम आपले आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. पूर्व आणि पश्चिम महामार्गांलगत मोठ्या प्रमाणावर डेब्रिज टाकले जात असल्याचे निदर्शनास आले आहे, याठिकाणी कॅमेरे लावून हे डेब्रिज टाकणाऱ्यांवर तातडीने कारवाई करा, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानंतर पालिका आयुक्तांनी तात्काळ कार्यवाही सुरू करण्याचे निर्देश महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले.


तसेच पालिकेच्या सर्व २४ विभागांच्या सहाय्यक आयुक्तांनी अनधिकृत बांधकामांविरोधात धडक कारवाई अधिक प्रभावीपणे सुरू करावी. तसेच कोणताही दबाव आला तरी मागे हटू नये, असेही आदेश देण्यात आले आहे. त्यानुसार पालिकेच्या २४ विभागांत सहाययक आयुक्त कारवाईला सुरवात करणार आहेत.

Comments
Add Comment

जनगणना २०२७: मुंबईत पूर्व चाचणी चेंबूर एम पश्चिम विभागात

मुंबई (खास प्रतिनिधी) : जनगणना - २०२७ च्या तयारीचा एक भाग म्हणून, पूर्वचाचणी घेतली जाणार आहे. ज्यामध्ये जनगणनेच्या

महाराष्ट्रातील ७ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई: महाराष्ट्र शासनाने नुकतेच प्रशासकीय कामकाजात मोठे फेरबदल केले असून, सात वरिष्ठ भारतीय प्रशासकीय सेवा (IAS)

नोव्हेंबर महिन्यात कोणत्या दिवशी बँका राहणार बंद? जाणून घ्या...

मुंबई : नोव्हेंबर महिन्यात बँकांशी संबंधित कोणतेही काम करायचे असल्यास आधीच सावधान राहा, कारण नोव्हेंबरमध्ये

कबुतर खान्यांसाठी जैन समाजाच्या शिष्टमंडळाने घेतली मुंबई महापालिका आयुक्तांची भेट, केली ही मागणी...

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईतील कबुतरखान्यांसाठी जनतेला तथा नागरिकांना त्रास होणार नाही, अशा पर्यायी जागांचा

इयत्ता पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा ८ फेब्रुवारी रोजी

मुंबई : पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता पाचवी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता

उद्धव ठाकरे हे स्वतःच 'अजगर'- बावनकुळेंचा जोरदार हल्ला, 'आयत्या बिळावर नागोबा' म्हणत शेलारांची टीका

मुंबई : सध्या महाराष्ट्रातील राजकारण अ‍ॅनाकोंडा, अजगर या शब्दांच्या टीकेवरून चांगलेच तापले आहे. उद्धव ठाकरेंनी