मुंबईतील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करा

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील अनधिकृत बांधकामांवर महापालिकेने युद्ध पातळीवर तातडीने कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री आणि पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांची बैठक झाल्यानंतर पालिका आयुक्तांनी आदेश दिले आहेत.


सध्या मुंबईत अनधिकृत बांधकामे उभी राहत आहेत. कोरोना काळातील निर्बंध शिथिल होऊ लागल्यानंतर देखील यात भर पडली आहे. या पार्श्वभूमीवर या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. व्हीडिओ कॉन्फरन्िसंगद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमवेत पालिका आयुक्तांच्या झालेल्या बैठकीत याबाबत चर्चा करण्यात आली. मुंबईतील रस्ते दुरुस्ती कामांची निविदा प्रक्रिया व्यवस्थितपणे आणि पारदर्शक पद्धतीने करा. रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे काम प्राधान्याने पूर्ण झाले पाहिजे, त्यासाठी कालमर्यादा ठरवून द्या, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.


रस्ते, पदपथ, दुभाजक, रस्त्यांच्या कडेचे कठडे, बागा-उद्याने सुंदर आणि व्यवस्थित असतील हे पाहण्याचे काम आपले आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. पूर्व आणि पश्चिम महामार्गांलगत मोठ्या प्रमाणावर डेब्रिज टाकले जात असल्याचे निदर्शनास आले आहे, याठिकाणी कॅमेरे लावून हे डेब्रिज टाकणाऱ्यांवर तातडीने कारवाई करा, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानंतर पालिका आयुक्तांनी तात्काळ कार्यवाही सुरू करण्याचे निर्देश महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले.


तसेच पालिकेच्या सर्व २४ विभागांच्या सहाय्यक आयुक्तांनी अनधिकृत बांधकामांविरोधात धडक कारवाई अधिक प्रभावीपणे सुरू करावी. तसेच कोणताही दबाव आला तरी मागे हटू नये, असेही आदेश देण्यात आले आहे. त्यानुसार पालिकेच्या २४ विभागांत सहाययक आयुक्त कारवाईला सुरवात करणार आहेत.

Comments
Add Comment

दसऱ्याच्या मुहूर्तावर दोन मेट्रो मार्गिका सुरू होण्याची शक्यता

मुंबई : नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येण्याची चर्चा असतानाच

Rain Update : मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाचा धुमाकूळ

मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळालं.मुंबई,

मत्स्यव्यवसाय व पशुसंवर्धन क्षेत्रात विकासासाठी महाराष्ट्रात मोठ्या संधी

मत्स्यव्यवसाय सुधारणा व दीर्घकालीन विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक मुंबई : राज्यात

सूर्यकुमार यादवला पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संतोष जगदाळेंच्या पत्नीने सुनावले

पहलगाम हल्ल्यातील बळींना विजय समर्पित करण्याऐवजी, पाकिस्तानविरुद्ध खेळायलाच नको होते. डोंबिवली: भारताने आशिया

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून मुंबईत वाढला पावसाचा जोर

मुंबई : गणेशोत्सवानंतर काही दिवस पावसाचा जोर एकदम ओसरला होता. पण १२ सप्टेंबरपासून पावसाचा जोर हळू हळू वाढत गेला.