प्लास्टिक बंद मोहिमेला ‘ब्रेक’

  88

देवा पेरवी


पेण : दोन वर्षांहून अधिक काळ प्रभाव दाखवलेल्या कोरोनाने सामाजिक घडी अक्षरशः विस्कळीत केली आहे. अनेकांचे रोजगार गेले, व्यवसाय बुडाला. याउलट विविध प्रकारचे व्यवहार ठप्प झाल्याने ध्वनी, वायू प्रदूषणही कमी झाले. दुसरीकडे, लॉकडाऊन शिथिल होताच प्लास्टिक बंदी मोहिमेचा पेण नगरपरिषदेसह बहुतांश सर्वच विभागातील प्रशासनाला विसर पडल्याचे चित्र दिसत आहे. तालुक्यातील ग्रामीण भागाची मुख्य बाजारपेठ असणाऱ्या पेण शहरातील बहुतेक दुकानदार, हातगाडी, मच्छी, मटण, फळे विक्रेते बिनधास्तपणे ग्राहकांना प्लास्टिक पिशव्या देत आहेत. त्यामुळे प्लास्टिक बंदी मोहिमेला ब्रेक लागल्याचे सर्वश्रुत आहे.


प्रारंभी काळात प्रभावी ठरलेली प्लास्टिक बंदी मोहिमेला सैलपणा आला. मुख्यतः पेण शहरात प्लास्टिकचा सर्रास वापर होत असल्याने पेण नगरपरिषद प्रशासन कमालीचे अपयशी ठरल्याचे समोर येत आहे. दरम्यान, पेण शहरासह तालुक्यातील सर्वच भागांत प्लास्टिकने जोरदर डोके वर काढले आहे. प्लास्टिकचा वापर रोखण्यात जिल्हा प्रशासन, पंचायत समिती प्रशासन, ग्रामपंचायत प्रशासनही पूर्णत: अपयशी ठरले आहे. अशात संपूर्ण जगावर आलेल्या महाभयंकर संकट कोरोनाने प्लास्टिकला उभारी दिली की काय, असेच चित्र सध्या पेणमध्ये पाहायला मिळत आहे.


कोरोनाचे जाचक निर्बंध सध्या शिथिल झाल्याने या काळात प्लास्टिक बंदी मोहिमेला मोठी खिळ बसली. सर्व प्रकारचे प्लास्टिक किती धोकादायक आहे, हे नुकत्याच आलेल्या विविध नैसर्गिक आपत्तीने वारंवार दाखवून दिले. अनेक नाले, ओढे प्लास्टिकच्या साठ्यांनी चक्काजाम झाले. त्यातून पाण्याने मार्ग बदलत आपली अधिक ताकद दाखवून दिली. प्लास्टिक कचऱ्याने जमीन नापीक होत आहे. आज सर्वच रस्त्याच्या दुतर्फा, कालवा, गटारे, मैदाने प्लास्टिक आणि दारूच्या बाटल्यांनी अक्षरश: विद्रुप झाले आहेत. ठिकठिकाणी प्लास्टिकच्या पिशव्यांनी पाणी अडले आहे. अनेक ठिकाणी कचऱ्यातून दुर्गंधी येत आहे. डासांचे प्रमाण वाढले आहे. महाड व इतर ठिकाणच्या महापुरात निसर्गाचे ‘टिट फॉर टिट’ रूप पाहायला मिळाले. फेकलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या पुन्हा त्याच जागी आल्या.


प्लास्टिकचा धोका रोखण्यासाठी शासनाने त्यावेळी जोरदार प्लास्टिक मुक्त मोहीम सुरू केली. मोहिम अंशतः यशस्वी ठरली खरी, मात्र कोरोना काळापासून आजपर्यंत मोहिमेत पुन्हा खंड पडला आहे. अशात सध्याच्या काळात प्लास्टिकचा वापर खूपच वाढला आहे. मुख्य बाजारपेठ पेण शहरात प्लास्टिक बंदी मोहिमेला हरताळ फासला गेला. आधीच रस्त्यावर पडलेले खड्डे, विविध अर्धवट विकासकामे, भुयारी गटार योजना कामात पेण न.प. प्रशासन प्लास्टिक मोहीम नव्याने राबवण्यात अपयशी ठरली. आता नगरपरिषदेला पूर्णवेळ जीवन पाटील हे मुख्याधिकारी लाभले आहेत. त्यामुळे मुख्यत: प्लास्टिक बंदी मोहीम अधिक क्षमतेने सुरू होईल, अशी अपेक्षा असतानाच मोहिमेला ब्रेक दिला की काय, असा सवाल उपस्थित होत आहे.


दरम्यान, नवे मुख्याधिकारी जीवन पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कारवाई करण्याचा सूचना दिल्या असल्याचे सांगितले. यापुढे आपण शहर प्लास्टिक मुक्त मोहीम अधिक प्रभावी करणार आहोत. याअगोदर अनेकदा कारवाई केली. अजूनही प्लास्टिक विक्री व वापर सुरू आहे, त्यावरही कारवाई सुरू करू, असे पाटील यांनी सांगितले.


Comments
Add Comment

रत्नागिरी नाचणेत मुलाकडून आईचा खून, खून करून मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न

गणेशोत्सवाच्या उत्साहात रत्नागिरी जिल्हा हादरला आहे. शहरातील नाचणे येथे पोटच्या मुलाने आपल्या आईचा निर्घृण

खेडमधील खवटी गावाजवळ खासगी बस आणि कारचा भीषण अपघात, तिघेजण गंभीर जखमी

खेडमधील खवटी गावाजवळ मंगळवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास खासगी बस आणि कार यांच्यात भीषण अपघात झाला. या

वैभव खेडेकरांची मनसेतून हकालपट्टी, वैभव खेडेकर भाजपाच्या वाटेवर, मनसेतून 4 जणांची हकालपट्टी

गेल्या काही दिवसांपासून वैभव खेडेकर यांच्या नावाची चर्चा सुरु होती, वैभव खेडेकर भाजपमध्ये जातील अशीही शक्यता

रत्नागिरीत खासगी बस आणि रिक्षा भाड्याबाबत ‘आरटीओ’कडून दर सूची प्रसिद्ध

रत्नागिरीत खासगी बस आणि रिक्षा भाड्याबाबत उपप्रादेशिक अधिकाऱ्यांनी दरतक्ता प्रसिद्ध करण्यात आले आहे.

मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी, काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम, दोन दिवस पावसाचा अंदाज

मुंबई : विश्रांती घेतलेल्या पावसाने मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी केली आहे. सकाळपासून रिमझिम पावसाळा सुरुवात

रत्नागिरीत युनिट टेस्टमध्ये कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या

रत्नागिरी जिल्ह्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. परीक्षेतील कमी गुणांमुळे भविष्याच्या चिंतेतून आईने हटकले