भारत दबाव चांगल्या प्रकारे हाताळतो...


पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याबद्दल वीरेंद्र सेहवागचे वक्तव्य




दुबई (वृत्तसंस्था) : टी-२० विश्वचषकातील सर्वात हाय-प्रोफाईल मॅच २४ ऑक्टोबर रोजी होणार आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान लढतीवर या दोन्ही देशांतील नव्हे तर, संपूर्ण जगभरातील क्रिकेट चाहत्यांचे लक्ष असेल. वर्ल्डकपच्या काळात पाकिस्तानकडून संघांची स्तुती करणारी मोठमोठी विधाने समोर येत असतात. तर, दुसरीकडे भारतीय संघ फक्त आपल्या रणनितीकडे लक्ष्य केंद्रीत करतो आणि दबाव चांगल्या प्रकारे हाताळतो. त्यामुळे निकाल काय येणार आहे हे माहिती असते, असे भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग यांनी म्हटले आहे.


टी -२० विश्वचषकातील सर्वात मोठ्या सामन्यासाठी काउंटडाऊन सुरू झाले आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढत २४ ऑक्टोबर रोजी होणार आहे. सुमारे २८ महिन्यांनंतर दोन्ही संघ समोरासमोर असतील. दोन्ही संघ शेवटच्या वेळी २०१९च्या विश्वचषकात मैदानात उतरले होते. आता सुपर -१२मधील उभय संघाचा रविवारी पहिला सामना असेल. भारत आणि पाकिस्तानला गट दोनमध्ये ठेवण्यात आले आहे, ज्यात न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानचाही समावेश आहे.


पाकिस्तानने विश्वचषकात भारताविरुद्ध एकही सामना जिंकला नाही आणि यावेळी तो जिंकू शकतो की नाही, याविषयी चर्चाही कायम आहे. मी नेहमी म्हणालो आहे, हा खूप मोठा खेळ आहे. आपण सद्यस्थिती आणि या फॉर्मेटबद्दल बोललो तर मला वाटते की, पाकिस्तानला नेहमीच अधिक संधी असते. कारण ते ५० षटकांच्या दीर्घ फॉर्मेटमध्ये चांगले खेळू शकत नाहीत. या फॉरमॅटमध्ये एकच खेळाडू कोणत्याही संघाला हरवू शकतो. पण तरीही, पाकिस्तान ते करू शकला नाही, २४ तारखेला काय होईल ते आपण पाहच, असे सेहवागने म्हटले आहे.


२००३ विश्वचषक आणि २०११ विश्वचषक याबद्दल बोलायचे झाल्यास आमच्यावर कमी दबाव होता. आमची स्थिती पाकिस्तानपेक्षा चांगली होती. आम्ही कधीच मोठमोठे दावे केले नाहीत. भारतीय संघ फक्त आपल्या रणनितीकडे लक्ष्य केंद्रीत करतो. त्यामुळे निकाल काय येणार आहे हे माहिती असते, असे सेहवाने एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.

Comments
Add Comment

Women's Cricket : भारतावरुद्धच्या मालिकेत द. आफ्रिकेकडून ३ टी-२० सामन्यांची भर

जोहान्सबर्ग : पुढील वर्षी होणाऱ्या पहिल्यावहिल्या 'आयसीसी महिला चॅम्पियन्स ट्रॉफी' स्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी

Asia Cup : 'महिला टी-२०'चा २८ ऑगस्टपासून युएईमध्ये थरार, ५ सप्टेंबरला रंगणार भारत-पाकिस्तान महामुकाबला; आशिया चषक २०२६ चे वेळापत्रक जाहीर

नवी दिल्ली : आशियाई क्रिकेट परिषदेने 'महिला टी-२० आशिया चषक २०२६' या स्पर्धेचे अधिकृत वेळापत्रक गुरुवारी जाहीर

Ajinkya Rahane : अजिंक्य रहाणेची नवी इनिंग! निवृत्तीनंतर कोचिंग नाही, कॉमेंट्री नाही; आता करणार 'हे' मोठं काम

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा लाडका आणि अनुभवी खेळाडू अजिंक्य रहाणे याने आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गत

PCB Cricketer : पाकिस्तान क्रिकेटमध्ये खळबळ! खेळाडूला बसला मोठा फटका; २ वर्षांची बंदी अन् १० लाखांचा दंड

लाहोर: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) शिस्तभंगाच्या आणि नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी एका खेळाडूवर कठोर

India vs Sri Lanka: आजपासून तीन दिवसीय सराव सामना; टेस्ट मालिकेपूर्वी टीम इंडियाची रंगीत तालीम

श्रीलंकेत रंगणार भारत-श्रीलंका XI चा महासंग्राम! कधी आणि कुठे पाहाता येणार सामना? वाचा डिटेल्स India vs Sri Lanka :

Lightning Strike : धक्कादायक! थायलंडमध्ये फुटबॉल सामन्यादरम्यान वीज कोसळली; 24 वर्षीय खेळाडूचा मृत्यू, 12 जण जखमी

 Lightning Strike : थायलंडमध्ये सुरू असलेल्या स्थानिक फुटबॉल सामन्यादरम्यान घडलेल्या दुर्दैवी घटनेत 24 वर्षीय खेळाडूचा वीज