'सरकार असो वा सहकार, स्वाहाकार हाच मंत्र अन् हीच यांची घोषणा'

  85

मुंबई : 'सरकार असो वा सहकार, स्वाहाकार हाच मंत्र अन् हीच यांची घोषणा', अशी टीका भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यावर केली आहे.


२००४मध्ये जयंत पाटील रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री असताना पनवेलमध्ये इंजिनिअरिंग महाविद्यालय सुरू करण्यासाठी सरकारकडून एका शिक्षण संस्थेला नाममात्र दरात जमीन देण्यात आली होती. अद्याप संस्थेने त्या जमिनीवर महाविद्यालय उभारले नाही. तसेच सरकारकडून मिळालेल्या १४ एकर जमिनीपैकी दोन एकर जमीन सरकारच्याच भूसंपादनासाठी देऊन संस्थेने तीसपट मोबदलाही घेतल्याचे सांगितले जात आहे. ही शिक्षण संस्था जयंत पाटलांशी संबंधित असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी जयंत पाटलांवर टीका केली आहे.


केशव उपाध्ये यांनी ट्विट केले की, 'दोन्ही हातांनी मिळेल ते लुटायचे हीच तर राज्य सरकारमधील मंत्र्यांची खासियत आहे. आधी सरकारकडून जमिन घ्यायची मग सरकारनेच अधिग्रहीत केली म्हणून सरकारकडून भरभक्कम मोबदला घ्यायचा. सरकार असो वा सहकार, स्वाहाकार हाच मंत्र हीच यांची घोषणा, असे केशव उपाध्ये यांनी ट्विट केले.

Comments
Add Comment

Devendra Fadanvis 'आम्ही सर्व जनतेचे सेवक', लोणीकरांच्या वादग्रस्त वक्तव्यावर मुख्यमंत्र्यांची स्पष्ट भूमिका...

मुंबई : भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यामुळे त्यांच्या विधानावरुन अडचणीत वाढ

Maharashtra Assembly Monsoon Session 2025 : पावसाळी अधिवेशनाचा मुहूर्त ठरला, हिंदी सक्ती, शक्तीपीठ या मुद्द्यावरुन वातावरण पेटणार; कधी होणार अधिवेशन? जाणून घ्या...

मुंबई : यंदाच्या राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा मुहूर्त ठरलेला आहे. येत्या ३० जून ते १८ जुलै या काळात

ऊर्जा विभागाच्या कामकाजाचा बोर्डीकर यांनी घेतला आढावा

मुंबई  : राज्यातील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार सौर ऊर्जा पंपाची मागणी पूर्ण करावी. महावितरण, महाजनको आणि

केबल-स्टे ब्रीज तयारीचा महानगर आयुक्तांनी घेतला आढावा

पावसाळ्यात पूल सुरू करणार : संजय मुखर्जी मुंबई : सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड (एससीएलआर) विस्तार प्रकल्पस्थळास

लालबाग पुलावरील गळती आता कायमचीच थांबली

खराब पर्जन्य जलवाहिन्या मनपाच्या वतीने बदलण्यात आल्या मुंबई: लालबाग उड्डाणपूलावर मागील काही दिवसांपासून

पश्चिम रेल्वेकडून दोन विशेष गाड्या उकई सोनगड स्थानकावर थांबणार

मुंबई  : प्रवाशांच्या सोयीसाठी, पश्चिम रेल्वे चालवण्यात येणाऱ्या उधना-मिरज आषाढी एकादशी विशेष गाडीला उकाई सोनगड