'सरकार असो वा सहकार, स्वाहाकार हाच मंत्र अन् हीच यांची घोषणा'

मुंबई : 'सरकार असो वा सहकार, स्वाहाकार हाच मंत्र अन् हीच यांची घोषणा', अशी टीका भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यावर केली आहे.


२००४मध्ये जयंत पाटील रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री असताना पनवेलमध्ये इंजिनिअरिंग महाविद्यालय सुरू करण्यासाठी सरकारकडून एका शिक्षण संस्थेला नाममात्र दरात जमीन देण्यात आली होती. अद्याप संस्थेने त्या जमिनीवर महाविद्यालय उभारले नाही. तसेच सरकारकडून मिळालेल्या १४ एकर जमिनीपैकी दोन एकर जमीन सरकारच्याच भूसंपादनासाठी देऊन संस्थेने तीसपट मोबदलाही घेतल्याचे सांगितले जात आहे. ही शिक्षण संस्था जयंत पाटलांशी संबंधित असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी जयंत पाटलांवर टीका केली आहे.


केशव उपाध्ये यांनी ट्विट केले की, 'दोन्ही हातांनी मिळेल ते लुटायचे हीच तर राज्य सरकारमधील मंत्र्यांची खासियत आहे. आधी सरकारकडून जमिन घ्यायची मग सरकारनेच अधिग्रहीत केली म्हणून सरकारकडून भरभक्कम मोबदला घ्यायचा. सरकार असो वा सहकार, स्वाहाकार हाच मंत्र हीच यांची घोषणा, असे केशव उपाध्ये यांनी ट्विट केले.

Comments
Add Comment

महापौर, उपमहापौरपदासाठी काँग्रेसकडूनही उमेदवार देण्याच्या हालचाली सुरु

मुंबई : मुंबईच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी येत्या ११ फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार असून यासाठी शनिवारी ०७

Mumbai Railway: 'या' स्थानकांदरम्यान लोकल सेवा तीन महिने बंद राहणार; मेगाब्लॉकमुळे प्रवाशांचे हाल होणार

मुंबई: मुंबईची लाईफलाईन मानल्या जाणाऱ्या लोकल संदर्भात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. मुंबई सेंट्रल ते बोरीवली

पुढील दोन महिन्यांत मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिका लागली कामाला

दोन महिन्यांत २ हजार कोटींचे आहे लक्ष्य मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या कर निर्धारण व संकलन विभागाने आर्थिक वर्ष

महापालिकेत पहिले पक्ष कार्यालय मिळवण्यात भाजपने मारली बाजी

शुक्रवारी विधीवत पुजा करून करणार प्रवेश मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेत नगरसेवक निवडून आल्यानंतर

उपायुक्त आणि सहायक आयुक्तांच्या बदल्या आणि बढती

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेतील सहायक आयुक्त विनायक विसपुते यांना उपायुक्त पदी बढती देण्यात

कचऱ्याच्या जुन्या आणि खराब वाहनांना रस्त्यांवर नो एंट्री

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या ताफ्यात असलेली कचऱ्याची वाहने आता