केंद्रीय मंत्री नारायण राणे बदलणार कोकणचे चित्र

रत्नागिरी (प्रतिनिधी) : कोकणातील बेरोजगारी दूर करण्यासाठी आणि आर्थिक उन्नतीसाठी नारायण राणे यांनी सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाच्या (एमएसएमई) माध्यमातून कामाला सुरुवात केली असून येत्या दोन वर्षात इथले चित्र बदललेले दिसेल असे प्रतिपादन भाजपा सरचिटणीस निलेश राणे यांनी केले.


येत्या दोन वर्षात हे चित्र बदलण्यासाठी सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय जोमाने काम करत असून केरळच्या धर्तीवर किनारपट्टीवर असलेल्या रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये उद्योग सुरु होऊन इथल्या तरुणांच्या हाताला काम मिळावे यासाठी राणे साहेब काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. सिंधुदुर्गमधील चिपी विमानतळ सुरु होताना राणे साहेब मंत्री व्हावेत ही नियतीची इच्छा होती, त्याप्रमाणेच रत्नागिरीतील विमानतळ सुरु होण्यासाठी राणे साहेबांना रत्नागिरीत घेऊन येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.


मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामात केवळ रत्नागिरी तालुक्यातील कामच रखडले आहे कारण त्यामागे राजकीय हस्तक्षेप आहे. जोपर्यंत तो थांबत नाही तोपर्यंत हे काम मार्गी लागत नाही असे निलेश राणे म्हणाले. चिपळूण येथील पूरग्रस्त व्यापाऱ्यांना मदत मिळावी यासाठी केंद्र सरकार काम करत असून जे तिवरे धरणग्रस्तांना इतक्या वर्षात राहायला घरे देऊ शकले नाहीत ते पूरग्रस्तांसाठी काय करणार? असा टोलाही निलेश राणे यांनी विरोधकांना लगावला.

Comments
Add Comment

Shaktipeeth Mahamarg : शक्तीपीठ महामार्गाचा नवा मार्ग निश्चित; कोकणातील 'या' ९ गावांतून सुसाट धावणार गाड्या!

मुंबई : राज्यातील प्रस्तावित 'शक्तीपीठ महामार्गा'बाबत (शेतकऱ्यांनी दर्शवलेला तीव्र विरोध लक्षात घेता, राज्य

Ratnagiri : संकष्टी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळे मंदिरात आकर्षक फुलांची सजावट; भाविकांची मोठी गर्दी

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध गणपतीपुळे मंदिरात संकष्टी चतुर्थी निमित्त अत्यंत देखणी आणि मनमोहक

मुंबई-विजयदुर्ग 'रोरो' सेवेचा आजपासून श्रीगणेशा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या शुभेच्छा

मुंबई: कोकणची लाल माती आणि अथांग अरबी समुद्र यांचे नाते आता अधिक घट्ट होणार आहे. गेल्या अनेक दशकांपासून ज्या

Narayan Rane : "आमच्यात कटुता असली तरी जिव्हाळा कायम!" भास्कर जाधवांनी व्यक्त केली राणे साहेबांबद्दलची कृतज्ञता;

'त्या' घटनेनंतर जुन्या आठवणींना उजाळा चिपळूण : राजकारणात एकमेकांवर तुटून पडणारे नेते, वैयक्तिक आयुष्यात

फोंडाघाटचा ‘किऱ्याचा आंबा’ होणार जमीनदोस्त

कणकवली : फोंडाघाट, हवेलीनगर येथील शेकडो वर्षांपूर्वीचे ऐतिहासिक अधिष्ठान आणि मार्गदर्शक आख्यायिका, तसेच

कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

उद्यापर्यंत ब्लॉक रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरील धावणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले असून पुढील