राजकीय दबावामुळे आश्रय योजनेतील प्रस्ताव मागे


भाजपचा आक्षेप




मुंबई (प्रतिनिधी) : पुनर्विकासाच्या आश्रय योजनेअंतर्गत पालिकेतील सफाई कामगारांच्या माहिम आणि प्रभादेवी येथील वसाहतींचा प्रस्ताव बुधवारी प्रशासनाने स्थायी समितीतून मागे घेतला आहे. यावर भाजपने आक्षेप घेतला आहे. यात १२पैकी केवळ एक कंपनी मराठी होती. नेमका तोच प्रस्ताव प्रशासनाने मागे का घ्यावा, असा प्रश्न भाजपने विचारला आहे.


आश्रय योजनेअंतर्गत माहिम आणि प्रभादेवी येथील सफाई कामगारांच्या वसाहतींच्या पुनर्विकासाचे कंत्राट बी.जी. शिर्के या कंपनीला देण्यात येणार होते. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर मांडला होता. मात्र, या प्रस्तावातील त्रुटींवर आक्षेप घेत तो प्रस्ताव स्थायी समितीने पुन्हा प्रशासनाकडे पाठवला. मात्र प्रशासनाच्या या भूमिकेवर भाजपने आक्षेप घेतला. प्रशासनाने हा प्रस्ताव मागे घेण्यासाठी कोठतेही ठोस कारण दिले नाही. प्रशासकीय कारणामुळे प्रस्ताव मागे घेतला जात आहे असे सांगण्यात आले. यामुळे मराठी कंपनीचा प्रस्ताव मागे का घेतला जात आहे, त्याची ठोस कारणे देणे गरजेचे आहे, असे भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी सांगितले.


तर केवळ शिवसेनेच्या राजकीय दबावामुळे आयुक्तनि प्रस्ताव मागे घेतला असल्याचे भाजप प्रवक्ता, स्थायी समिती सदस्य भालचंद्र शिरसाट यांनी म्हटले आहे. कारण यात केवळ एकच कंपनी ही मराठी होती आणि असे असताना ही कोणतेही कारण न देता हा प्रस्ताव मागे घेण्यात आला.

Comments
Add Comment

Police Suicide : मुंबईच्या लोकभवनात SRPF जवानाची आत्महत्या; गार्ड ड्युटीवर असताना सर्व्हिस रायफलमधून झाडली गोळी

मुंबई : मलबार हिल (Malabar Hill) येथील लोकभवन (Lokbhavan) परिसरात सोमवारी सकाळी धक्कादायक घटना घडली. राजभवनाच्या सुरक्षेसाठी

Maharashtra school holiday : मुसळधार पावसाचा इशारा; मुंबईसह अनेक जिल्ह्यांतील शाळा, महाविद्यालयांना आज सुट्टी

मुंबई : राज्यात मुसळधार पावसाचा इशारा कायम असल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये खबरदारीचा उपाय म्हणून शाळा आणि

Breaking News : मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा; सलग दुसऱ्या दिवशी शाळा-महाविद्यालयांना सुटी जाहीर

मुंबई : मुंबई महापालिकेने सलग दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या मंगळवार ७ जुलै २०२६ रोजी सर्व शासकीय, खासगी,

Dadar Tree Collapse : दादरमध्ये भलंमोठं झाड कोसळलं! प्लाझाजवळ पार्क केलेल्या कारचा चक्काचूर; अग्निशमन दलाकडून मदतकार्य सुरू

मुंबई : मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाडे कोसळण्याच्या घटनांमध्ये गेल्या

BMC Park : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! महापालिकेची सर्व उद्याने उद्या बंद राहणार; जोरदार वारे आणि पावसाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

मुंबई : मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे शहरातील अनेक

Mumbai Rain : मुंबईत मुसळधार पावसाचा तडाखा! २९१ ठिकाणी झाडे कोसळली, २२ ठिकाणी भिंती-घरांचे नुकसान; पुढील २४ तास अतिवृष्टीचा इशारा

मुंबईत सोमवारी (६ जुलै) दिवसभर मुसळधार पावसाने हजेरी लावली असून शहरातील जनजीवनावर त्याचा मोठा परिणाम झाला आहे.