नाणी नदीवरील बंधाऱ्यात अडकले मोठे झाड

नेरळ (वार्ताहर) : कर्जत तालुक्यातून वाहणारी आणि भीमाशंकर अभयारण्यात उगम पावणारी नाणी नदीवरील नांदगाव येथे असलेल्या कोल्हापूर टाईपच्या बंधाऱ्यात महापुराच्या पाण्यासोबत वाहून आलेले झाड अडकले आहे. त्या झाडाच्या मोठ्या ओंडक्यामुळे सिमेंटच्या बंधाऱ्याला धोका निर्माण झाला आहे. या झाडामुळे या बंधाऱ्याचे नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, नांदगाव ग्रामपंचायतने झाडांचे ओंडके बंधाऱ्याबाहेर काढण्याची आवश्यकता आहे. हे झाड बंधाऱ्याबाहेर काढले नाही तर, यावर्षी त्या बंधाऱ्यात पावसानंतर पाणीदेखील साचून राहणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.


नाणी नदी ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्य बांधणीपासून महत्त्वाची ठरली आहे. सह्याद्रीच्या नाणे घाटात उगम पावणाऱ्या या नाणी नदीच्या बाजूने भीमाशंकर अभयारण्यात जाण्यासाठी पूर्वी बैलगाडीचा मार्ग होता आणि कर्जत तालुक्यातील नांदगाव आणि खांडस भागातील लोकांची भीमशंकर आणि घाटमाथ्यावर जाण्यासाठी नाणे घाटमार्गे जाणारा रस्ता २००५ च्या महापुरानंतर बंद झाला आहे. त्यामुळे नाणे घाटातून वाहत कर्जत तालुक्यात येणाऱ्या नाणी नदीच्या पाण्याबरोबर भीमाशंकर अभयारण्यामधील असंख्य झाडे महापुराच्या पाण्यासोबत वाहत येत असतात.


त्यातील एक मोठे झाड यावर्षी वाहून आले आणि नांदगाव येथे नाणी नदीवर बांधले गेलेल्या कोल्हापूर टाईपच्या बंधाऱ्यात अडकून पडले आहे. त्या झाडाच्या ओंडक्यांचा आकार एवढा मोठा आहार की त्या सिमेंटचा बंधारा वाहून नेऊ शकतो. अशा स्थितीत बंधाऱ्याच्या पाणी अडवण्याचा मार्गावर ते झाड अडकून राहिले आहे.


या झाडामुळे नाणी नदीवरील या बंधाऱ्यात पाणी अडवणेसुद्धा कठीण होऊन बसले आहे. दुसरीकडे, या बंधाऱ्यात पाणी अडवण्यासाठी लावाव्या लागणाऱ्या लोखंडी पट्ट्याही लावता येणार नाहीत. त्यामुळे पाणी अडवणे कठीण असून नांदगावजवळ असलेला हा बंधारा डिसेंबर महिन्यातच कोरडा पडण्याची शक्यता आहे.


आमच्याकडे स्थानिक ग्रामस्थांच्या तक्रारी आल्या आहेत. आम्ही पावसाळा संपण्यापूर्वी बंधाऱ्यात अडकून पडलेले झाड बाहेर काढण्याचे नक्की केले आहे. पाऊस कमी झाल्यावर त्याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले जाईल. - राम खांडवी, सदस्य, माजी उपसरपंच, नांदगाव ग्रामपंचायत


उन्हाळ्यात या बंधाऱ्यातील पाणी जनावरे यांच्यासाठी वापरले जाते,त्याचवेळी येथील आदिवासी लोक धुणीभांडी करण्यासाठी बंधाऱ्यातील पाण्याचा वापर करतात. त्यामुळे बंधाऱ्यात अडकून पडलेले झाड बाजूला काढलेच पाहिजे. - प्रदीप गोरे, ग्रामस्थ


Comments
Add Comment

‘वलसाड हापूस’ या नावाने स्वतंत्र मानांकनांसाठी गुजरात प्रयत्नशील

मुंबई : हापूस आंबा म्हटले की, कोकण किनारपट्टीवर उत्पादित होणारा गोड, चविष्ट आणि सुवासिक आंबा सर्वांच्या

Anganewadi Jatra 2026 : भराडी देवीचा 'कौल' मिळाला! लाखो भाविकांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम; आंगणेवाडी जत्रेची तारीख अखेर ठरली!

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या आणि कोकणातील सर्वात महत्त्वाची यात्रा समजल्या जाणाऱ्या मालवण

Eknath Shinde : शिंदेंकडून निलेश राणेंचं तोंडभरून कौतुक! "इलाका किसी का भी हो, धमाका निलेश राणेच करणार"; मालवण हा सेनेचाच बालेकिल्ला

मालवणमध्ये झालेल्या एका जाहीर सभेत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आमदार निलेश राणे यांचे

मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव येथे धुक्यामुळे भीषण अपघात

शिवशाही बस, ट्रकमध्ये धडक; १ ठार, ११ जखमी प्रमोद जाधव माणगाव : मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरू आहे.

संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारणार; पहिल्या टप्प्यातील संकल्पचित्राचे सादरीकरण

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराज स्मारक

जयगड बंदरातून काजू निर्यातीसाठी आवश्यक प्रक्रिया गतीने कराव्यात – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड बंदरातून मोठ्या प्रमाणात काजू निर्यात व्हावी यासाठी संबधित विभागांनी