कुडाळमध्ये अनधिकृत वाळू उत्खननाला दणका

  194

कुडाळ (प्रतिनिधी) : कुडाळ तालुक्यातील अनधिकृत वाळू उत्खनन होणाऱ्या सोनवडे, वालावल व कवठी येथील सुमारे ३९ रॅम्प कुडाळ तहसीलदार अमोल पाठक यांनी उद्ध्वस्त केले. एकाच वेळी एवढे रॅम्प उद्ध्वस्त करण्याची कुडाळ तालुक्यातील पहिलीच घटना आहे.


कुडाळ तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अनधिकृत वाळू उत्खनन सुरू आहे. राजरोसपणे अनधिकृत वाळू वाहतूक करणारे डंपर गोव्याच्या दिशेने जात असतात मात्र कोणतेही प्रशासन कारवाई करताना दिसत नाही. तथापि, कुडाळ तालुका तहसीलदार अमोल पाठक यांनी तालुक्यातील अनधिकृत वाळू उपसा होणाऱ्या सोनवडे, वालावल व कवठी या गावांमध्ये असलेले अनधिकृत रॅम्पवर सोमवारी एकाच दिवशी कारवाई केली. ही कारवाई दिवसभर सुरू होती.


यामध्ये सोनवडे येथील १४ रॅम्प, वालावल येथील १२ रॅम्प, कवठी येथील १३ रॅम्प नष्ट करण्यात आले आहेत. तहसीलदार अमोल पाठक यांना याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, आता हे रॅम्प उद्ध्वस्त केले आहेत. पुढील कारवाई ही होड्यांवर केली जाईल. अनधिकृत वाळू उत्खनन सुरू आहे ते बंद करण्यासाठी प्रयत्न केले जातील.

Comments
Add Comment

Red Soil Stories चे सुप्रसिद्ध यूट्यूबर शिरीष गवस यांचं निधन, वयाच्या ३३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

कोकणातील खाद्यसंस्कृती यूट्यूब व्हिडीओच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवणारे सुप्रसिद्ध Red Soil Stories चे युट्युबर

गणेशभक्तांचा रेल्वे प्रवास अधिक सुखकर करा!

खा. नारायण राणे यांनी रेल्वेमंत्र्यांची भेट घेऊन विशेष गाड्या,अधिकचे कोच जोडण्याची केली मागणी नवी दिल्ली :

सिंधुदुर्गमध्ये महाराष्ट्राचा पहिला काचेचा पूल सज्ज! नापणे धबधब्यावर पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण, कोकण पर्यटनाला नवी झळाळी

सिंधुदुर्ग: कोकणच्या निसर्गरम्य सिंधुदुर्ग जिल्ह्यात, पर्यटनाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणारे एक महत्त्वाचे

अभय योजनेचा नागरिकांनी लाभ घ्यावा

आयुक्त मंगेश चितळे यांचे आवाहन पनवेल : मालमत्ता करांवरील शास्तीमध्ये सवलत देत पनवेल महापालिकेने दिनांक १८ जुलै

Reservation Chart : आता ट्रेन सुटण्याच्या ८ तास आधी पाहायला मिळणार आरक्षण चार्ट, 'या' दिवसापासून सेवा सुरूवात

मुंबई : रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना अधिक सोयीस्कर सेवा देण्यासाठी आणि त्यांचा प्रवास अधिक चांगल्या पद्धतीने

मुंबई-गोवा महामार्ग पंधरा वर्षे का रखडला? प्रवाशांना १ कोटीचा विमा आणि नुकसान भरपाईसाठी नितीन गडकरींना थेट पत्र

रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दीर्घकाळ रखडलेल्या कामांमुळे त्रस्त झालेल्या कोकणवासीयांनी