कुडाळमध्ये अनधिकृत वाळू उत्खननाला दणका

  188

कुडाळ (प्रतिनिधी) : कुडाळ तालुक्यातील अनधिकृत वाळू उत्खनन होणाऱ्या सोनवडे, वालावल व कवठी येथील सुमारे ३९ रॅम्प कुडाळ तहसीलदार अमोल पाठक यांनी उद्ध्वस्त केले. एकाच वेळी एवढे रॅम्प उद्ध्वस्त करण्याची कुडाळ तालुक्यातील पहिलीच घटना आहे.


कुडाळ तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अनधिकृत वाळू उत्खनन सुरू आहे. राजरोसपणे अनधिकृत वाळू वाहतूक करणारे डंपर गोव्याच्या दिशेने जात असतात मात्र कोणतेही प्रशासन कारवाई करताना दिसत नाही. तथापि, कुडाळ तालुका तहसीलदार अमोल पाठक यांनी तालुक्यातील अनधिकृत वाळू उपसा होणाऱ्या सोनवडे, वालावल व कवठी या गावांमध्ये असलेले अनधिकृत रॅम्पवर सोमवारी एकाच दिवशी कारवाई केली. ही कारवाई दिवसभर सुरू होती.


यामध्ये सोनवडे येथील १४ रॅम्प, वालावल येथील १२ रॅम्प, कवठी येथील १३ रॅम्प नष्ट करण्यात आले आहेत. तहसीलदार अमोल पाठक यांना याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, आता हे रॅम्प उद्ध्वस्त केले आहेत. पुढील कारवाई ही होड्यांवर केली जाईल. अनधिकृत वाळू उत्खनन सुरू आहे ते बंद करण्यासाठी प्रयत्न केले जातील.

Comments
Add Comment

मुंबई-गोवा महामार्ग पंधरा वर्षे का रखडला? प्रवाशांना १ कोटीचा विमा आणि नुकसान भरपाईसाठी नितीन गडकरींना थेट पत्र

रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दीर्घकाळ रखडलेल्या कामांमुळे त्रस्त झालेल्या कोकणवासीयांनी

मुसळधार पावसामुळे दुचाकीस्वार गेला वाहून, एनडीआरएफकडून तरुणाचा शोध सुरु...

सावंतवाडी : सोमवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साठल्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा

Ganesh Festival 2025 : चला गणपतीक गावाक जाऊचा असा; नियमित गाड्यांचे आरक्षण सुरु होतला…

कोकण मार्गावरील नियमित गाड्यांच्या आरक्षणाचे वेळापत्रक जारी झाल्याने रेल्वेच्या नियमांप्रमाणे ६० दिवसांचे

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर, माणगाव बायपास रस्त्यांचे काम पूर्ण होईपर्यंत वाहतूक कोंडी टाळण्यासाठी चार पर्यायी रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश मुंबई : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर आणि माणगाव बायपास

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाण्याखालील संग्रहालयाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

सेवानिवृत्त युद्धनौकेचे नवे स्वरूप, सागरी संवर्धन व पर्यटनाला चालना  मुंबई: आयएनएस गुलदार या नौदलातून

मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक १७ तासांनंतर सुरू

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील (Mumbai-Goa highway) निवळी घाटात सीएनजी टँकर आणि खासगी मिनी बस यांच्यात झालेल्या भीषण