भारतासोबतचा शेवटचा वर्ल्डकप

  84

दुबई : सध्या सुरू असलेली टी-ट्वेन्टी विश्वचषक स्पर्धा ही भारतीय संघासोबतची शेवटची स्पर्धा असल्याचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधर यांनी म्हटले आहे. इन्स्टाग्रामद्वारे त्यांनी ही माहिती दिली. जवळपास सात वर्षे टीम इंडियाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून त्यांनी काम केले आहे.


श्रीधर यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर भारताच्या प्रशिक्षण जर्सीमध्ये त्यांचा फोटो अपलोड केला. मी भारतीय संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून माझे अंतिम काम करणार आहे. मला २०१४ ते २०२१ पर्यंत टीम इंडियाची सेवा करण्याची परवानगी दिल्याबद्दल मी बीसीसीआयचे आभार मानू इच्छितो. माझा विश्वास आहे, की मी माझे काम पूर्ण उत्कटतेने, प्रामाणिकपणे आणि माझ्या सर्वोत्तम क्षमतेने पूर्ण केले आहे. होय, अधूनमधून चुका झाल्या पण प्रत्येक चुकीचा फायदा संघाला चांगल्या ठिकाणी पोहोचवण्यासाठी घेतला गेला, असे त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले.


आर. श्रीधर यांनी संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, माजी कर्णधार एमएस धोनी आणि कर्णधार विराट कोहलीसह त्यांचे सहकारी सदस्य आणि इतर खेळाडूंचे आभार मानले. रवी शास्त्री एक प्रेरणादायी गुरू आहेत, त्यासाठी मी त्यांचा ऋणी आहे. माजी कर्णधार धोनी आणि सध्याचा कर्णधार विराट कोहली यांचेही खूप आभार, ज्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला, असेही श्रीधर यांनी म्हटले.

Comments
Add Comment

सकाळी उठल्यावर वॉलपेपर लावले Believe आणि ठरवले देशासाठी जिंकायचे, ओव्हल विजयानंतर सिराजची प्रतिक्रिया

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल कसोटीत भारताच्या ऐतिहासिक विजयानंतर वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने आपल्या

IND vs ENG : चक दे इंडिया! ओव्हल कसोटीत टीम इंडियाने रचले अनेक विक्रम, इतिहासात होईल नोंद

लंडन: लंडनच्या ओव्हल मैदानावर पाचव्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने केवळ इंग्लंडला पराभूतच केले नाही तर अनेक

उत्कंठावर्धक सामन्यात मोहम्मद सिराजनं तारलं

लंडन : केनिंग्टन ओव्हल स्टेडियममध्ये रंगलेल्या भारत - इंग्लंड कसोटी सामन्यात भारत जिंकला. या उत्कंठावर्धक

IND vs ENG: चौथ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडला विजयासाठी हव्यात ३५ धावा, भारताला चमत्कार वाचवणार का?

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचा चौथ्या दिवशीचा खेळ संपला आहे. चौथ्या दिवशी पावसामुळे

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट