भारतासोबतचा शेवटचा वर्ल्डकप

दुबई : सध्या सुरू असलेली टी-ट्वेन्टी विश्वचषक स्पर्धा ही भारतीय संघासोबतची शेवटची स्पर्धा असल्याचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधर यांनी म्हटले आहे. इन्स्टाग्रामद्वारे त्यांनी ही माहिती दिली. जवळपास सात वर्षे टीम इंडियाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून त्यांनी काम केले आहे.


श्रीधर यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर भारताच्या प्रशिक्षण जर्सीमध्ये त्यांचा फोटो अपलोड केला. मी भारतीय संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून माझे अंतिम काम करणार आहे. मला २०१४ ते २०२१ पर्यंत टीम इंडियाची सेवा करण्याची परवानगी दिल्याबद्दल मी बीसीसीआयचे आभार मानू इच्छितो. माझा विश्वास आहे, की मी माझे काम पूर्ण उत्कटतेने, प्रामाणिकपणे आणि माझ्या सर्वोत्तम क्षमतेने पूर्ण केले आहे. होय, अधूनमधून चुका झाल्या पण प्रत्येक चुकीचा फायदा संघाला चांगल्या ठिकाणी पोहोचवण्यासाठी घेतला गेला, असे त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले.


आर. श्रीधर यांनी संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, माजी कर्णधार एमएस धोनी आणि कर्णधार विराट कोहलीसह त्यांचे सहकारी सदस्य आणि इतर खेळाडूंचे आभार मानले. रवी शास्त्री एक प्रेरणादायी गुरू आहेत, त्यासाठी मी त्यांचा ऋणी आहे. माजी कर्णधार धोनी आणि सध्याचा कर्णधार विराट कोहली यांचेही खूप आभार, ज्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला, असेही श्रीधर यांनी म्हटले.

Comments
Add Comment

IND vs PAk : वर्चस्व राखण्यासाठी 'हरमनसेना' सज्ज; पाकिस्तानचा 'झिरो' रेकॉर्ड मोडणार?

कोलंबो : आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ मध्ये रविवार, ५ ऑक्टोबर रोजी क्रिकेट चाहत्यांना

एटीपी मास्टर्स १०००: नोवाक जोकोविचचा टेनिसमध्ये दबदबा कायम

शांघाय (वृत्तसंस्था): वयाच्या ३८ व्या वर्षीही जागतिक टेनिसमध्ये नोवाक जोकोविचचा दबदबा कायम आहे. आपल्या

बांगलादेशने अफगाणिस्तानला हरवून टी-२० मालिका जिंकली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बांगलादेशने दुसऱ्या टी-२० सामन्यात अफगाणिस्तानचा दोन विकेट्सने पराभव करून तीन

महिला विश्वचषक : पावसामुळे ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका सामना रद्द

कोलंबो (वृत्तसंस्था): शनिवारी कोलंबो येथे श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील महिला विश्वचषक सामना रद्द करावा

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी गिलकडे नेतृत्व; रोहित शर्माचा खेळाडू म्हणून संघात सहभाग

वनडे आणि टेस्टसाठी शुभमन गिल तर टी २० साठी सूर्यकुमार यादव करणार भारताचे नेतृत्व मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक

IND vs WI: तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडिजचा खेळ खल्लास, भारताचा एक डाव आणि १४० धावांनी विजय

अहमदाबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटीचा निर्णय तिसऱ्याच दिवशी लागला.