नेरुळ-उरण रेल्वे मार्गिका पुढील वर्षी सप्टेंबरपासून सुरू

  129

घनःश्याम कडू


उरण : मध्य रेल्वेवरील नेरुळ ते उरण ही उपनगरीय चौथी संपूर्ण मार्गिका सप्टेंबर २०२२ पासून प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. यातील खारकोपर ते उरण या दुसऱ्या टप्प्यातील कामाला गती दिली जात असून ते अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.


नेरुळ-बेलापूर-खारकोपर ते उरण उपनगरीय रेल्वे प्रकल्प अनेक वर्षांपासून रखडला आहे. यातील नेरुळ ते बेलापूर, खारकोपर हा पहिला टप्पा नोव्हेंबर २०१८ मध्ये प्रवाशांच्या सेवेत आला आहे; परंतु, भूसंपादनासह अनेक अडथळ्यांमुळे नेरुळ ते उरण संपूर्ण प्रकल्प रखडला. यातील पहिला टप्पा वेळेत पूर्ण झाला. तथापि, खारकोपर ते उरण हा दुसरा टप्पा पूर्ण होण्यासाठी बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला. परिणामी प्रकल्पासाठीचा एकूण ५०० कोटींचा खर्च सुमारे १७०० कोटींपर्यंत पोहोचला.


खारकोपरपुढील उरणपर्यंतच्या रेल्वे मार्गासाठी जमीन संपादनाची समस्या कायम होती. यात सिडकोकडून तीन किलोमीटरची जागा रेल्वेला मिळणे बाकी होती. त्याचे भूसंपादन पार पडले आणि ती जागा रेल्वेला मिळाली. त्यामुळे मोठा अडसर दूर झाला असून उर्वरित दुसऱ्या टप्प्यातील खारकोपर ते उरण मार्गिकाही पूर्ण करून सप्टेंबर २०२२ पासून नेरुळ ते उरण संपूर्ण उपनगरीय मार्गिका प्रवाशांच्या सेवेत येईल, अशी माहिती देण्यात आली.


एकूण २७ किमी लांबीच्या मार्गातील १४.६० किमीचे काम शिल्लक आहे. दुसऱ्या टप्प्यातील मार्गिकेत खारकोपर, गव्हाण, रांजणपाडा, न्हावा शेवा, द्रोणागिरी आणि उरण ही रेल्वे स्थानके आहेत. या प्रकल्पासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात २० कोटी रुपयांचा निधीही दिला आहे. मध्य रेल्वेने लॉकडाऊनमध्ये हा मार्ग पूर्ण करण्यावर भर दिला असून प्रकल्प पूर्ण झाल्यास नेरुळ व उरणवासीयांबरोबरच अन्य प्रवाशांनाही त्याचा बराच फायदा होईल. यामुळे जेएनपीटी आणि येत्या काळात तयार होणारे नवी मुंबई विमानतळही जोडले जाईल.

Comments
Add Comment

मुंबई-गोवा महामार्ग पंधरा वर्षे का रखडला? प्रवाशांना १ कोटीचा विमा आणि नुकसान भरपाईसाठी नितीन गडकरींना थेट पत्र

रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दीर्घकाळ रखडलेल्या कामांमुळे त्रस्त झालेल्या कोकणवासीयांनी

मुसळधार पावसामुळे दुचाकीस्वार गेला वाहून, एनडीआरएफकडून तरुणाचा शोध सुरु...

सावंतवाडी : सोमवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साठल्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा

Ganesh Festival 2025 : चला गणपतीक गावाक जाऊचा असा; नियमित गाड्यांचे आरक्षण सुरु होतला…

कोकण मार्गावरील नियमित गाड्यांच्या आरक्षणाचे वेळापत्रक जारी झाल्याने रेल्वेच्या नियमांप्रमाणे ६० दिवसांचे

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर, माणगाव बायपास रस्त्यांचे काम पूर्ण होईपर्यंत वाहतूक कोंडी टाळण्यासाठी चार पर्यायी रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश मुंबई : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर आणि माणगाव बायपास

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाण्याखालील संग्रहालयाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

सेवानिवृत्त युद्धनौकेचे नवे स्वरूप, सागरी संवर्धन व पर्यटनाला चालना  मुंबई: आयएनएस गुलदार या नौदलातून

मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक १७ तासांनंतर सुरू

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील (Mumbai-Goa highway) निवळी घाटात सीएनजी टँकर आणि खासगी मिनी बस यांच्यात झालेल्या भीषण