नेरुळ-उरण रेल्वे मार्गिका पुढील वर्षी सप्टेंबरपासून सुरू

घनःश्याम कडू


उरण : मध्य रेल्वेवरील नेरुळ ते उरण ही उपनगरीय चौथी संपूर्ण मार्गिका सप्टेंबर २०२२ पासून प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. यातील खारकोपर ते उरण या दुसऱ्या टप्प्यातील कामाला गती दिली जात असून ते अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.


नेरुळ-बेलापूर-खारकोपर ते उरण उपनगरीय रेल्वे प्रकल्प अनेक वर्षांपासून रखडला आहे. यातील नेरुळ ते बेलापूर, खारकोपर हा पहिला टप्पा नोव्हेंबर २०१८ मध्ये प्रवाशांच्या सेवेत आला आहे; परंतु, भूसंपादनासह अनेक अडथळ्यांमुळे नेरुळ ते उरण संपूर्ण प्रकल्प रखडला. यातील पहिला टप्पा वेळेत पूर्ण झाला. तथापि, खारकोपर ते उरण हा दुसरा टप्पा पूर्ण होण्यासाठी बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला. परिणामी प्रकल्पासाठीचा एकूण ५०० कोटींचा खर्च सुमारे १७०० कोटींपर्यंत पोहोचला.


खारकोपरपुढील उरणपर्यंतच्या रेल्वे मार्गासाठी जमीन संपादनाची समस्या कायम होती. यात सिडकोकडून तीन किलोमीटरची जागा रेल्वेला मिळणे बाकी होती. त्याचे भूसंपादन पार पडले आणि ती जागा रेल्वेला मिळाली. त्यामुळे मोठा अडसर दूर झाला असून उर्वरित दुसऱ्या टप्प्यातील खारकोपर ते उरण मार्गिकाही पूर्ण करून सप्टेंबर २०२२ पासून नेरुळ ते उरण संपूर्ण उपनगरीय मार्गिका प्रवाशांच्या सेवेत येईल, अशी माहिती देण्यात आली.


एकूण २७ किमी लांबीच्या मार्गातील १४.६० किमीचे काम शिल्लक आहे. दुसऱ्या टप्प्यातील मार्गिकेत खारकोपर, गव्हाण, रांजणपाडा, न्हावा शेवा, द्रोणागिरी आणि उरण ही रेल्वे स्थानके आहेत. या प्रकल्पासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात २० कोटी रुपयांचा निधीही दिला आहे. मध्य रेल्वेने लॉकडाऊनमध्ये हा मार्ग पूर्ण करण्यावर भर दिला असून प्रकल्प पूर्ण झाल्यास नेरुळ व उरणवासीयांबरोबरच अन्य प्रवाशांनाही त्याचा बराच फायदा होईल. यामुळे जेएनपीटी आणि येत्या काळात तयार होणारे नवी मुंबई विमानतळही जोडले जाईल.

Comments
Add Comment

कोकणाच्या विकासासाठी भाजपचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’; जयगड बंदर बनणार अर्थव्यवस्थेचं केंद्र

रत्नागिरी: मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भाजप नेते नितेश राणे

रत्नागिरी नाचणेत मुलाकडून आईचा खून, खून करून मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न

गणेशोत्सवाच्या उत्साहात रत्नागिरी जिल्हा हादरला आहे. शहरातील नाचणे येथे पोटच्या मुलाने आपल्या आईचा निर्घृण

खेडमधील खवटी गावाजवळ खासगी बस आणि कारचा भीषण अपघात, तिघेजण गंभीर जखमी

खेडमधील खवटी गावाजवळ मंगळवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास खासगी बस आणि कार यांच्यात भीषण अपघात झाला. या

वैभव खेडेकरांची मनसेतून हकालपट्टी, वैभव खेडेकर भाजपाच्या वाटेवर, मनसेतून 4 जणांची हकालपट्टी

गेल्या काही दिवसांपासून वैभव खेडेकर यांच्या नावाची चर्चा सुरु होती, वैभव खेडेकर भाजपमध्ये जातील अशीही शक्यता

रत्नागिरीत खासगी बस आणि रिक्षा भाड्याबाबत ‘आरटीओ’कडून दर सूची प्रसिद्ध

रत्नागिरीत खासगी बस आणि रिक्षा भाड्याबाबत उपप्रादेशिक अधिकाऱ्यांनी दरतक्ता प्रसिद्ध करण्यात आले आहे.

मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी, काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम, दोन दिवस पावसाचा अंदाज

मुंबई : विश्रांती घेतलेल्या पावसाने मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी केली आहे. सकाळपासून रिमझिम पावसाळा सुरुवात