दिवाळीपर्यंत कांदा महागण्याची शक्यता

  210

मुंबई (प्रतिनिधी) : परतीच्या पावसाचा कांदा पिकांना जोरदार फटका बसला आहे. या पावसाने नवीन कांदा पिकांचे खूप नुकसान झाले आहे. त्यामुळे सध्या किरकोळ बाजारात कांद्याला ५० ते ६० रुपये प्रति किलो दर मिळत असून दिवाळीपर्यंत कांदा आणखी कडाडण्याची शक्यता आहे.


आंध्र प्रदेश, तामिळनाडू, मध्य प्रदेश, गुजरातमध्ये परतीच्या पावसाने कहर केला आहे. महाराष्ट्रासह कर्नाटकात पावसामुळे कांद्याच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्यात सध्या जुन्या कांद्याला जास्त मागणी आहे. या मागणीमुळे बाजारात कांद्याचे भावही झपाट्याने वाढत आहेत. पावसात नुकसान झालेल्या पिकामुळे शेतकऱ्यांना पुन्हा पेरणी करावी लागली. नवीन कांदा पीक नोव्हेंबरमध्ये तयार होईल. अशा परिस्थितीत दिवाळीपर्यंत कांद्याचे भाव अशाच प्रकारे वाढत राहतील.


महाराष्ट्र आणि कर्नाटकात कांदा मुबलक आहे. सध्या बाजारात मागणीच्या तुलनेत येथील शेतकरी कांद्याचा पुरवठा करू शकत नाहीत. यामुळे साठवलेल्या जुन्या कांद्याचे भाव वाढत आहेत. सध्या किरकोळ बाजारात कांदा ५० ते ६० रुपये किलो मिळत आहे. नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये १०० ते १३० वाहनांमध्ये कांद्याची मागणी केली जाते. येथे ३० ते ४५ रुपये प्रति किलो दराने कांदा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. मुंबई आणि ठाण्याच्या किरकोळ बाजारात हा कांदा ५० ते ५५ रुपये किलोने विकला जात आहे. कांदा व्यापाऱ्यांच्या मते नवीन कांदा तयार होण्यास थोडा वेळ लागेल. त्यामुळे कांद्याचे भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.



Comments
Add Comment

'आपले सरकार' पोर्टलवरील सेवा व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून द्याव्यात', मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्य शासनाच्या विविध विभागांकडून नागरिकांना सेवा पुरवल्या जातात, या सेवांसाठी आपले सरकार हे पोर्टल

Hartalika 2025: अखंड सौभाग्य आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी केले जाते हरतालिकेचे व्रत

मुंबई : हिंदू धर्मातील महत्त्वाच्या सणांपैकी एक असलेला हरतालिका व्रताचा सण यंदा २६ ऑगस्ट २०२५ रोजी साजरा होत

Mumbai Police: मुंबई पोलिसांची कौतुकास्पद मोहीम, चोरीला गेलेले ८,००० मोबाईल परत मिळवून दिले

मुंबई: मुंबई पोलिसांनी चोरीला गेलेले मोबाईल फोन त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यासाठी एक विशेष मोहीम सुरू केली

GSB Ganpati First Look: मुंबईतील सगळ्यात श्रीमंत बाप्पाची पहिली झलक दिमाखात सादर

मुंबईच्या GSB सेवा मंडळाच्या बाप्पाच्या फर्स्ट लुकचे दिमाखात अनावरण  मुंबई: गणेश चतुर्थीसाठी आता एकच दिवस बाकी

Ganeshotsav 2025: वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने साकारले ५२ फूटी काशी विश्वनाथ मंदिर

मुंबई: दरवर्षी प्रसिध्द मंदिरांची हुबेहुब आरास साकारणाऱ्या वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘अरण्य’ चित्रपटाचे पोस्टर अनावरण

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतेच मराठी चित्रपट ‘अरण्य’ च्या पोस्टरचे अनावरण करण्यात