दिवाळीपर्यंत कांदा महागण्याची शक्यता

मुंबई (प्रतिनिधी) : परतीच्या पावसाचा कांदा पिकांना जोरदार फटका बसला आहे. या पावसाने नवीन कांदा पिकांचे खूप नुकसान झाले आहे. त्यामुळे सध्या किरकोळ बाजारात कांद्याला ५० ते ६० रुपये प्रति किलो दर मिळत असून दिवाळीपर्यंत कांदा आणखी कडाडण्याची शक्यता आहे.


आंध्र प्रदेश, तामिळनाडू, मध्य प्रदेश, गुजरातमध्ये परतीच्या पावसाने कहर केला आहे. महाराष्ट्रासह कर्नाटकात पावसामुळे कांद्याच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्यात सध्या जुन्या कांद्याला जास्त मागणी आहे. या मागणीमुळे बाजारात कांद्याचे भावही झपाट्याने वाढत आहेत. पावसात नुकसान झालेल्या पिकामुळे शेतकऱ्यांना पुन्हा पेरणी करावी लागली. नवीन कांदा पीक नोव्हेंबरमध्ये तयार होईल. अशा परिस्थितीत दिवाळीपर्यंत कांद्याचे भाव अशाच प्रकारे वाढत राहतील.


महाराष्ट्र आणि कर्नाटकात कांदा मुबलक आहे. सध्या बाजारात मागणीच्या तुलनेत येथील शेतकरी कांद्याचा पुरवठा करू शकत नाहीत. यामुळे साठवलेल्या जुन्या कांद्याचे भाव वाढत आहेत. सध्या किरकोळ बाजारात कांदा ५० ते ६० रुपये किलो मिळत आहे. नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये १०० ते १३० वाहनांमध्ये कांद्याची मागणी केली जाते. येथे ३० ते ४५ रुपये प्रति किलो दराने कांदा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. मुंबई आणि ठाण्याच्या किरकोळ बाजारात हा कांदा ५० ते ५५ रुपये किलोने विकला जात आहे. कांदा व्यापाऱ्यांच्या मते नवीन कांदा तयार होण्यास थोडा वेळ लागेल. त्यामुळे कांद्याचे भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.



Comments
Add Comment

मुंबईकरांच्या तोंड पाणी पळण्याची भीती, काय आहे कारण..

मुंबई: मुंबईला दरदिवशी होणाऱ्या एकूण पाणी पुरवठ्याच्या निम्म्या पाण्याचे शुध्दीकरण भांडुप संकुलातील

भेंडीबाजारात पुन्हा एकदा अनधिकृत बांधकामांसह फेरीवाल्यांवरील कारवाई होणार तीव्र

मुंबई: मुंबई महापालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार मुंबईतील काही विभागांमध्ये महापालिकेच्या वतीने अनधिकृत

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची घेतली सांत्वनपर भेट

मुंबई : उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी आज देवगिरी शासकीय निवासस्थानी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

माजी उपमहापौर अलका केरकर यांचे निधन

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईच्या माजी उपमहापौर आणि वॉर्ड क्रमांक ९८ च्या भाजपच्या विद्यमान नगरसेविका अलका

'जैन समाजाची सेवा, त्याग, अहिंसेची परंपरा समाजासाठी प्रेरणादायी'

मुंबई : जैन समाजाने समाजसेवा, दानधर्म, अहिंसा आणि त्याग या मूल्यांवर आधारित कार्यातून समाजासमोर प्रेरणादायी

मुंबई मनपातील संभाव्य घोटाळ्यांवर भाजपचा प्रहार

मुंबई : महापालिकेत प्रशासनातील अधिकाऱ्यांनी कंत्राटदारांसोबत संगनमत करून कामे मिळवण्यासाठी घातलेला घाट आणि